शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

'तिचे' मॅनेजमेंट परफेक्ट असते'; अभियांत्रिकीनंतर इच्छाशक्तीच्या जोरावर उभारले स्वतःचे उद्योगविश्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 13:32 IST

जास्तीत जास्त युवतींनी नोकरीपेक्षा उद्योग व्यवसायाकडे वळावे. त्यासाठी पैसा नाही, तर जिद्द, तीव्र इच्छाशक्तीची गरज असते.

औरंगाबाद : अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची खूणगाठ बांधली होती. दुसऱ्यांची मदत न घेता स्वबळावर उद्योग करण्याचा विचार होता. महिलांना स्वत:चा उद्योग सुरू करणे ही तेवढी सोपी गोष्ट नसते. पदवीचे शिक्षण झाले; पण उद्योग सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल नव्हते. मात्र, जिद्दीच्या जोरावर प्रीती पाटील-गुळवे यांनी स्वत:चे उद्योगविश्व उभे केले असून, क्वॉलिटी मेकॅट्रोनिक्सच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स पार्टस्ची निर्मिती व पुरवठ्याचे काम त्या यशस्वीरीत्या करीत आहेत. 

प्रीती पाटील-गुळवे सांगतात, २००९ मध्ये पदवी घेतल्यानंतर सुरुवातीला काही दिवस जॉब केला. उद्योग सुरू करायचा म्हणजे त्यासाठी थोडेबहुत भांडवल लागते. म्हणून २०१२ मध्ये स्वत:ची एक कन्सल्टन्सी सुरू केली. २०१४ पासून जॉबवर्क सुरू केले. बागला ग्रुपसाठी स्टार्टर रिले असेंब्ली हा जॉब तयार केला जायचा. त्याच वर्षी लग्न झाले. पती मुंबईला नोकरी करीत होते; परंतु त्यांनी तुझे स्वप्न हे माझे स्वप्न आहे, या भूमिकेतून मला उद्योगासाठी सहकार्य केले. दोन वर्षांपूर्वी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू केला आहे. 

कंपनीमध्ये पीसीबीचे (प्रिंटेड सर्किट बोर्ड) उत्पादन केले जाते. या उद्योगाची वार्षिक उलाढाल २ कोटी रुपयांची आहे. स्त्री-पुरुष समानता हा विचार केवळ व्याख्यानात किंवा ऐकण्यापुरता चांगला वाटतो; पण कृतीत मात्र दिसत नाही. स्त्री उद्योग करू शकते किंवा तिने तो करावा, असे कुटुंबालाही वाटत नाही. एवढेच नाही, तर मोठ्या उद्योगांनासुद्धा हा विचार पटत नसावा कदाचित. व्हेंडरशिप डेव्हलपमेंटसाठी कर्तृत्ववान महिलेला प्राधान्य दिले पाहिजे, असा विचार मोठ्या उद्योगांनी करावा. उद्योगांमध्ये कर्तृत्ववान महिलांचा सहभाग वाढला पाहिजे.

महिलांचे मॅनेजमेंट परफेक्ट असतेजास्तीत जास्त युवतींनी नोकरीपेक्षा उद्योग व्यवसायाकडे वळावे. त्यासाठी पैसा नाही, तर जिद्द, तीव्र इच्छाशक्तीची गरज असते. महिला जर घरसंसार सांभाळू शकते, तर ती उद्योगसुद्धा व्यवस्थित चालवू शकते. तिचे मॅनेजमेंट परफेक्ट असते. यासाठी मोठ्या कंपन्या असतील किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महिलांना व्हेंडरशिपसाठी आरक्षण ठेवले पाहिजे. त्यासाठी टर्नओव्हरची अट नसू नये. शासनानेदेखील या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. यामुळे उद्योग-व्यवसायाकडे युवतींचाही कल वाढेल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWomen's Day Specialजागतिक महिला दिनbusinessव्यवसाय