शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

हर्सूल तलाव कधीही होऊ शकतो 'ओव्हरफ्लो'; खाम नदीपात्रातील खड्डे बुजविणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 19:24 IST

महापालिकांने खाम नदीपात्रालगतच्या वसाहतींमधील नागरिकांना स्वत:हून स्थलांतरित होण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देजलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरूतलाव भरण्यासाठी एका मोठ्या पावसाची प्रतीक्षा

औरंगाबाद : ऐतिहासिक हर्सूल तलाव भरण्यासाठी एका मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. मागील २४ तासांमध्ये तलावाची पाणीपातळी फक्त दोन इंचांनी वाढली. २८ फूट पाणीपातळी झाल्यावर तलावातील पाणी खाम नदीपात्रातून वाहते.  पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळावा म्हणून रविवारी महापालिकेने पात्रातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. तत्पूर्वी, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी  पाणीपातळीचा आढावा घेतला.

महापालिकांने शनिवारी रात्री भोंगे लावून खाम नदीपात्रालगतच्या वसाहतींमधील नागरिकांना स्वत:हून स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. १४ वर्षांपूर्वी नदीपात्रात मोठा पूर आल्याने महापालिकेने नागरिकांना स्थलांतरित केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोठे स्थलांतरित व्हावे, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. तलावाची पातळी शनिवारी रात्री वाढली नाही. मात्र, महापालिकेने रविवारी सकाळपासून पात्रातील खड्डे बुजविणे सुरू केले. पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळावा हा उद्देश असल्याचे कार्यकारी अभियंता धांडे यांनी सांगितले. हर्सूल तलाव ओसंडून वाहणार, असे भाकीत महापालिकेने केले होते. त्यामुळे शेकडो नागरिक रविवारी  तलावाच्या पात्राजवळ गेले. दोन फुटांनी पाणी  वाढल्यावर पात्रात पडेल, असे उपअभियंता अशोक पद्मे यांनी सांगितले.

जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरूपावसाळ्याला अजून दोन महिने शिल्लक आहेत. दोन महिने तलावातील पाणी नदीपात्रात वाहून जाईल. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तलावातील पाण्याचा वापर करून नागरिकांना पिण्यासाठी करता यावा म्हणून आज युद्धपातळीवर जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू केले. विद्युत विभागाचे थोडेसे काम बाकी आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी ट्रायल घेण्याचे काम महापालिकेने आजपासून सुरू केले. तलावातून दररोज तीन ते चार एमएलडी पाण्याचा उपसा सहजपणे करता येऊ शकतो. जुन्या शहरातील तब्बल १८ वॉर्डांना पाणीपुरवठा करता येऊ शकतो. सध्या १ लाख ८० हजार नागरिकांना जायकवाडीचे पाणी देण्यात येत आहे. हर्सूल तलावाचे पाणी उपलब्ध झाल्यास जायकवाडीवरील ताण बराच हलका होणार आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादhersul lakeहर्सूल तलाव