शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

उच्चशिक्षितांसह नोकरी करणारेही बेरोजगारांच्या रांगेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 11:42 IST

महारोजगार मेळाव्यात १५३२ जणांना रोजगार, १,१९६ जणांची ॲप्रेंटिसशिपसाठी निवड

औरंगाबाद : कोणी इंजिनिअर्स, तर कोणी पदव्युत्तर पदवी धारण केलेले, एवढेच काय; सध्या नोकरीत असलेलेही बेरोजगारांच्या रांगेत उभे. ही परिस्थिती पाहायला मिळाली आयटीआय येथील महारोजगार मेळाव्यात.चांगली नोकरी मिळेल, या आशेने औरंगाबादच नव्हे, तर इतर जिल्ह्यातील युवक-युवतींनीही हा मेळावा गाठला होता. या मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशीही रोजगारासाठी इच्छुक उमेदवारांची एकच गर्दी पाहायला मिळाली. दोन दिवसांत १५३२ जणांना रोजगार मिळाला, तर १,१९६ जणांची ॲप्रेंटिसशिपसाठी निवड झाली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण आयोजित केलेल्या दोन दिवसीय प्रधानमंत्री कौशल्य विकास, उद्योजकता, ॲप्रेंटिसशिप व महारोजगार मेळाव्याचा रविवारी समारोप झाला.

शिकाऊ उमेदवारांची स्थितीविविध ६८ कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गत ३ हजार २० ॲप्रेंटिसशिपची पदे होती. यासाठी २ हजार ८७५ उमेदवारांनी नोंदणी केली. पैकी १,१९६ पात्र उमेदवारांची निवड झाली. या व्यतिरिक्त मेळाव्यात बारावी व्होकेशनल (किमान कौशल्य) शिक्षण घेतलेल्या २७३ उमेदवारांची २२ विविध कंपन्यांत निवड झाली, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभिजित आल्टे यांनी दिली.

रोजगारातील परिस्थितीदोन दिवसांत ३५१४ जणांच्या मुलाखती झाल्या. यात १,२५९ जणांची प्राथमिक निवड झाली, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त एस. आर. वराडे यांनी सांगितले.

काहींना फक्त आश्वासनमेळाव्यात एकूण ५३१२ पदे उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले होते. एकूण ६३८९ जणांनी नोंदणी केली. त्यात २७२८ जणांची निवड झाली. नंतर काॅल करू, असे सांगून पाठविण्यात आल्याचे काही उमेदवारांनी सांगितले.

एकाच जागी अनेक संधी या मेळाव्याच्या माध्यमातून एकाच जागी विविध कंपन्या आल्या. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. दोन कंपन्यांकडे अर्ज केला आहे.- विद्या छापरवाल

सध्या जाॅब सुरू, पण..मेळाव्यासाठी सिल्लोडहून आलो. यापूर्वी येथेच झालेल्या मेळाव्यात ॲप्रेंटिससाठी निवड झाली होती. अधिक वेतनाचा जाॅब मिळेल, या दृष्टीने आलो आहे.- अजिनाथ पडूळ

कुटुंबाची जबाबदारीमाझे एम. काॅम झालेले आहे. सध्याही जाॅब सुरू आहे. मात्र, कमी वेतन आहे. कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे चांगल्या वेतनाची नोकरी मिळेल, यासाठी आले.- अर्चना बुबने

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण