शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

कन्नड तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार; नदीकाठच्या गावांनी रात्र जागून काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 15:55 IST

Rain in Aurangabad : बुधवारी सकाळी पुर ओसरल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला.

कन्नड ( औरंगाबाद ) : मंगळवारी दिवसभर आणि रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पुर आला आहे. पुराचे पाणी आणखी वाढेल या धास्तीने नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. तालुक्यात आठही महसुल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे अंबाडी धरण ओव्हर फ्लो झाले आहे.  अतिवृष्टीमुळे शिवना नदीला आलेल्या महापुराने हाहाकार माजवला आहे. रात्रीच्या वेळी आलेल्या महापुराने अंधानेर, शिवनानगर, बहिरगाव, डोनगाव, हतनुर या गावातील ग्रामस्थांनी भीतीपोटी रात्र जागून  काढली. बुधवारी सकाळी पुर ओसरल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला.

हेही वाचा - जालना रोडचे झाले तळे; नॅशनल हायवे ॲथॉरिटीने केलेला १३ कोटींचा खर्च खड्ड्यात

शिवना नदीवरील हतनुर येथील कोल्हापुरी बंधारा पुरामुळे फुटला आहे. जळगावघाट ते जैतापुर रस्त्यावरील पुल वाहून गेला. चिवळी येथे मातीनालाबांध फुटला तर नदीकाठच्या शेतांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी-नाल्यांच्या पुराचे पाणी ओसरत असतांनाच बुधवारी सकाळी पावसाची रिपरिप पुन्हा सुरु झाली आहे.

महसुल मंडळ निहाय बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मागील २४ तासात पडलेला पाऊस :  कन्नड ११६ मिमी, चापानेर १५० मिमी, देवगाव ११० मिमी, चिकलठाण ११० मिमी, पिशोर ११७ मिमी, करंजखेडा ११२ मिमी,नाचनवेल ७७ मिमी व चिंचोली ७४ मिमी

हेही वाचा - जायकवाडीतील पाणीसाठा ५० टक्क्यांकडे; स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने आवक वाढली

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद