शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

कॉपी कशी करता ? परीक्षेच्या दिवशी केंद्राजवळ झेरॉक्सही राहणार बंद !

By विजय सरवदे | Updated: February 20, 2023 17:15 IST

यंत्रणा अलर्ट मोडवर : बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची २ मार्चपासून

- विजय सरवदेऔरंगाबाद : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२वी) २१ फेब्रुवारीपासून, तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १०वी) २ मार्चपासून सुरू होत आहे. या कालावधीत परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी संबंधित सर्वच यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

विभागीय बोर्ड, माध्यमिक शिक्षण विभाग, महसूल विभाग, जि.प., पोलिस आदी सर्व यंत्रणा कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे, यंदापासून ‘सुरक्षा खोली’ (कस्टडी रूम) ते परीक्षा केंद्रावर आणि विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्नपत्रिका जाण्यापर्यंत संपूर्ण घटनाक्रमाचे चित्रीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी १२७ केंद्रांवर ६० हजार ४२५ विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे, तर दहावीच्या परीक्षेसाठी २२७ केंद्रांवर ६४ हजार ९१९ विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

- बारावीच्या परीक्षा २१पासून, दहावीची २ मार्चपासूनमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची परीक्षा २१फेब्रुवारी ते २१ मार्च, तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.

- कोणत्या तालुक्यात किती केंद्र?तालुका             दहावी            बारावीऔरंगाबाद (ग्रामीण)- १६- २० औरंगाबाद (शहर)- ७४- ३३ फुलंब्री- १२- १० सिल्लोड- २६- १६ सोयगाव- ०६- ०९ कन्नड- १९- १९ खुलताबाद- १०- १२ गंगापूर- २७- १२ वैजापूर- १७- ११ पैठण- २०- १५

- कॉपीबहाद्दरांची गय नाही

● दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यासाठी यंदा अतिशय कडक उपाययोजना केल्या जाणार आहेत.● परीक्षा केंद्रात प्रवेशावेळी शंभर टक्के विद्यार्थ्यांची झडती घेण्यात येणार आहे.● परीक्षा केंद्रावर बैठे पथके परीक्षा सुरू होण्याआधी एक तास ते परीक्षेनंतर एक तास (उत्तर पत्रिका ताब्यात घेईपर्यंत) उपस्थित राहतील.● केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादssc examदहावी