शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

किती सरकारं आली, गेली; रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेचा प्रश्न ‘जैसे थे’च!

By स. सो. खंडाळकर | Updated: September 16, 2023 13:15 IST

रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना सरकारने चालवायला घ्यावी व जिल्हा बँकेला २१६ कोटी रुपये द्यावेत, यासाठी बँकेचे संचालक मंडळ सातत्याने आग्रही राहत आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : किती सरकारं आली, गेली; पण रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेचा प्रश्न सुटता सुटत नाही. वैजापूर तालुक्यातील २ हजार ६७ शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा शिंदे-फडणवीस-पवार यांचं सरकार तरी उतरवणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. शनिवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना सरकार चालवायला घेऊन २ हजार ६७ शेतकऱ्यांना कर्जमाफी देते का, याची प्रतीक्षा आहे.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना रामकृष्णबाबा पाटील यांनी ही योजना आणली. एकूण १७ गावांसाठीची ही पाणीपुरवठा योजना होती. राज्य सहकारी बँकेकडून यासाठी ३७ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. ते व्याजासहित ६७ कोटी रु. झाले. ही रक्कम वीस हप्त्यांत जिल्हा बँकेने फेडली. त्यामुळे ही योजना शंभर टक्के जिल्हा बँकेची झाली. मध्यंतरी हरिभाऊ बागडे विधानसभेचे सभापती असताना त्यांनी तत्कालीन सरकारकडून ६ कोटी रुपये मिळवून दिले. ते टेस्टिंगसाठी वापरण्यात आले. योजना सुरुवातीपासूनच कार्यान्वित होऊ शकली नाही.

जिल्हा बँकेचे मात्र २१६ कोटी रुपये यात अडकून पडले आहेत. कृष्णा व तापी खोरे यातल्या कर्जाच्या रकमा सरकारने फेडल्या. त्याच धर्तीवर रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना सरकारने चालवायला घ्यावी व जिल्हा बँकेला २१६ कोटी रुपये द्यावेत, यासाठी बँकेचे संचालक मंडळ सातत्याने आग्रही राहत आले आहे. आताही पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून वित्तमंत्री अजित पवार यांना मुंबईत एक शिष्टमंडळ भेटले. मंत्रिमंडळाच्या विषय पत्रिकेवर हा विषय घेण्यात आला असून, काही तरी सकारात्मक निर्णय हाती येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पState Governmentराज्य सरकार