शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
3
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

आखाडा बाळापूर तालुका निर्मितीच्या आशा पल्लवीत

By admin | Updated: June 15, 2014 00:37 IST

चंद्रमुनी बलखंडे, आ.बाळापूर राज्य शासनाने नुकतेच ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पालघर जिल्हा निर्मिती केल्याने आता आखाडा बाळापूरकरांच्याही आशा पल्लवीत झाल्या असून

चंद्रमुनी बलखंडे, आ.बाळापूर
राज्य शासनाने नुकतेच ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पालघर जिल्हा निर्मिती केल्याने आता आखाडा बाळापूरकरांच्याही आशा पल्लवीत झाल्या असून, कळमनुरी येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या आखाडा बाळापूर तालुका निर्मितीच्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कळमनुरी तालुक्याचे विभाजन करून नवीन आखाडा बाळापूर तालुका निर्माण करावा, ही आखाडा बाळापूरकरांची १९८१ पासूनची मागणी आहे.
बॅ. ए.आर. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी नवीन तालुका निर्मिती करत असताना बाळापूरचाही विचार केला जाईल, असे आश्वासन दिले होेते. त्यानंतर आलेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आखाडा बाळापूरकरांना आश्वासने दिली. युती शासनाच्या काळात सेनगाव, औंढा तालुका निर्मिती झाली; परंतु आखाडा बाळापूरचा विषय मागेच राहिला. तालुका निर्मिती करत असताना लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा, गावाची संख्याही मोठी आहे. ३० वर्षांपासूनची मागणी नेतृत्वाअभावी तशीच राहिली आहे; परंतु मागील वर्षी विद्यमान खा. राजीव सातव यांच्या जाहीर सभेच्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कळमनुरी येथे आखाडा बाळापूर तालुका निर्मितीची आशा पल्लवीत केली व जेव्हा केव्हा नवीन तालुका निर्मिती होईल, तेव्हा आखाडा बाळापूर अग्रस्थानी असेल, असे आश्वासन दिले होते. योगायोग म्हणजे त्यांच्याच कार्यकाळात काल नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्याने आता आखाडा बाळापूर तालुका निर्मितीच्या मागणीचा जोर वाढू लागला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत, पंचवीस हजारांच्या वर लोकसंख्या, मुख्य बाजारपेठ, शिवाय नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील २५ ते ३० गावांचा नित्याचा संपर्क बाळापुरशीच असतो. त्या गावांचीही मागणी बाळापूर तालुका निर्मितीची आहे. तालुका निर्माण झाल्यास त्यात समाविष्ट होण्याची त्यांची तयारीही आहे. कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शाखा असलेले महाविद्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिनिंग, दालमिल, पोस्ट आॅफिस, राष्ट्रीयीकृत चार बँकांसह ७ ते ८ बँका, खा. राजीव सातव यांच्या प्रयत्नातून येथे ग्रामीण रूग्णालय झालेले आहे. मुख्य म्हणजे, सशस्त्र सीमा बलाचे युनिटही हाकेच्या अंतरावर उभारले जात आहे. जवळच बोल्डा रेल्वेस्टेशन आहे. त्यामुळे तालुका निर्माण होण्यासाठी लागणारी सर्वच कार्यालये बाळापुरात आहेत. तालुका निर्माण झाल्यास पाटबंधारे विभागाची रिकामे कार्यालये, प्रशस्त जागाही आहे. परिसरातील गावांसाठी आखाडा बाळापूर मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे जनतेचा पैसा व वेळेचीही बचत होणार आहे. आता ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्हा निर्मिती करण्यात आल्याने आखाडा बाळापूर तालुका निर्मितीचा जोर वाढला आहे.
खा. राजीव सातव राष्ट्रीयस्तरावर कार्य करत असल्याने त्यांचा शब्द मुख्यमंत्री खाली जावू देणार नाहीत, हे जनतेला माहीत असल्याने त्यांच्याकडूनही अपेक्षा वाढल्या आहेत.