शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

उच्चशिक्षितांसह नोकरी करणारेही बेरोजगारांच्या रांगेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 11:42 IST

महारोजगार मेळाव्यात १५३२ जणांना रोजगार, १,१९६ जणांची ॲप्रेंटिसशिपसाठी निवड

औरंगाबाद : कोणी इंजिनिअर्स, तर कोणी पदव्युत्तर पदवी धारण केलेले, एवढेच काय; सध्या नोकरीत असलेलेही बेरोजगारांच्या रांगेत उभे. ही परिस्थिती पाहायला मिळाली आयटीआय येथील महारोजगार मेळाव्यात.चांगली नोकरी मिळेल, या आशेने औरंगाबादच नव्हे, तर इतर जिल्ह्यातील युवक-युवतींनीही हा मेळावा गाठला होता. या मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशीही रोजगारासाठी इच्छुक उमेदवारांची एकच गर्दी पाहायला मिळाली. दोन दिवसांत १५३२ जणांना रोजगार मिळाला, तर १,१९६ जणांची ॲप्रेंटिसशिपसाठी निवड झाली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण आयोजित केलेल्या दोन दिवसीय प्रधानमंत्री कौशल्य विकास, उद्योजकता, ॲप्रेंटिसशिप व महारोजगार मेळाव्याचा रविवारी समारोप झाला.

शिकाऊ उमेदवारांची स्थितीविविध ६८ कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गत ३ हजार २० ॲप्रेंटिसशिपची पदे होती. यासाठी २ हजार ८७५ उमेदवारांनी नोंदणी केली. पैकी १,१९६ पात्र उमेदवारांची निवड झाली. या व्यतिरिक्त मेळाव्यात बारावी व्होकेशनल (किमान कौशल्य) शिक्षण घेतलेल्या २७३ उमेदवारांची २२ विविध कंपन्यांत निवड झाली, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभिजित आल्टे यांनी दिली.

रोजगारातील परिस्थितीदोन दिवसांत ३५१४ जणांच्या मुलाखती झाल्या. यात १,२५९ जणांची प्राथमिक निवड झाली, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त एस. आर. वराडे यांनी सांगितले.

काहींना फक्त आश्वासनमेळाव्यात एकूण ५३१२ पदे उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले होते. एकूण ६३८९ जणांनी नोंदणी केली. त्यात २७२८ जणांची निवड झाली. नंतर काॅल करू, असे सांगून पाठविण्यात आल्याचे काही उमेदवारांनी सांगितले.

एकाच जागी अनेक संधी या मेळाव्याच्या माध्यमातून एकाच जागी विविध कंपन्या आल्या. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. दोन कंपन्यांकडे अर्ज केला आहे.- विद्या छापरवाल

सध्या जाॅब सुरू, पण..मेळाव्यासाठी सिल्लोडहून आलो. यापूर्वी येथेच झालेल्या मेळाव्यात ॲप्रेंटिससाठी निवड झाली होती. अधिक वेतनाचा जाॅब मिळेल, या दृष्टीने आलो आहे.- अजिनाथ पडूळ

कुटुंबाची जबाबदारीमाझे एम. काॅम झालेले आहे. सध्याही जाॅब सुरू आहे. मात्र, कमी वेतन आहे. कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे चांगल्या वेतनाची नोकरी मिळेल, यासाठी आले.- अर्चना बुबने

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण