शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

औरंगाबादेतील ३ किलोमीटर लांब गटार बंद करणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:15 IST

शहरातील अनेक नाल्या ३ ते ४ किलोमीटर लांब आहेत. एवढ्या मोठ्या लांब नाल्यांवर सिमेंटचे ढापे, लोखंडी जाळ्या टाकणे अशक्यप्राय बाब आहे. तूर्त दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी लोखंडी बोर्ड लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देप्रश्न : आयुक्तांच्या आदेशानंतरही धोकादायक मॅनहोल उघडेच

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील अनेक नाल्या ३ ते ४ किलोमीटर लांब आहेत. एवढ्या मोठ्या लांब नाल्यांवर सिमेंटचे ढापे, लोखंडी जाळ्या टाकणे अशक्यप्राय बाब आहे. तूर्त दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी लोखंडी बोर्ड लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वॉर्डावॉर्डात धोकादायक मॅनहोल बंद करण्यासाठी वॉर्ड अधिकारी, अभियंत्यांना १ लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार देण्यात आले आहेत. लवकरच कामे मार्गी लागतील, असा आशावाद महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला.जयभवानीनगर, सिडको एन-६ येथे दोन निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर शहरातील धोकादायक नाल्या, ड्रेनेजच्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका अजूनही याप्रकरणी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी सर्व अधिकाºयांना शहरातील धोकादायक मॅनहोल बंद करण्याचे आदेश दिले. ज्याठिकाणी दोन निष्पाप नागरिकांचा जीव गेला तेथीलही नाली, मॅनहोल बंद करण्यात आले नाही. शहरातील एकही धोकादायक मॅनहोल बंद करण्यात आल नाही. उलट शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, काही वसाहतींमध्ये तीन ते चार किलोमीटर लांब नाल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ढापे, लोखंडी जाळी टाकणे अशक्यप्राय आहे. प्रत्येक वसाहतीत असा प्रयोग केल्यास महापालिकेला कोट्यवधी रुपये लागतील. जुनाबाजार येथील नाला कायमस्वरुपी महापालिकेने बंद केला. नाला बंद करता येऊ शकतो तर नाली का नाही... यावर सारवासारव करीत घोडेले यांनी नमूद केले की, ही कामे करण्यात येणार आहेत. तूर्त दुर्घटना घडू नये म्हणून बोर्ड लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.जयभवानीनगरचे काय करणार?जयभवानीनगर येथे महापालिकेने तब्बल १५० घरांसमोर नाला खोदून ठेवला आहे. या नाल्यात भिंत उभारण्याचे काम युद्धपातळीवर करा, असे आदेश प्रशासनाने दिल्यानंतरही काम पूर्ण झालेले नाही. शहरात आणखी मोठा पाऊस झाल्यास या भागात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आजही या १५० घरांमध्ये नागरिकांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. महापालिकेला नाल्यावर स्लॅब टाकण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. या गंभीर विषयाकडे प्रशासन, पदाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.अहवाल १५ दिवसांनंतरजयभवानीनगर येथील नाल्यात बुडून भगवान मोरे यांचा मृत्यू झाला. या घटनेला उलटून ४८ तास होण्यापूर्वीच सिडको एन-६ येथे चेतन चोपडे यांचा मृत्यू झाला. या घटनांची सविस्तर चौैकशी करावी, असा आदेश सर्वसाधारण सभेत २० जून रोजी मनपा प्रशासनाला देण्यात आला. मागील नऊ दिवसांमध्ये मनपाने कोणतीच चौैकशी सुरू केली नाही. गुरुवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी प्रभारी अतिरिक्त आयुक्त डी.पी. कुलकर्णी यांच्याकडे चौैकशी सोपविली. चौैकशीचा कालावधी १५ दिवस ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाRainपाऊस