शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

Lok Sabha Election 2019 : शांतीगिरी महाराजांच्या गैरहजेरीत जय बाबाजी परिवाराची आ.जाधव यांना साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:23 PM

जय बाबाजी परिवाराने लोकसभा निवडणूक मैदानातील अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली.

ठळक मुद्देजय बाबाजी परिवाराचा पाठिंबा ही महाराजांची भूमिका नाही आ.जाधव यांना सात कलमी मागण्यांच्या आधारे पाठिंबा दिला आहे.

औरंगाबाद : वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतल्यानंतर गुरुवारी मठाशी निगडित असलेल्या जय बाबाजी परिवाराने लोकसभा निवडणूक मैदानातील अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देण्याची भूमिका वेरूळ येथे पत्रकार परिषदेत जाहीर केली. विशेष म्हणजे ही घोषणा परिवार आणि राजकीय समितीने केली असून, यावेळी शांतीगिरी महाराज यांची उपस्थिती नव्हती.

मठाचे सचिव रामानंद महाराज यांनी सांगितले, परिवाराने पाठिंबा जाहीर केला ही महाराजांची भूमिका नाही; परंतु त्यांच्या परवानगीने हे घडले आहे. महाराज ओझर येथे अनुष्ठानाला असल्यामुळे ते गैरहजर होते. दरम्यान, प्रचारप्रमुख राजेंद्र पवार यांनी आ. जाधव यांचे मोबाईलवरून शांतीगिरी महाराज यांच्याशी बोलणे करून दिल्याचा दावा केला. यावेळी उमेदवार आ. जाधव यांनी युतीचे उमेदवार विद्यमान खा. चंद्रकांत खैरे सक्षम नसल्याचा आरोप केला, केंद्रातील अनेक योजना त्यांना जिल्ह्यात आणता आल्या नसल्याचेही ते म्हणाले. काकासाहेब गोरे, झुंबर मोडके, राजाभाऊ पानगव्हाणे, साहेबराव आगळे, रवींद्र घोडके, शेकनाथ होळकर आदींची यावेळी उपस्थिती होती. कुठलेही मानधन न घेता परिवाराचे ५० वाहने प्रचारात उतरणार आहेत. हा निर्णय फक्त औरंगाबादपुरता मर्यादित असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

१ लाख ४० हजार सदस्य ठरणार गेमचेंजरजय बाबाजी परिवाराचे १ लाख ४० हजार सदस्य आहेत. हे सदस्य मठाशी निगडित असून ते गेमचेंजर ठरतील, असा दावा प्रचारप्रमुख पवार यांनी केला. आ. जाधव हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत. पाणीपुरवठा, शहर स्वच्छता, कचऱ्यामुळे संभाजीनगरची (औरंगाबादची) बदनामी झाली. जाती-पातीचे राजकारण सुरू झाले आहे, उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारी वाढत आहे. सामाजिक एकोपा संपला आहे. शेतकरी त्रस्त असून, ग्रामीण रस्त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. विद्यमान खासदाराने कामे केली नाहीत काय? ते युतीचे उमेदवार आहेत, मोदींनाच पाठिंबा देणार आहेत. २० वर्षांत त्यांनी काही नाही केले का? यावर पवार म्हणाले, आजवर खैरेंनाच पाठिंबा दिला; परंतु यावेळी परिवाराशी चर्चा, पाहणी केल्यानंतर मतदान वाया जाऊ नये म्हणून आ.जाधव यांना सात कलमी मागण्यांच्या आधारे पाठिंबा दिला आहे. जय बाबाजी परिवारात जास्तीचे सदस्य मराठा समाजाचे आहेत, त्यामुळे त्यांचा दबाव होता म्हणून पाठिंबा दिला काय? यावर पवार म्हणाले, हा सर्वसमावेशक चर्चेअंती निर्णय झाला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019