शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रस्ता किती मीटर रुंद? त्रिमुर्ती चौक ते चेतक घोडा रस्त्याचे होणार टोटल स्टेशन सर्वेक्षण

By मुजीब देवणीकर | Updated: June 13, 2024 17:30 IST

नागरिकांनी, रस्ता नेमका किती? या मुद्यावर विरोध करीत मार्किंग थांबविले होते.

छत्रपती संभाजीनगर : त्रिमुर्ती चौक ते चेतक घोड्यापर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी मनपाने मागील आठवड्यात मार्किंगला सुरूवात केली. रस्ता काही ठिकाणी १८ तर काही ठिकाणी २४ मीटर रुंद आहे. नागरिकांनी, रस्ता नेमका किती? या मुद्यावर विरोध करीत मार्किंग थांबविले होते. बुधवारी या भागातील नागरिकांनी माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्या नेतृत्वाखाली मनपा प्रशासक यांची भेट घेतली. प्रशासकांनी रस्त्याचे टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. ७ दिवसात याचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

शिष्टमंडळाने प्रशासक जी. श्रीकांत यांना सांगितले की, या भागात व्यापाऱ्यांची छोटी दुकाने असून, २४ मीटरचा रस्ता केल्यास गोर-गरीब व्यापाऱ्यांची दुकाने जातील. व्यापारी रस्त्यावर येतील. हा रस्ता १५ मीटरचा करण्यात यावा, अशी मागणी तुपे यांनी केली. त्यावर जी. श्रीकांत यांनी शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. रस्ते मोठे करणे आवश्यक आहे. १५ मीटरचा रस्ता शक्य नाही. १८ मीटरच्या रस्त्याचा विचार करता येईल. १८ आणि २४ मीटरचा रस्ता ग्रहित धरून टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्यात यावे. त्यात कोणाचे किती नुकसान होईल, हे स्पष्ट होईल, त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे जी. श्रीकांत यांनी नमूद केले. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर राजेंद्र मंडलिक, सोमनाथ लोळगे, नितीन संचेती, निलम चावडा, मिनी रोडगे, आनंद वर्मा, सुनील शेजूळ, मोहनदास अरडेजा, संतोष चेडे, निलेश वानखेडे, ए. के. लांडे, अजित कदम, अशिष क्षीरसागर यांच्यासह अन्य व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत.

गुंठेवारी करावीच लागेल१५ मीटरचा रस्ता केला तरी या भागातील अनेक व्यापारी, नागरिकांनी अद्यापही गुंठेवारी केलेली नाही. व्यापाऱ्यांना अगोदर गुंठेवारी करावी लागेल. त्यानंतरच १८ मीटर रस्त्याचा निर्णय घेण्यात येईल, असे प्रशासकांनी शिष्टमंडळाला सांगितले. आजपर्यंत फुकटात भरपूर वापर केला, असा टोला जी. श्रीकांत यांनी लगावला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण