शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

प्रात्यक्षिक कसे करणार ? विद्यार्थी, पालकांत संभ्रमावस्था; बोर्ड मात्र परीक्षेच्या तयारीत व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 2:07 PM

जिल्ह्यात ११५८ शाळांत दहावी आणि बारावीचे १ लाख २० हजार १८८ विद्यार्थी आहेत.

ठळक मुद्दे वर्ग सुरू झाल्यावर मोजक्याच चार विषयांना प्राधान्य दिले गेले. बहुतांश ठिकाणी प्रात्यक्षिकही झाले नाही.

- योगेश पायघन

औरंगाबाद : जेमतेम दोन महिने सुरू झालेले प्रत्यक्ष वर्ग बंद होऊन जिल्ह्यात अंशतः लाॅकडाऊन लागल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली. शाळा, महाविद्यालयांकडून अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना काही प्रमाणात सराव, प्रात्यक्षिकांकडे दुर्लक्ष झाले. मात्र, आता न झालेल्या प्रात्यक्षिकांवर परीक्षा कशी द्यायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांना, तर न झालेल्या प्रात्यक्षिकांची परीक्षा कशी घ्यायची, असा प्रश्न शिक्षकांना सतावत आहे.

जिल्ह्यात ११५८ शाळांत दहावी आणि बारावीचे १ लाख २० हजार १८८ विद्यार्थी आहेत. कोविडमुळे नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद होत्या. ऑनलाईन शिक्षणावरच भर होता. त्यातही विद्यार्थी उपस्थिती ४० टक्केपेक्षा अधिक नव्हती. त्यामुळे ऑनलाईनमध्ये विद्यार्थ्यांना किती पाठ्यांशाचे आकलन झाले, हा प्रश्नच असताना, प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यावर उपस्थिती ६० ते ७० टक्के झाली. वर्ग सुरू झाल्यावर मोजक्याच चार विषयांना प्राधान्य दिले गेले. त्यामुळे इतर विषयांचे काय, असा प्रश्न असताना, बहुतांश ठिकाणी प्रात्यक्षिकही झाले नाही. आता एकीकडे लेखी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षांचे टेन्शन असताना, पुन्हा ऑनलाईन वर्गातून एप्रिल महिन्यापूर्वी अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल, याची शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये चिंता आहे.

शिकलोच नाही, तर प्रात्यक्षिक कसे करणार?गावात ऑनलाईन वर्ग कसेबसे झाले. शाळा सुरू झाल्यावर दोन तीन प्रात्यक्षिके झाली. परीक्षेत १० ते १२ प्रात्यक्षिके असतील तर ती कशी करावीत. शिकलोच नाही, तर प्रात्यक्षिक कसे करणार?- सुकन्या गायकवाड, दहावीची विद्यार्थिनी

परीक्षेपेक्षा अधिक टेन्शनपरीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या त्याचे टेन्शन आहेच. आता प्रात्यक्षिक परीक्षा. अनेक प्रात्यक्षिक अद्याप बाकी होत्या. वर्ग बंद झाल्याने ते प्रात्यक्षिक कसे शिकणार, त्याची परीक्षा द्यायची याचे परीक्षेपेक्षा अधिक टेन्शन आले आहे.- प्रथमेश सूर्यवंशी, बारावीचा विद्यार्थी

मुले अस्वस्थ आहेतअभूतपूर्व परिस्थिती आहे. बोर्ड परीक्षा घेण्यासाठी ठाम आहे. पुरेसे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यावरही चार तास शिकवण्याच्या निकषांत घेता आले नाही. सराव परीक्षांची तयारी सुरू होती. त्यात वर्ग बंद झाले. प्राधान्यक्रमाचे विषय शिकविताना प्रात्यक्षिकाकडे दुर्लक्ष झाले. शिकवले नाही, त्यावर प्रात्यक्षिक घ्यावे लागणार आहे. आधीच तणावात असलेली मुले आता त्यामुळे अस्वस्थ आहेत.- अनिल देशमुख, मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला, गणोरी

न कंटाळता अभ्यास करत राहावेदहावी, बारावीच्या मुलांनी न कंटाळता अभ्यास करत राहावे. दरवर्षीप्रमाणे केंद्राची निवड करून परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. परीक्षा घेण्याबाबत काहीच संभ्रम नाही. कोरोनासदृश परिस्थिती असली तरी प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक परीक्षा बॅचनुसार घ्यायला अडसर नाही, असे मानले जात आहे. काही अडचण असेल तर विद्यार्थी, पालकांनी अपील करायचे आहे. अद्याप बोर्डाकडे कोणी यासंदर्भात अपील केले नाही.

- सुगता पुन्ने, सचिव, विभागीय परीक्षा मंडळ, औरंगाबाद

बोर्ड परीक्षेस बसलेले विद्यार्थीजिल्हा - दहावीचे विद्यार्थी - बारावीचे विद्यार्थीऔरंगाबाद - ६५,०११ - ५५,१७७बीड - ४२,५८८-३६,२६७जालना - ३१,२९६-२८,२७७परभणी - २८,४४०-२०,५५२हिंगोली - १६२७६-११,५८०

टॅग्स :ssc examदहावीexamपरीक्षाAurangabadऔरंगाबाद