शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

कचरा संकलन करणाऱ्या कंपनीची मनपाला हूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:22 IST

शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याची जबाबदारी बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीवर टाकण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून कंपनी काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कंपनीने आणलेल्या वाहनांचे पूजन करण्यात आले. दुसºया दिवशी म्हणजे २७ जानेवारीपासून कंपनीने काम सुरू करणे अपेक्षित होते; मात्र कंपनीने हात झटकले.

ठळक मुद्देप्रजासत्ताकदिनी उद्घाटन : दुसºया दिवशी कामच सुरू केले नाही

औरंगाबाद : शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याची जबाबदारी बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीवर टाकण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून कंपनी काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कंपनीने आणलेल्या वाहनांचे पूजन करण्यात आले. दुसºया दिवशी म्हणजे २७ जानेवारीपासून कंपनीने काम सुरू करणे अपेक्षित होते; मात्र कंपनीने हात झटकले.शहरात दररोज ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. डोअर टू डोअर कलेक्शन करण्याची जबाबदारी महापालिकेने बंगळुरू येथील कंपनीला दिली आहे. कंपनीने शहरातील १ मेट्रिक टन कचरा जमा केल्यास मनपा कंपनीला १८६३ रुपये देणार आहे. तीन महिन्यांपूर्वी मनपाने कंपनीला वर्क आॅर्डर दिली आहे. निविदेतील अटी-शर्थीनुसार कंपनीने स्वत:च्या मालकीची नवीन वाहने आणावीत. साधारणपणे ३०० रिक्षा, मोठी वाहने किमान १०० असावीत, असे नमूद केले आहे. कंपनीने आतापर्यंत ५० टक्केच वाहने आणली आहेत. वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही, मनपाने जागा द्यावी, अशी मागणी कंपनीने केली आहे. कंपनीने त्वरित काम सुरू करावे, अशी मनपाची इच्छा आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी काम सुरू करण्यास टाळाटाळ करीत आहे. मनपा प्रशासनाने आतापर्यंत तीन तारखा कंपनीला दिल्या. एकाही तारखेला कंपनीने काम सुरू केलेले नाही. प्रजासत्ताकदिनी बळजबरी महापालिकेने कंपनीच्या वाहनांचे पूजन करून कामाचा शुभारंभ झाला असे जाहीर केले. २७ जानेवारी रोजी कंपनी काम सुरू करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. रविवारी कंपनीने शहरातील एक किलो कचराही उचलला नाही.९०० कर्मचाºयांची गरजशहरातील ११५ वॉर्डांमधील प्रत्येक घरातून कचरा जमा करण्यासाठी कंपनीला किमान ९०० कर्मचारी लागणार आहेत. कंपनीकडे आतापर्यंत ४०० ते ४५० कर्मचारी आहेत. उर्वरित मनुष्यबळ कंपनीला मिळालेच नाही. कचरा उचलणारे कामगार सहजासहजी मिळायला तयार नाहीत.कंपनीवर दबावसिडको-हडकोमध्ये मागील २० ते २५ वर्षांपासून अस्थायी कामगार काम करीत आहेत. या कामगारांची संख्या जवळपास ४०० आहे. बचत गटामार्फत अनेक कर्मचारी नेमले आहेत. हे सर्व कर्मचारी कंपनीने कोणत्याही अटीशिवाय घ्यावेत म्हणून कंपनीवर दबाव टाकण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न