शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एक एक विकेट पडत आहे, ४० गद्दारांचे विधासभेत काय होईल: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 13:34 IST

हेमंत पाटील, भावना गवळींचे तिकीट कापल्यावरून आदित्य ठाकरे यांची टीका

छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेन, उद्धव साहेबांनी अनेक नेत्यांना अनेकदा खासदार बनवलं. पण आता तुम्ही पाहत असाल एक व्यक्ती अशी आहे की ज्यांना पाच वेळा खासदार बनवलं आज त्यांना दहा तास उभे राहून सुद्धा तिकीट नाही मिळालं, दुसऱ्या एकालाही तिकीट नाही मिळाले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भावना गवळी आणि हेमंत पाटील यांच नाव न घेता केली. तसेच आता ४० गद्दारांनी विचार करावा की विधानसभेत आपलं काय होईल, असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी दिला.

आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधला. पुढे ठाकरे म्हणाले, आणखी दोन-तीन जणांची तिकीट कापली जाणार आहेत. जी गद्दारी करायची होती, उद्धव साहेबांसोबत पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायचा होता. तो त्यांनी केला, त्यांनी महाराष्ट्रासोबत बेईमानी केलेली आहे. यांना मिळवायचे तरी काय होते ? असा सवाल ठाकरे यांनी केला. 

एकाही उमेदवार पडला तर राजीनामा देईल, असे म्हणणारे आता तिकीट पण देऊ शकत नाहीत. असे हाल शिंदे गटाचे सध्या आता सुरू आहेत. आता पुढचे चाळीस गद्दार आहे त्यांनी सुद्धा आता विधानसभेत विचार करावा की आपलं नक्की काय होईल. कारण आता दिसत आहे, एक एक विकेट पडत आहे. 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपा यांना उमेदवारच मिळत नाही. भाजपाने दोन उमेदवार जाहीर केलेले आहे तेही मुंबई विरोधी आणि महाराष्ट्र विरोधी आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेत, शिवसेनेन तर सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. 

हेमंत पाटील अन् भावना गवळींचा पत्ता कटशिवसेना शिंदे गटाकडून हिंगोलीतील जाहीर उमेदवार बदलण्यात आला असून हिंगोलीतील विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पाटील यांची उमेदवार रद्द करुन हिंगोलीतून बाबुराव कदम कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भावना गवळी यांना देखील पक्षाने उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यवतमाळ- वाशिम लोकसभेसाठी यावेळी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना संधी  दिली आहे. त्यामुळे, शिंदेंच्या शिवसेनेवर उमेदवार बदलण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद