शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत गुंड, 'ब्लॅकमेलर' रोखा; वाळूज एमआयडीसीतील उद्योजकांची प्रशासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 12:30 IST

कोरोनाच्या संकटामुळे गत दीड-दोन वर्षांपासून उद्योजकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेकांची आर्थिक घडी विसकटली आहे.

ठळक मुद्देप्रतिकूल परिस्थिती असूनही उद्योग टिकवून ठेवण्यासाठी उद्योजकांचे प्रयत्न सुरू आहेत.औद्योगिक क्षेत्रात गत दोन-तीन वर्षांपासून गुंडगिरी व ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार वाढले आहेत.

वाळूज महानगर : औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरी करून उद्योजकांना विनाकारण त्रास देण्याचे प्रकार वाढतच चालल्याने उद्योग बंद पडण्याची भीती उद्योजकांतून वर्तविली जात आहे. गुंडगिरी व ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने वेळीच आवर घालण्याची गरज असल्याचा सूर उद्योजकांकडून आळवला जात आहे.

कोरोनाच्या संकटामुळे गत दीड-दोन वर्षांपासून उद्योजकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेकांची आर्थिक घडी विसकटली आहे. प्रतिकूल परिस्थिती असूनही उद्योग टिकवून ठेवण्यासाठी उद्योजकांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, औद्योगिक क्षेत्रात गत दोन-तीन वर्षांपासून गुंडगिरी व ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार वाढले आहेत. कंपनीत काम करताना कामगार जखमी झाल्यास किंवा अपघात झाल्यास गुंडगिरी करणारे कंपनीतील अधिकारी व उद्योजकांना धमक्या देतात. याशिवाय विविध धार्मिक उत्सव, महापुरुषांची जयंती व सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली गुंडगिरी करणारे कारखान्यात येऊन पैसे, तसेच अन्नधान्याची मदत करण्यासाठी दबाव आणतात. उद्योजकांनी मदतीस नकार देताच कंपनीच्या विरोधात शासकीय कार्यालयात तक्रारी करून उद्योजकांना त्रास देण्याचा प्रयत्न होतो.

औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभारावाळूज उद्योगनगरीचा झपाट्याने विस्तार झाला असून, लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याने न्याय मिळण्यास विलंब होतो. या भागात नागरी व औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्यासाठी शासनाने पावले उचलण्याची गरज आहे.- नारायण पवार (अध्यक्ष मसिआ संघटना)

गुंडांवर कडक कारवाई कराकंपनीत काम करताना कामगाराचा अपघात झाल्यास अथवा काही घटना घडल्यास गुंडगिरी व दहशत पसरवून उद्योजक व कारखान्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जातात. कामगारांवर अन्याय झाल्यास शासकीय यंत्रणेकडे दाद मागण्याऐवजी उद्योजकांना विनाकारण त्रास दिला जातो. या गुंडगिरी करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.- अजय गांधी (उद्योजक)

उद्योजकांना सुरक्षा देण्याची गरजउद्योगनगरीमुळे हजारो कामगारांना रोजगार मिळाला. शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. गत काही दिवसांपासून औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरीचे प्रमाण वाढल्याने उद्योजकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. या भागातील गुंडगिरी मोडून उद्योजकांच्या सुरक्षेवर भर देण्याची आवश्यकता आहे.- अनिल पाटील (उपाध्यक्ष- मसिआ संघटना )

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWaluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबाद