शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतील ३ किलोमीटर लांब गटार बंद करणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:15 IST

शहरातील अनेक नाल्या ३ ते ४ किलोमीटर लांब आहेत. एवढ्या मोठ्या लांब नाल्यांवर सिमेंटचे ढापे, लोखंडी जाळ्या टाकणे अशक्यप्राय बाब आहे. तूर्त दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी लोखंडी बोर्ड लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देप्रश्न : आयुक्तांच्या आदेशानंतरही धोकादायक मॅनहोल उघडेच

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील अनेक नाल्या ३ ते ४ किलोमीटर लांब आहेत. एवढ्या मोठ्या लांब नाल्यांवर सिमेंटचे ढापे, लोखंडी जाळ्या टाकणे अशक्यप्राय बाब आहे. तूर्त दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी लोखंडी बोर्ड लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वॉर्डावॉर्डात धोकादायक मॅनहोल बंद करण्यासाठी वॉर्ड अधिकारी, अभियंत्यांना १ लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार देण्यात आले आहेत. लवकरच कामे मार्गी लागतील, असा आशावाद महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला.जयभवानीनगर, सिडको एन-६ येथे दोन निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर शहरातील धोकादायक नाल्या, ड्रेनेजच्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका अजूनही याप्रकरणी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी सर्व अधिकाºयांना शहरातील धोकादायक मॅनहोल बंद करण्याचे आदेश दिले. ज्याठिकाणी दोन निष्पाप नागरिकांचा जीव गेला तेथीलही नाली, मॅनहोल बंद करण्यात आले नाही. शहरातील एकही धोकादायक मॅनहोल बंद करण्यात आल नाही. उलट शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, काही वसाहतींमध्ये तीन ते चार किलोमीटर लांब नाल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ढापे, लोखंडी जाळी टाकणे अशक्यप्राय आहे. प्रत्येक वसाहतीत असा प्रयोग केल्यास महापालिकेला कोट्यवधी रुपये लागतील. जुनाबाजार येथील नाला कायमस्वरुपी महापालिकेने बंद केला. नाला बंद करता येऊ शकतो तर नाली का नाही... यावर सारवासारव करीत घोडेले यांनी नमूद केले की, ही कामे करण्यात येणार आहेत. तूर्त दुर्घटना घडू नये म्हणून बोर्ड लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.जयभवानीनगरचे काय करणार?जयभवानीनगर येथे महापालिकेने तब्बल १५० घरांसमोर नाला खोदून ठेवला आहे. या नाल्यात भिंत उभारण्याचे काम युद्धपातळीवर करा, असे आदेश प्रशासनाने दिल्यानंतरही काम पूर्ण झालेले नाही. शहरात आणखी मोठा पाऊस झाल्यास या भागात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आजही या १५० घरांमध्ये नागरिकांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. महापालिकेला नाल्यावर स्लॅब टाकण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. या गंभीर विषयाकडे प्रशासन, पदाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.अहवाल १५ दिवसांनंतरजयभवानीनगर येथील नाल्यात बुडून भगवान मोरे यांचा मृत्यू झाला. या घटनेला उलटून ४८ तास होण्यापूर्वीच सिडको एन-६ येथे चेतन चोपडे यांचा मृत्यू झाला. या घटनांची सविस्तर चौैकशी करावी, असा आदेश सर्वसाधारण सभेत २० जून रोजी मनपा प्रशासनाला देण्यात आला. मागील नऊ दिवसांमध्ये मनपाने कोणतीच चौैकशी सुरू केली नाही. गुरुवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी प्रभारी अतिरिक्त आयुक्त डी.पी. कुलकर्णी यांच्याकडे चौैकशी सोपविली. चौैकशीचा कालावधी १५ दिवस ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाRainपाऊस