शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

हर्सूल तलाव तुडुंब, बघ्यांची गर्दी वाढल्याने पोलीस बंदोबस्त वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 16:18 IST

rain in Aurangabad : शहराची लोकसंख्या वाढत गेल्याने जायकवाडीहून पाणी आणणे सुरू झाले. मात्र, हर्सूलचा उपसा आजही कायम आहे.

ठळक मुद्दे१९५४ साली निजाम स्टेटने हर्सूल तलाव बांधला. १९७५ पर्यंत शहराची तहान हर्सूल तलावातून भागत होती.

औरंगाबाद : मंगळवारी रात्री झालेल्या अवघ्या दीड तासांच्या मुसळधार पावसाने हर्सूल तलाव ( hersul lake) तुडुंब भरला. २८ फूट तलावाची उंची आहे. तलाव भरण्यासाठी फक्त ६ फूट पाण्याची गरज होती. मध्यरात्री २ वाजता तलाव ओसंडून वाहू लागला. सकाळी सोशल मीडियावर ( social media ) तलाव भरल्याचे फोटो व्हायरल होताच बघ्यांची एकच गर्दी झाली. दुपारी पाेलिसांना तलावाच्या सांडवा परिसरात बंदोबस्त तैनात करावा लागला.

हर्सूल तलाव भरल्याने शहरातील १६ पेक्षा अधिक वॉर्डांमधील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मागील वर्षीही तलाव पूर्णपणे भरला होता. त्यामुळे उन्हाळा संपेपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध होते. सोमवारी तलावात २४ फुटांपर्यंत पाणी होते. मंगळवारी रात्री झालेल्या ढगफुटीने तलाव तुडुंब भरला. रात्री सांडव्यातून पाणी बाहेर पडू लागले. नदीपात्राच्या परिसरात अनेक वसाहती आहेत. पावसाचे पाणी वाढले तर अनेक वसाहतींमधील नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ मनपावर आलेली आहे. बुधवारी सकाळीच मनपाने काही वसाहतींमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता अशोक पद्मे यांनी दिली. हर्सूल तलाव भरल्याचे काही फोटो सकाळीच सोशल मीडियावर व्हायरल झाले. तरुणाई सकाळीच तलावाच्या सांडवा परिसरात गर्दी करू लागली. दुपारी गर्दी रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला.

खाम नदी वाहू लागली आहेगतवर्षी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने पालिकेने येथील जलशुद्धीकरण यंत्रणा दुरुस्त करून जुन्या शहरातील काही भागांना पाणीपुरवठा सुरू केला होता. उन्हाळ्यातही तलावात पाणी असल्याने आवश्यकतेनुसार 3 ते 4 एमएलडी पाण्याचा उपसा पालिकेकडून केला जात असे. याप्रमाणे आजवर पाणीपुरवठा सुरू आहे. आता तलाव पूर्णपणे भरल्याने 4 ते 5 एमएलडी पाणी उपसा करून जुन्या शहरातील आणखी वाॅर्डांत हे पाणी वळविले जाईल. त्यातून जायकवाडी धरणातील पाणी इतर भागांना वळवून त्यांना मुबलक पाणीपुरवठा करता येईल, असे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी स्पष्ट केले.

दररोज ५ एमएलडी पाण्याचा वापर१९५४ साली निजाम स्टेटने हर्सूल तलाव बांधला. १९७५ पर्यंत शहराची तहान हर्सूल तलावातून भागत होती. नहरींच्या पाण्याचीही शहराला मदत होत होती. शहराची लोकसंख्या वाढत गेल्याने जायकवाडीहून पाणी आणणे सुरू झाले. मात्र, हर्सूलचा उपसा आजही कायम आहे. शहरातील १६ पेक्षा अधिक वॉर्डांना आजही हर्सूलचेच पाणी देण्यात येते. दररोज ५ एमएलडी पाण्याचा उपसा मनपाकडून करण्यात येतो.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसhersul lakeहर्सूल तलाव