शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत गुंड, 'ब्लॅकमेलर' रोखा; वाळूज एमआयडीसीतील उद्योजकांची प्रशासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 12:30 IST

कोरोनाच्या संकटामुळे गत दीड-दोन वर्षांपासून उद्योजकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेकांची आर्थिक घडी विसकटली आहे.

ठळक मुद्देप्रतिकूल परिस्थिती असूनही उद्योग टिकवून ठेवण्यासाठी उद्योजकांचे प्रयत्न सुरू आहेत.औद्योगिक क्षेत्रात गत दोन-तीन वर्षांपासून गुंडगिरी व ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार वाढले आहेत.

वाळूज महानगर : औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरी करून उद्योजकांना विनाकारण त्रास देण्याचे प्रकार वाढतच चालल्याने उद्योग बंद पडण्याची भीती उद्योजकांतून वर्तविली जात आहे. गुंडगिरी व ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने वेळीच आवर घालण्याची गरज असल्याचा सूर उद्योजकांकडून आळवला जात आहे.

कोरोनाच्या संकटामुळे गत दीड-दोन वर्षांपासून उद्योजकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेकांची आर्थिक घडी विसकटली आहे. प्रतिकूल परिस्थिती असूनही उद्योग टिकवून ठेवण्यासाठी उद्योजकांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, औद्योगिक क्षेत्रात गत दोन-तीन वर्षांपासून गुंडगिरी व ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार वाढले आहेत. कंपनीत काम करताना कामगार जखमी झाल्यास किंवा अपघात झाल्यास गुंडगिरी करणारे कंपनीतील अधिकारी व उद्योजकांना धमक्या देतात. याशिवाय विविध धार्मिक उत्सव, महापुरुषांची जयंती व सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली गुंडगिरी करणारे कारखान्यात येऊन पैसे, तसेच अन्नधान्याची मदत करण्यासाठी दबाव आणतात. उद्योजकांनी मदतीस नकार देताच कंपनीच्या विरोधात शासकीय कार्यालयात तक्रारी करून उद्योजकांना त्रास देण्याचा प्रयत्न होतो.

औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभारावाळूज उद्योगनगरीचा झपाट्याने विस्तार झाला असून, लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याने न्याय मिळण्यास विलंब होतो. या भागात नागरी व औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्यासाठी शासनाने पावले उचलण्याची गरज आहे.- नारायण पवार (अध्यक्ष मसिआ संघटना)

गुंडांवर कडक कारवाई कराकंपनीत काम करताना कामगाराचा अपघात झाल्यास अथवा काही घटना घडल्यास गुंडगिरी व दहशत पसरवून उद्योजक व कारखान्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जातात. कामगारांवर अन्याय झाल्यास शासकीय यंत्रणेकडे दाद मागण्याऐवजी उद्योजकांना विनाकारण त्रास दिला जातो. या गुंडगिरी करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.- अजय गांधी (उद्योजक)

उद्योजकांना सुरक्षा देण्याची गरजउद्योगनगरीमुळे हजारो कामगारांना रोजगार मिळाला. शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. गत काही दिवसांपासून औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरीचे प्रमाण वाढल्याने उद्योजकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. या भागातील गुंडगिरी मोडून उद्योजकांच्या सुरक्षेवर भर देण्याची आवश्यकता आहे.- अनिल पाटील (उपाध्यक्ष- मसिआ संघटना )

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWaluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबाद