शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

हर्सूल तलाव तुडुंब, बघ्यांची गर्दी वाढल्याने पोलीस बंदोबस्त वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 16:18 IST

rain in Aurangabad : शहराची लोकसंख्या वाढत गेल्याने जायकवाडीहून पाणी आणणे सुरू झाले. मात्र, हर्सूलचा उपसा आजही कायम आहे.

ठळक मुद्दे१९५४ साली निजाम स्टेटने हर्सूल तलाव बांधला. १९७५ पर्यंत शहराची तहान हर्सूल तलावातून भागत होती.

औरंगाबाद : मंगळवारी रात्री झालेल्या अवघ्या दीड तासांच्या मुसळधार पावसाने हर्सूल तलाव ( hersul lake) तुडुंब भरला. २८ फूट तलावाची उंची आहे. तलाव भरण्यासाठी फक्त ६ फूट पाण्याची गरज होती. मध्यरात्री २ वाजता तलाव ओसंडून वाहू लागला. सकाळी सोशल मीडियावर ( social media ) तलाव भरल्याचे फोटो व्हायरल होताच बघ्यांची एकच गर्दी झाली. दुपारी पाेलिसांना तलावाच्या सांडवा परिसरात बंदोबस्त तैनात करावा लागला.

हर्सूल तलाव भरल्याने शहरातील १६ पेक्षा अधिक वॉर्डांमधील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मागील वर्षीही तलाव पूर्णपणे भरला होता. त्यामुळे उन्हाळा संपेपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध होते. सोमवारी तलावात २४ फुटांपर्यंत पाणी होते. मंगळवारी रात्री झालेल्या ढगफुटीने तलाव तुडुंब भरला. रात्री सांडव्यातून पाणी बाहेर पडू लागले. नदीपात्राच्या परिसरात अनेक वसाहती आहेत. पावसाचे पाणी वाढले तर अनेक वसाहतींमधील नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ मनपावर आलेली आहे. बुधवारी सकाळीच मनपाने काही वसाहतींमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता अशोक पद्मे यांनी दिली. हर्सूल तलाव भरल्याचे काही फोटो सकाळीच सोशल मीडियावर व्हायरल झाले. तरुणाई सकाळीच तलावाच्या सांडवा परिसरात गर्दी करू लागली. दुपारी गर्दी रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला.

खाम नदी वाहू लागली आहेगतवर्षी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने पालिकेने येथील जलशुद्धीकरण यंत्रणा दुरुस्त करून जुन्या शहरातील काही भागांना पाणीपुरवठा सुरू केला होता. उन्हाळ्यातही तलावात पाणी असल्याने आवश्यकतेनुसार 3 ते 4 एमएलडी पाण्याचा उपसा पालिकेकडून केला जात असे. याप्रमाणे आजवर पाणीपुरवठा सुरू आहे. आता तलाव पूर्णपणे भरल्याने 4 ते 5 एमएलडी पाणी उपसा करून जुन्या शहरातील आणखी वाॅर्डांत हे पाणी वळविले जाईल. त्यातून जायकवाडी धरणातील पाणी इतर भागांना वळवून त्यांना मुबलक पाणीपुरवठा करता येईल, असे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी स्पष्ट केले.

दररोज ५ एमएलडी पाण्याचा वापर१९५४ साली निजाम स्टेटने हर्सूल तलाव बांधला. १९७५ पर्यंत शहराची तहान हर्सूल तलावातून भागत होती. नहरींच्या पाण्याचीही शहराला मदत होत होती. शहराची लोकसंख्या वाढत गेल्याने जायकवाडीहून पाणी आणणे सुरू झाले. मात्र, हर्सूलचा उपसा आजही कायम आहे. शहरातील १६ पेक्षा अधिक वॉर्डांना आजही हर्सूलचेच पाणी देण्यात येते. दररोज ५ एमएलडी पाण्याचा उपसा मनपाकडून करण्यात येतो.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसhersul lakeहर्सूल तलाव