छत्रपती संभाजीनगर : रेल्वेस्टेशनची नवीन भव्य दिव्य इमारतीच्या मधोमध एक झाड आजही भक्कमपणे उभे आहे आणि या झाडाच्या फांद्यांवर पुन्हा एकदा बगळ्यांनी आपले गणगोत वसवले आहे. बगळ्यांनी झाडावर घरटी तयार केली आहे. गतवर्षी नव्या इमारतीसाठी याच झाडावर कुऱ्हाडीचे घाव पडणार होते. मात्र, ‘लोकमत’च्या वृत्ताने हे झाड वाचवून नव्या इमारतीचे बांधकाम रेल्वे प्रशासनाला करावे लागले.
नव्या इमारतीच्या बांधकामात अडथळा ठरणारी झाडे तोडण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी सहजतेने मिळावी, यासाठी झाडांवरील बगळ्यांची घरटे स्थलांतरित करण्यात आली. याविषयी ‘लोकमत’ने ६ ऑगस्ट २०२४ रोजी ‘पुन्हा उसवतंय गणगोत सारं’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत वन विभागाने रेल्वे स्टेशन परिसरात दुसऱ्याच दिवशी धाव घेतली. यावेळी बगळ्यांची पिले परिसरातील अन्य झाडांवर स्थलांतरित करण्यासाठी बांबूच्या टोपल्या वापरल्याचे समोर आले होते.
वृत्तानंतर इमारतीच्या डिझाइनमध्ये केला बदल७ ऑगस्ट रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. ज्या झाडांवर कुऱ्हाड पडणार होती, ती झाडे वृत्तामुळे वाचली. झाडे वाचवून बांधकाम करण्यासाठी इमारतीच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला. त्यानंतर अखेर ही झाडे वाचवून इमारतीचे बांधकाम करण्यात आले. झाडाच्या बाजूने इमारतीचे बांधकाम करण्यात आले. आता या झाडांवर बगळ्यांनी पुन्हा घरटी बांधली आहेत.
पक्षांचा संसार आता नव्याने सुरू‘लोकमत’ने रेल्वे स्टेशन परिसरातील सारंगा घर असलेल्या झाडांची बातमी केली. रेल्वे प्रशासनाच्या नवीन इमारतीच्या आराखड्यामध्ये बांधकामात बगळ्यांचे वास्तव्य आहे, अशी तोडली जाणारी झाडे आता वाचली आहेत. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या पक्षांचा संसार आता नव्याने येथे सुरू झालेला आहे, हे समाधानाची भाव आहे. लोकमत वृत्तपत्राचे पर्यावरणप्रेमींकडून आभार व्यक्त करण्यात करताे.- डाॅ. किशोर पाठक, मानद वन्यजीवरक्षक