शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

कुटुंबाचा गाडा एकटीने हाकायचा कसा...?

By admin | Updated: December 10, 2014 00:41 IST

ना मिळाली शासकीय मदत, ना कोणाचा आधार. जीवन तर जगावेच लागतेय. कर्जबाजारी झाल्याने पतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली

ना मिळाली शासकीय मदत, ना कोणाचा आधार. जीवन तर जगावेच लागतेय. कर्जबाजारी झाल्याने पतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आता वयोवृद्ध सासु-सासरे, स्वत:च्या दोन मुली, एक मुलगा, यांची जबाबदारी पेलायची कशी? या विवंचनेत उषा दत्ता राऊत हिचा नियतीशी संघर्ष सुरू आहे.ही व्यथा आहे अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची. सलग तीन वर्षांपासून दुष्काळ सदृश्य स्थितीचा सामना करताना झालेली दमछाक. शेतीसाठी घेतलेल्या बँकांच्या कर्जाचे हप्ते वाढू लागले. झालेल्या उत्पन्नातून खर्चही निघेना. दिवसेंदिवस कर्ज वाढूच लागले. अशा स्थितीत कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा? यातून नैराश्य आल्याने पूस येथील दत्ता प्रभू राऊत (वय - ३६) या शेतकऱ्याने २२ नोव्हेंबर रोजी आपल्या राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.दत्ता प्रभू राऊत हा अल्पभूधारक शेतकरी आपल्या दोन एक्कर शेतीवर तो संपूर्ण कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत होता. शेती करताना त्याने आई-वडिलांच्या नावावर शेतीसाठी कर्ज घेतले. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे झालेल्या उत्पन्नातून खर्चही निघेना म्हणून तो गावातच शेतमजूर म्हणून काम करू लागला. परंतु आर्थिक जुळवाजुळवीचे गणीत काही जमेना. कर्जाचे हप्ते वाढू लागले. यातूनच नैराश्य आल्याने त्याने घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.दत्ता राऊत याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, उषा, दोन मुली, एक मुलगा असा संसार आता उघडयावर पडला आहे. दत्ता प्रभू राऊत या शेतकऱ्याची आत्महत्या झाली या घटनेचा पंचनामा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भात कृषि विभाग, शेतकऱ्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट, या सर्व बाबींचा अहवाल पाठविला आहे. या घटनेबाबत आपला पाठपुरावा सुरू असल्याचे तहसीलदार राहुल पाटील यांनी सांगितले.शासनाला गांभीर्य नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सातत्याने सुरूच आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे व समस्यांकडे कायम दुर्लक्ष राहिले आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबविल्या जातात. त्या खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांना मिळत नाहीत. या संदर्भात सातत्याने अशा दुर्घटना घडूनही शासनाला गांभीर्य नाही. अशी प्रतिक्रिया कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. पंकजा मुंडेंचा मतदारसंघपंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्या परळी या मतदारसंघात पूस हे गाव आहे. ही दुर्घटना २२ नोव्हेंबर रोजी घडली. घटना घडल्यानंतर पंकजा यांच्या मतदारसंघात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. मात्र, अद्यापही पंकजा अथवा खा. प्रितम यांनी या कुटुंबियांची भेट घेण्याचे साधे औदार्यही दाखविले नाही. याची चर्चा ग्रामस्थांमध्ये ऐकण्यास मिळाली.