शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

औरंगाबादेतील ३ किलोमीटर लांब गटार बंद करणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:15 IST

शहरातील अनेक नाल्या ३ ते ४ किलोमीटर लांब आहेत. एवढ्या मोठ्या लांब नाल्यांवर सिमेंटचे ढापे, लोखंडी जाळ्या टाकणे अशक्यप्राय बाब आहे. तूर्त दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी लोखंडी बोर्ड लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देप्रश्न : आयुक्तांच्या आदेशानंतरही धोकादायक मॅनहोल उघडेच

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील अनेक नाल्या ३ ते ४ किलोमीटर लांब आहेत. एवढ्या मोठ्या लांब नाल्यांवर सिमेंटचे ढापे, लोखंडी जाळ्या टाकणे अशक्यप्राय बाब आहे. तूर्त दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी लोखंडी बोर्ड लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वॉर्डावॉर्डात धोकादायक मॅनहोल बंद करण्यासाठी वॉर्ड अधिकारी, अभियंत्यांना १ लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार देण्यात आले आहेत. लवकरच कामे मार्गी लागतील, असा आशावाद महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला.जयभवानीनगर, सिडको एन-६ येथे दोन निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर शहरातील धोकादायक नाल्या, ड्रेनेजच्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका अजूनही याप्रकरणी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी सर्व अधिकाºयांना शहरातील धोकादायक मॅनहोल बंद करण्याचे आदेश दिले. ज्याठिकाणी दोन निष्पाप नागरिकांचा जीव गेला तेथीलही नाली, मॅनहोल बंद करण्यात आले नाही. शहरातील एकही धोकादायक मॅनहोल बंद करण्यात आल नाही. उलट शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, काही वसाहतींमध्ये तीन ते चार किलोमीटर लांब नाल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ढापे, लोखंडी जाळी टाकणे अशक्यप्राय आहे. प्रत्येक वसाहतीत असा प्रयोग केल्यास महापालिकेला कोट्यवधी रुपये लागतील. जुनाबाजार येथील नाला कायमस्वरुपी महापालिकेने बंद केला. नाला बंद करता येऊ शकतो तर नाली का नाही... यावर सारवासारव करीत घोडेले यांनी नमूद केले की, ही कामे करण्यात येणार आहेत. तूर्त दुर्घटना घडू नये म्हणून बोर्ड लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.जयभवानीनगरचे काय करणार?जयभवानीनगर येथे महापालिकेने तब्बल १५० घरांसमोर नाला खोदून ठेवला आहे. या नाल्यात भिंत उभारण्याचे काम युद्धपातळीवर करा, असे आदेश प्रशासनाने दिल्यानंतरही काम पूर्ण झालेले नाही. शहरात आणखी मोठा पाऊस झाल्यास या भागात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आजही या १५० घरांमध्ये नागरिकांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. महापालिकेला नाल्यावर स्लॅब टाकण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. या गंभीर विषयाकडे प्रशासन, पदाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.अहवाल १५ दिवसांनंतरजयभवानीनगर येथील नाल्यात बुडून भगवान मोरे यांचा मृत्यू झाला. या घटनेला उलटून ४८ तास होण्यापूर्वीच सिडको एन-६ येथे चेतन चोपडे यांचा मृत्यू झाला. या घटनांची सविस्तर चौैकशी करावी, असा आदेश सर्वसाधारण सभेत २० जून रोजी मनपा प्रशासनाला देण्यात आला. मागील नऊ दिवसांमध्ये मनपाने कोणतीच चौैकशी सुरू केली नाही. गुरुवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी प्रभारी अतिरिक्त आयुक्त डी.पी. कुलकर्णी यांच्याकडे चौैकशी सोपविली. चौैकशीचा कालावधी १५ दिवस ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाRainपाऊस