शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

कचरा संकलन करणाऱ्या कंपनीची मनपाला हूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:22 IST

शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याची जबाबदारी बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीवर टाकण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून कंपनी काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कंपनीने आणलेल्या वाहनांचे पूजन करण्यात आले. दुसºया दिवशी म्हणजे २७ जानेवारीपासून कंपनीने काम सुरू करणे अपेक्षित होते; मात्र कंपनीने हात झटकले.

ठळक मुद्देप्रजासत्ताकदिनी उद्घाटन : दुसºया दिवशी कामच सुरू केले नाही

औरंगाबाद : शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याची जबाबदारी बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीवर टाकण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून कंपनी काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कंपनीने आणलेल्या वाहनांचे पूजन करण्यात आले. दुसºया दिवशी म्हणजे २७ जानेवारीपासून कंपनीने काम सुरू करणे अपेक्षित होते; मात्र कंपनीने हात झटकले.शहरात दररोज ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. डोअर टू डोअर कलेक्शन करण्याची जबाबदारी महापालिकेने बंगळुरू येथील कंपनीला दिली आहे. कंपनीने शहरातील १ मेट्रिक टन कचरा जमा केल्यास मनपा कंपनीला १८६३ रुपये देणार आहे. तीन महिन्यांपूर्वी मनपाने कंपनीला वर्क आॅर्डर दिली आहे. निविदेतील अटी-शर्थीनुसार कंपनीने स्वत:च्या मालकीची नवीन वाहने आणावीत. साधारणपणे ३०० रिक्षा, मोठी वाहने किमान १०० असावीत, असे नमूद केले आहे. कंपनीने आतापर्यंत ५० टक्केच वाहने आणली आहेत. वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही, मनपाने जागा द्यावी, अशी मागणी कंपनीने केली आहे. कंपनीने त्वरित काम सुरू करावे, अशी मनपाची इच्छा आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी काम सुरू करण्यास टाळाटाळ करीत आहे. मनपा प्रशासनाने आतापर्यंत तीन तारखा कंपनीला दिल्या. एकाही तारखेला कंपनीने काम सुरू केलेले नाही. प्रजासत्ताकदिनी बळजबरी महापालिकेने कंपनीच्या वाहनांचे पूजन करून कामाचा शुभारंभ झाला असे जाहीर केले. २७ जानेवारी रोजी कंपनी काम सुरू करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. रविवारी कंपनीने शहरातील एक किलो कचराही उचलला नाही.९०० कर्मचाºयांची गरजशहरातील ११५ वॉर्डांमधील प्रत्येक घरातून कचरा जमा करण्यासाठी कंपनीला किमान ९०० कर्मचारी लागणार आहेत. कंपनीकडे आतापर्यंत ४०० ते ४५० कर्मचारी आहेत. उर्वरित मनुष्यबळ कंपनीला मिळालेच नाही. कचरा उचलणारे कामगार सहजासहजी मिळायला तयार नाहीत.कंपनीवर दबावसिडको-हडकोमध्ये मागील २० ते २५ वर्षांपासून अस्थायी कामगार काम करीत आहेत. या कामगारांची संख्या जवळपास ४०० आहे. बचत गटामार्फत अनेक कर्मचारी नेमले आहेत. हे सर्व कर्मचारी कंपनीने कोणत्याही अटीशिवाय घ्यावेत म्हणून कंपनीवर दबाव टाकण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न