शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शासनाच्या पैशांवर किती दिवस जगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 1:01 AM

प्रत्येक कामांसाठी शासनाच्या पैशांवरच का अवलंबून राहावे. आणखी किती दिवस मनपा अशा पद्धतीने जगणार आहे...? असा प्रश्न पालकमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी उपस्थित केला.

औरंगाबाद : रस्त्यांसाठी शासन अनुदान, भूमिगत गटार योजनेसाठी शासनाचे अनुदान, पाणीपुरवठ्यासाठी शासनाचा निधी, प्रत्येक कामांसाठी शासनाच्या पैशांवरच का अवलंबून राहावे. आणखी किती दिवस मनपा अशा पद्धतीने जगणार आहे...? असा प्रश्न पालकमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी उपस्थित केला. महापालिकेने आता तरी स्वत:चे आर्थिक स्रोत बळकट करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.पालकमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. उपमहापौर स्मिता घोगरे यांच्या मयूरबन कॉलनी वॉर्डात पोदार स्कूल ते पृथ्वीराजनगर येथील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री म्हणाले, मनपाने वसुली वाढवावी आणि शहरात विकासकामे करावीत, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, सभापती गजानन बारवाल, विकास जैन, नगरसेवक नंदकुमार घोडेले, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, शहर अभियंता सिकंदर अली उपस्थित होते.तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्या वॉर्डात मोंढानाका ते तानाजी चौक, गुरुद्वारा कमान आदी ठिकाणच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. पालकमंत्र्यांनी संत एकनाथ रंगमंदिरासाठी २ कोटी रुपयांचे अनुदान डीपीडीसीमधून देण्याचे मान्य केले. बालाजीनगरचा पाणी प्रश्न किती दिवसांत सोडविणार, असा प्रश्न आयुक्तांना केला. आयुक्तांनी आठ दिवसांमध्ये प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. १०० कोटी रुपये रस्त्यांसाठी मी आणले. भाजपचे महापौर त्याचे श्रेय घेत असतील तर घेऊ द्या. शेवटी पैसा शासनाचा आहे. ते श्रेयाचे होर्र्डिंग लावत असतील तर लावू द्या, काहीच हरकत नाही.