शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबाचा गाडा एकटीने हाकायचा कसा...?

By admin | Updated: December 10, 2014 00:41 IST

ना मिळाली शासकीय मदत, ना कोणाचा आधार. जीवन तर जगावेच लागतेय. कर्जबाजारी झाल्याने पतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली

ना मिळाली शासकीय मदत, ना कोणाचा आधार. जीवन तर जगावेच लागतेय. कर्जबाजारी झाल्याने पतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आता वयोवृद्ध सासु-सासरे, स्वत:च्या दोन मुली, एक मुलगा, यांची जबाबदारी पेलायची कशी? या विवंचनेत उषा दत्ता राऊत हिचा नियतीशी संघर्ष सुरू आहे.ही व्यथा आहे अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची. सलग तीन वर्षांपासून दुष्काळ सदृश्य स्थितीचा सामना करताना झालेली दमछाक. शेतीसाठी घेतलेल्या बँकांच्या कर्जाचे हप्ते वाढू लागले. झालेल्या उत्पन्नातून खर्चही निघेना. दिवसेंदिवस कर्ज वाढूच लागले. अशा स्थितीत कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा? यातून नैराश्य आल्याने पूस येथील दत्ता प्रभू राऊत (वय - ३६) या शेतकऱ्याने २२ नोव्हेंबर रोजी आपल्या राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.दत्ता प्रभू राऊत हा अल्पभूधारक शेतकरी आपल्या दोन एक्कर शेतीवर तो संपूर्ण कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत होता. शेती करताना त्याने आई-वडिलांच्या नावावर शेतीसाठी कर्ज घेतले. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे झालेल्या उत्पन्नातून खर्चही निघेना म्हणून तो गावातच शेतमजूर म्हणून काम करू लागला. परंतु आर्थिक जुळवाजुळवीचे गणीत काही जमेना. कर्जाचे हप्ते वाढू लागले. यातूनच नैराश्य आल्याने त्याने घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.दत्ता राऊत याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, उषा, दोन मुली, एक मुलगा असा संसार आता उघडयावर पडला आहे. दत्ता प्रभू राऊत या शेतकऱ्याची आत्महत्या झाली या घटनेचा पंचनामा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भात कृषि विभाग, शेतकऱ्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट, या सर्व बाबींचा अहवाल पाठविला आहे. या घटनेबाबत आपला पाठपुरावा सुरू असल्याचे तहसीलदार राहुल पाटील यांनी सांगितले.शासनाला गांभीर्य नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सातत्याने सुरूच आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे व समस्यांकडे कायम दुर्लक्ष राहिले आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबविल्या जातात. त्या खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांना मिळत नाहीत. या संदर्भात सातत्याने अशा दुर्घटना घडूनही शासनाला गांभीर्य नाही. अशी प्रतिक्रिया कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. पंकजा मुंडेंचा मतदारसंघपंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्या परळी या मतदारसंघात पूस हे गाव आहे. ही दुर्घटना २२ नोव्हेंबर रोजी घडली. घटना घडल्यानंतर पंकजा यांच्या मतदारसंघात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. मात्र, अद्यापही पंकजा अथवा खा. प्रितम यांनी या कुटुंबियांची भेट घेण्याचे साधे औदार्यही दाखविले नाही. याची चर्चा ग्रामस्थांमध्ये ऐकण्यास मिळाली.