शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

एक एक विकेट पडत आहे, ४० गद्दारांचे विधासभेत काय होईल: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 13:34 IST

हेमंत पाटील, भावना गवळींचे तिकीट कापल्यावरून आदित्य ठाकरे यांची टीका

छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेन, उद्धव साहेबांनी अनेक नेत्यांना अनेकदा खासदार बनवलं. पण आता तुम्ही पाहत असाल एक व्यक्ती अशी आहे की ज्यांना पाच वेळा खासदार बनवलं आज त्यांना दहा तास उभे राहून सुद्धा तिकीट नाही मिळालं, दुसऱ्या एकालाही तिकीट नाही मिळाले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भावना गवळी आणि हेमंत पाटील यांच नाव न घेता केली. तसेच आता ४० गद्दारांनी विचार करावा की विधानसभेत आपलं काय होईल, असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी दिला.

आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधला. पुढे ठाकरे म्हणाले, आणखी दोन-तीन जणांची तिकीट कापली जाणार आहेत. जी गद्दारी करायची होती, उद्धव साहेबांसोबत पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायचा होता. तो त्यांनी केला, त्यांनी महाराष्ट्रासोबत बेईमानी केलेली आहे. यांना मिळवायचे तरी काय होते ? असा सवाल ठाकरे यांनी केला. 

एकाही उमेदवार पडला तर राजीनामा देईल, असे म्हणणारे आता तिकीट पण देऊ शकत नाहीत. असे हाल शिंदे गटाचे सध्या आता सुरू आहेत. आता पुढचे चाळीस गद्दार आहे त्यांनी सुद्धा आता विधानसभेत विचार करावा की आपलं नक्की काय होईल. कारण आता दिसत आहे, एक एक विकेट पडत आहे. 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपा यांना उमेदवारच मिळत नाही. भाजपाने दोन उमेदवार जाहीर केलेले आहे तेही मुंबई विरोधी आणि महाराष्ट्र विरोधी आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेत, शिवसेनेन तर सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. 

हेमंत पाटील अन् भावना गवळींचा पत्ता कटशिवसेना शिंदे गटाकडून हिंगोलीतील जाहीर उमेदवार बदलण्यात आला असून हिंगोलीतील विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पाटील यांची उमेदवार रद्द करुन हिंगोलीतून बाबुराव कदम कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भावना गवळी यांना देखील पक्षाने उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यवतमाळ- वाशिम लोकसभेसाठी यावेळी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना संधी  दिली आहे. त्यामुळे, शिंदेंच्या शिवसेनेवर उमेदवार बदलण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद