शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

कचरा संकलन करणाऱ्या कंपनीची मनपाला हूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:22 IST

शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याची जबाबदारी बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीवर टाकण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून कंपनी काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कंपनीने आणलेल्या वाहनांचे पूजन करण्यात आले. दुसºया दिवशी म्हणजे २७ जानेवारीपासून कंपनीने काम सुरू करणे अपेक्षित होते; मात्र कंपनीने हात झटकले.

ठळक मुद्देप्रजासत्ताकदिनी उद्घाटन : दुसºया दिवशी कामच सुरू केले नाही

औरंगाबाद : शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याची जबाबदारी बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीवर टाकण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून कंपनी काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कंपनीने आणलेल्या वाहनांचे पूजन करण्यात आले. दुसºया दिवशी म्हणजे २७ जानेवारीपासून कंपनीने काम सुरू करणे अपेक्षित होते; मात्र कंपनीने हात झटकले.शहरात दररोज ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. डोअर टू डोअर कलेक्शन करण्याची जबाबदारी महापालिकेने बंगळुरू येथील कंपनीला दिली आहे. कंपनीने शहरातील १ मेट्रिक टन कचरा जमा केल्यास मनपा कंपनीला १८६३ रुपये देणार आहे. तीन महिन्यांपूर्वी मनपाने कंपनीला वर्क आॅर्डर दिली आहे. निविदेतील अटी-शर्थीनुसार कंपनीने स्वत:च्या मालकीची नवीन वाहने आणावीत. साधारणपणे ३०० रिक्षा, मोठी वाहने किमान १०० असावीत, असे नमूद केले आहे. कंपनीने आतापर्यंत ५० टक्केच वाहने आणली आहेत. वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही, मनपाने जागा द्यावी, अशी मागणी कंपनीने केली आहे. कंपनीने त्वरित काम सुरू करावे, अशी मनपाची इच्छा आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी काम सुरू करण्यास टाळाटाळ करीत आहे. मनपा प्रशासनाने आतापर्यंत तीन तारखा कंपनीला दिल्या. एकाही तारखेला कंपनीने काम सुरू केलेले नाही. प्रजासत्ताकदिनी बळजबरी महापालिकेने कंपनीच्या वाहनांचे पूजन करून कामाचा शुभारंभ झाला असे जाहीर केले. २७ जानेवारी रोजी कंपनी काम सुरू करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. रविवारी कंपनीने शहरातील एक किलो कचराही उचलला नाही.९०० कर्मचाºयांची गरजशहरातील ११५ वॉर्डांमधील प्रत्येक घरातून कचरा जमा करण्यासाठी कंपनीला किमान ९०० कर्मचारी लागणार आहेत. कंपनीकडे आतापर्यंत ४०० ते ४५० कर्मचारी आहेत. उर्वरित मनुष्यबळ कंपनीला मिळालेच नाही. कचरा उचलणारे कामगार सहजासहजी मिळायला तयार नाहीत.कंपनीवर दबावसिडको-हडकोमध्ये मागील २० ते २५ वर्षांपासून अस्थायी कामगार काम करीत आहेत. या कामगारांची संख्या जवळपास ४०० आहे. बचत गटामार्फत अनेक कर्मचारी नेमले आहेत. हे सर्व कर्मचारी कंपनीने कोणत्याही अटीशिवाय घ्यावेत म्हणून कंपनीवर दबाव टाकण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न