शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

'यहां से एक कमल दिल्ली भेज दो'; छत्रपती संभाजीनगरची जागा भाजप लढण्यावर शिक्कामोर्तब 

By विकास राऊत | Updated: March 6, 2024 11:24 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे छत्रपती संभाजीनगरमधील सभेतून स्पष्ट संकेत

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपच लढणार असल्याचे स्पष्ट संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणातून मंगळवारी मिळाले. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी येथे कमळ फुलविण्याचे आवाहन त्यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील जाहीर सभेत केले. मागच्या वेळी जी चूक केली, ती चूक यावेळी करू नका, असे आवाहन यावेळी उपस्थित नेत्यांनी केले. 

भाजपने हा मतदारसंघ लढण्याची पूर्ण तयारी केल्याचे सभेच्या नियोजनातून दिसून आले. तसेच कमळ या चिन्हावरच ही लोकसभा लढली जाणार असल्याचेदेखील स्पष्ट होत आहे. शाह हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवस होते. त्यांनी स्थानिक नेत्यांसह राज्यातील प्रमुख नेत्यांशी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अहमदनगर क्लस्टरच्या बाबतीत चर्चा केल्यानंतर सायंकाळी सभेत येथे कमळ फुलविण्याचे आवाहन केले. एमआयएम आणि भाजप अशी थेट लढत लोकसभेच्या रणसंग्रामात पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.

सभेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी आ. पंकजा मुंडे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, राहुल लोणीकर, नगरचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, रिपाइंचे बाबूराव कदम, आदींची भाषणे झाली.

नामकरणावरून फडणवीसांनी टार्गेट केले ठाकरेंनाया शहराला संभाजीनगर असे नाव दिले पाहिजे, अशी पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा केली. पण दुर्दैवाने त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना अडीच वर्षे याबाबत जाग आली नाही. ज्यावेळी सरकार अल्प मतात आले, त्यावेळी शेवटच्या क्षणी ठराव केल्याचा आरोप करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘टार्गेट’ केले. शिंदे सरकार आल्यावर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करून प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंजुरी दिली. मागच्या लोकसभा निवडणुकीत चुकीच्या पद्धतीने मतदान केले तर काय होते, त्याचे परिणाम आपण पाहतो आहोत. चूक केल्यामुळे सगळ्या चांगल्या उपक्रमांना विरोध करणाऱ्यांच्या यादीत शहराचे नाव गेले. ३७०, राम मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत जे आपले होते, ते देखील त्यांच्याच रांगेत जाऊन बसले. त्यामुळे यावेळी चूक करू नका, काही थेट विरोधात येतील, काही बहुरूपी तयार झाले आहेत. इकडे हिंदुत्वाचे नारे देतात, तिकडे ठाकरेंना जनाब असे संबोधतात. अशांना ओळखण्याचे आवाहन त्यांनी केले.

केंद्र शासनाने जिल्ह्याला भरभरून दिले...शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत शहराचा पाणीप्रश्न मिटेल, असा दावा करीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळेस १६८० कोटी रुपये योजनेसाठी मंजूर केले. मात्र, २०१९ मध्ये दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार आले. योजनेची निविदा काढायला सरकारला दीड वर्ष लागले. त्यामुळे योजनेला उशीर झाला. आता योजनेचे काम गतीने सुरू आहे. शहराला स्मार्ट सिटीसाठी १ हजार कोटी केंद्र शासनाने दिले. साडेचार हजार कोटींची पीएनजी गॅस योजना आहे. प्रत्येक घराला गॅस मिळणार असून, ६० हजार घरांमध्ये कनेक्शन देण्याचे काम झाले आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे. हवामानाची अचूक माहिती मिळावी, यासाठी १५० कोटींचे सी-डॉप्लर रडार मंजूर झाले आहे. वंदे भारत रेल्वे, ३०० कोटींचे रेल्वे स्टेशन, पीटलाईनचे उद्घाटन, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम सुरू असून, केंद्र शासनाने जिल्ह्याला भरभरून दिले आहे, असे डॉ. कराड म्हणाले.

आम्ही तर जागा मागितली आहे....छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीमध्ये भाजपनेच लढवावी, अशी मागणी आम्ही केली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील येथून कमळ फुलवा, असे आवाहन केल्यामुळे आमच्या मागणीला बूस्ट मिळाल्यासारखेच आहे.- शिरीष बोराळकर, शहर जिल्हाध्यक्ष

मतदार यावेळी चूक करणार नाहीत.....मतदार मागच्या निवडणुकीसारखी चूक यावेळी करणार नाहीत. केंद्र शासनाने केलेली कामे, तसेच राममंदिर, कलम ३७० आणि महिलांसाठी आरक्षण इ. कामे मोदी सरकारच्या काळात झाली आहेत. देशाची आर्थिक घडी बसवून देशाला तिसऱ्या आर्थिक महासत्तेच्या दिशेने नेण्याचे काम मोदी करीत आहेत. सभेचे वातावरण पाहता छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा महायुतीचाच होईल. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भाषणातून देखील तसेच संकेत मिळाले आहेत.- डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाlok sabhaलोकसभाShiv Senaशिवसेना