शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

धोकादायक पेट्रोलपंप हटविण्यासाठी पावले उचलण्याचे खंडपीठाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 18:12 IST

पेट्रोलपंप हटवून नागरिकांचे जीवन सुसह्य बनविण्यासाठी महापालिका आणि राज्य शासनाने चार महिन्यांत पावले उचलावीत, असे निर्देश खंडपीठाने दिले

औरंगाबाद : शहरातील वारसास्थळांना अडथळा आणि धोका निर्माण करणारे पेट्रोलपंप हटवून नागरिकांचे जीवन सुसह्य बनविण्यासाठी महापालिका आणि राज्य शासनाने चार महिन्यांत पावले उचलावीत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी दिले आहेत. 

पुरातत्वीय वारसास्थळांकडे जाणारे अरुंद रस्ते पुरेसे विस्तारित करून त्यांच्या विकासासाठी सहा महिन्यांत निधी उपलब्ध करून द्यावा. पुरातत्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठवावा. राज्य शासनाने वारसास्थळ म्हणून घोषित केलेल्या ऐतिहासिक आणि पुरातत्वीय संरक्षित वास्तूंचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने कायद्यात तरतूद केल्याप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे, असेही खंडपीठाने म्हटले आहे. 

शहरातील आठ पेट्रोलपंप बेकायदा असल्याचा आक्षेप घेत ते शहराबाहेर हलविण्याची विनंती सामाजिक कार्यकर्ते शाहीद अस्लम यांनी जनहित याचिकेद्वारे केली होती. याचिकेत आठ खाजगी पेट्रोलपंपचालक, इंडियन आॅईल, बीपीएल, एचपी आणि रिलायन्स या चार पेट्रोलियम कंपन्या, वक्फ बोर्ड, महापालिका, केंद्र शासन, पुरातत्व विभाग, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आदी ३२ जणांना प्रतिवादी करण्यात आले होते.

औरंगाबादचे ऐतिहासिक महत्त्व दुर्लक्षून चालणार नाही. औरंगजेबच्या काळापासून शहराला महत्त्व आहे. औरंगजेबने आपल्या आयुष्याचा मोठा कालावधी येथे व्यतित केलेला आहे. वारसास्थळांसंबंधी प्रशासन जागरूक नसल्याने पर्यटक फिरकत नाहीत. सातवाहन, चालुक्य व राष्ट्रकु ट आदींचे  येथे राज्य होते. राज्य शासन त्यांचे कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार राज्य शासनाने आणि महापालिका प्रशासनाने चार महिन्यांत निर्णय घ्यावा. वारसास्थळांच्या विकासासाठी संबंधित विभागांकडून अंदाजपत्रक मागवून विकास  करण्यात यावा, असे खंडपीठाने स्पष्ट केले. 

याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. रूपा दक्षिणी यांनी काम पाहिले. शासनातर्फे अ‍ॅड. महिंद्र नेरलीकर, प्रतिवादींतर्फे अ‍ॅड. ए. पी. भंडारी, अ‍ॅड. जयंत शहा, अ‍ॅड. एस. व्ही. क्षीरसागर, अ‍ॅड. ए. एस. देशपांडे, अ‍ॅड. एस. एस. काझी, अ‍ॅड. यू. ए. भडगावकर, अ‍ॅड. संकेत कुलकर्णी, अ‍ॅड. आर. एम. जोशी यांनी काम पाहिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPetrol Pumpपेट्रोल पंपAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ