शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

हेल्पलाईन १०९८/११२; कृती दलाने वर्षभरात रोखले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७५ बालविवाह

By विजय सरवदे | Updated: May 9, 2024 16:52 IST

शासकीय यंत्रणा सतर्क, अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली असून वर्षभरात ७५ बालविवाह रोखण्यात कृती दलाला यश आले आहे. त्यातील तीन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, १० मे रोजी ‘अक्षय तृतीया’ असून हा मुहूर्त साधून बालविवाह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा, तालुका व गावपातळीवरील शासकीय यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. एन. चिमंद्रे यांनी कळविले आहे की, बालविवाह होत असल्याची किंवा तशी तयारी केली जात असल्याचा संशय आल्यास सजग नागरिकांनी यासंबंधीची माहिती शासनापर्यंत पोहोचवावी. संबंधितांचे नावाची गोपनीयता राखली जाईल. जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनाकरीता जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ च्या कायद्याची जाणीव व्हावी, यासाठी तसेच बालवयात कोणताही बालक हक्कांपासून वंचित राहू नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने कार्यवाही करण्याचे कामकाज सुरू आहे. बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये मुलीचे वय १८ वर्षे, तर मुलाचे वय २१ वर्षांच्या आत असताना विवाह केल्यास तो विवाह बालविवाह म्हणून गणला जातो. त्यासाठी १ लाख रुपये दंड व २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा किंवा दोन्ही, असे शिक्षेचे प्रावधान आहे.

ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारीगावपातळीवर ग्रामसेवक, तर नागरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आपल्या परिसरात वा गावात बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास आपण संबंधितांकडे माहिती देऊ शकता.

हेल्पलाईन १०९८ किंवा ११२जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असतील किंवा होऊ घातले असतील, तर नागरिकांनी चाईल्ड हेल्प लाईन १०९८ किंवा ११२ या क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. बालविवाहाबाबतची माहिती जवळचे पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, बालकल्याण समिती, जिल्हा बालसंरक्षण कक्ष तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयातही देता येईल.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी