शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पुण्यदान, अस्थिविसर्जनातील पैसे-दागिने हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 20:29 IST

ही माणसं दिवसभर पाण्यात राहून आपला उदरनिर्वाह चालवितात.

- तारेख शेख 

कायगाव : औरंगाबाद- अहमदनगर राष्ट्रीय मार्गावरून जाताना जुने कायगाव येथे गोदावरी नदीच्या पुलावरून जाताना नेहमीच नदीपात्रात वीस-पंचवीस महिला-पुरुष मंडळी काहीतरी शोधताना नजरेस पडतात. सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही मंडळी नदीपात्रातच आपल्या उदरनिर्वाहासाठी शोध घेत असतात. नदीपात्रात नदीला दान करणे, तसेच पुण्य मिळवणे या हेतूने टाकलेले पैसे आणि अस्थिरक्षा या भागातील काही कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. 

मागील अनेक वर्षांपासून नदीपात्रात आपला रोजगार मिळविण्यासाठी येणारी ही माणसं दिवसभर पाण्यात राहून आपला उदरनिर्वाह चालवितात. पुलावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मात्र नेहमीच ही मंडळी पाण्यात काय बरे शोधत असतील, असा प्रश्न पडतो. दक्षिणेची गंगा म्हणून गोदावरी नदीला ओळखले जाते. हिंदू संस्कृतीनुसार गोदावरी नदीपात्राला मोठे महत्त्व असल्याने विविध धार्मिक विधी येथे पार पाडले जातात. यात अंत्यसंस्कार आणि दशक्रियांची संख्या मोठी असते.

औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांतील अनेक गावांतून जुने कायगावच्या गोदावरी नदीजवळ येऊन अंत्यसंस्कार आणि दशक्रिया विधी पार पाडण्यासाठी पसंती दिली जाते. अशावेळी मयताचा विधी पूर्ण झाल्यानंतर अस्थिरक्षा गोदापात्रात टाकल्या जातात. या अस्थिरक्षा नदीपात्रात मिसळल्या की, त्यांचा पाण्यात शोध घेऊन त्यातून काही सोन्या-चांदीची चीजवस्तू मिळते का, याचा शोध घेतला जातो. एवढ्या मोठ्या पात्रातून अशा वस्तू शोधणे म्हणजे मोठे जिकिराचे काम असते, तसेच औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांतून अनेक जण गोदापात्रात पुण्य मिळावे, यासाठी सुटी नाणी टाकतात. ही नाणी ही माणसे पाण्यातून शोधून काढतात. 

दिवसभरात प्रत्येकाला शंभर-दीडशेची कमाईदिवसभर काम केले की, एकेकाला शंभर-दीडशे रुपये तरी मिळतात. दोन-चार दिवसांतून एकदा नशिबाने एखाद्याला सोन्याची किंवा चांदीची एखादी वस्तू सापडते. या कामात येथील अनेक कुटुंबे आहेत. त्यांना त्यांची लहान मुलेही मदत करतात. नदीपात्रात डुबकी घेऊन चाळणीच्या साह्याने गाळ बाहेर काढायचा. चाळणीतून पाणी खाली पडत गेले की, नुसता गाळ आणि माती चाळणीत शिल्लक राहते. त्यात काही सापडले तर जमा करून बाजूला ठेवायचे आणि परत पाण्यात चाळणी टाकायची, असे काम दिवसभर चालूच असते. 

यंदा पाणी कमीयंदा कमी पर्जन्यामुळे गोदावरी म्हणावी तशी भरलेली नाही. त्यामुळे पात्रात पाणी कमी आहे. अशात पाण्यात पैसे आणि इतर वस्तूंचा शोध घेणे या मंडळींना सोपे जाते. 

ज्यांना कला जमली, त्यांचा फायदायाबाबत लहूबाल सोनवणे म्हणाले की, नदीपात्रात लोकांनी टाकलेल्या चिल्लर पैशांचा किंवा अस्थिरक्षातून दागिन्यांचा शोध घेणे ही एक कला आहे. ज्यांना ती जमली, त्यांचा फायदा जास्त होतो. आम्ही वर्षानुवर्षे हेच काम करीत असल्याने हे काम आम्हाला अंगवळणी पडले आहे.

भागीदारी वाढल्याने उत्पन्न कमीनदीपात्रात हे काम अगोदर कायगावातील काही मोजकीच कुटुंबे करायची, मात्र आता या कामात बाहेरील काही मंडळीही सहभागी झाली आहे. व्यवसायात भागीदारी वाढल्याने आता येथे वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांचे उत्पन्न कमी होत आहे, असे भाऊसाहेब फाजगे म्हणाले.

टॅग्स :godavariगोदावरीDeathमृत्यूMONEYपैसाSocialसामाजिक