शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

किती सरकारं आली, गेली; रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेचा प्रश्न ‘जैसे थे’च!

By स. सो. खंडाळकर | Updated: September 16, 2023 13:15 IST

रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना सरकारने चालवायला घ्यावी व जिल्हा बँकेला २१६ कोटी रुपये द्यावेत, यासाठी बँकेचे संचालक मंडळ सातत्याने आग्रही राहत आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : किती सरकारं आली, गेली; पण रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेचा प्रश्न सुटता सुटत नाही. वैजापूर तालुक्यातील २ हजार ६७ शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा शिंदे-फडणवीस-पवार यांचं सरकार तरी उतरवणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. शनिवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना सरकार चालवायला घेऊन २ हजार ६७ शेतकऱ्यांना कर्जमाफी देते का, याची प्रतीक्षा आहे.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना रामकृष्णबाबा पाटील यांनी ही योजना आणली. एकूण १७ गावांसाठीची ही पाणीपुरवठा योजना होती. राज्य सहकारी बँकेकडून यासाठी ३७ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. ते व्याजासहित ६७ कोटी रु. झाले. ही रक्कम वीस हप्त्यांत जिल्हा बँकेने फेडली. त्यामुळे ही योजना शंभर टक्के जिल्हा बँकेची झाली. मध्यंतरी हरिभाऊ बागडे विधानसभेचे सभापती असताना त्यांनी तत्कालीन सरकारकडून ६ कोटी रुपये मिळवून दिले. ते टेस्टिंगसाठी वापरण्यात आले. योजना सुरुवातीपासूनच कार्यान्वित होऊ शकली नाही.

जिल्हा बँकेचे मात्र २१६ कोटी रुपये यात अडकून पडले आहेत. कृष्णा व तापी खोरे यातल्या कर्जाच्या रकमा सरकारने फेडल्या. त्याच धर्तीवर रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना सरकारने चालवायला घ्यावी व जिल्हा बँकेला २१६ कोटी रुपये द्यावेत, यासाठी बँकेचे संचालक मंडळ सातत्याने आग्रही राहत आले आहे. आताही पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून वित्तमंत्री अजित पवार यांना मुंबईत एक शिष्टमंडळ भेटले. मंत्रिमंडळाच्या विषय पत्रिकेवर हा विषय घेण्यात आला असून, काही तरी सकारात्मक निर्णय हाती येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पState Governmentराज्य सरकार