शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एमआयएमची विधानसभेसाठी महाविकास आघाडीला साद; राज्यातील ३० जागांवर चाचपणीही सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 18:22 IST

एमआयएमला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीचा फायदाच, इम्तियाज जलील यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेची लाट विधानसभेतही राहील, या भ्रमात शरद पवार, उद्धव ठाकरेंनी राहू नये. एमआयएम पक्षाला सोबत घेतल्यास त्यांना फायदाच होईल, अन्यथा नंतर पराभव झाल्यास आम्हाला जबाबदार धरू नका, असे सांगत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएम पक्ष महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचे बुधवारी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलील यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, माझा लोकसभेतला पराभव हा जरांगे फॅक्टरमुळे झाला. एकटा लढूनही मी दुसऱ्या क्रमांकावर राहिलो, यातच पक्षाचे जिल्ह्यातील महत्व स्पष्ट होते. शरद पवार यांची अद्याप मी भेट घेतलेली नाही. मात्र, महाविकास आघाडीसोबत एमआयएम विधानसभा निवडणूक लढण्यास तयार आहे. आम्ही अनावश्यक मागण्या करणार नाही. आघाडीच्या नेत्यांनी एमआयएमचे महत्व ओळखून सहभागी करून घ्यावे. मी चर्चेसाठी कधीही यायला तयार आहे. पण नकार दिल्यास नंतरच्या पराभवाला आम्हाला जबाबदार धरू नका, असा इशारा देखील त्यांनी दिला. शिवाय, २९ ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुढील आराखडा निश्चित करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

३० जागांसाठी चाचपणीशहरातील मध्य, पूर्व मतदारसंघासह राज्यातील ३० जागांसाठी आमची चाचपणी सुरू आहे. बीड, मालेगाव, विदर्भ व मुंबईतील दोन मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित असून ३० जागांसाठी चाचपणी सुरू आहे. शहरात माझ्यासह सर्व इच्छुकांच्या अनुषंगाने मोठ्या एजन्सीतर्फे सर्व्हे सुरू आहे. त्यांच्या निष्कर्षानंतर उमेदवार व मतदारसंघ निश्चित केला जाईल, हे सांगताना जलील यांनी स्वत: विधानसभा लढणार असल्याचेही संकेत दिले.

आघाडी, युतीत खंजीर घेऊन बसतातसध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत बिकट आहे. महाविकास आघाडी, महायुतीमधील नेते सोबत खंजीर घेऊन एकमेकांसोबत राहतात. यातील कोण कधी खंजीर उपसेल, याचा अंदाज नाही. मात्र, समविचारी पक्षांनी एकत्र आल्यास निश्चित फायदाच, असेही जलील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी