शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

मराठवाड्याला अतिवृष्टीचा तडाखा; ८३ मंडळांत पावसाचा जोर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 14:04 IST

मराठवाड्याला १६ तारखेपासून पावसाचा तडाखा बसतो आहे.

ठळक मुद्दे मराठवाड्याला १६ तारखेपासून पावसाचा तडाखा बसतो आहे. नांदेड व परभणी या दोन जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्याला १६ तारखेपासून पावसाचा तडाखा बसतो आहे. १६ रोजी १८३ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाल्यानंतर २० आॅगस्टच्या पावसाने ८३ मंडळांत अतिवृष्टीच्या पुढे जाऊन पावसाने हजेरी लावली.  नांदेड व परभणी या दोन जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील वडोदबाजार, बनोटी, चिंचोली लिंबाजी मंडळांत ६५ मि.मी.च्या पुढे पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यातील तळणी मंडळात, परभणीतील पिंगळी, पालम, पूर्णा, ताडकळस, देऊळगाव, पाथरी, हदगाव, तर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, माळहिवरा, सिरसम, वासंबा, कळमनुरी, नांदापूर, आ. बाळापूर, हयातनगर, औंढा नागनाथ, जवळाबाजार, येहळेगाव, साळना मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, तुप्पा, विष्णुपुरी, वसरणी, वजिराबाद, नांदेड ग्रामीण, लिंबगाव, तरोड, मुदखेड, मगळ, बारड, अर्धापूर, दाभाड, मालेगाव, भोकर, किणी, मोगाळी, मातूळ, उमरी, सिंधी, गोळेगाव, कंधार, कुरुला, उस्मानपूर, पेठवडज, फुलवळ, बरूळ, लोहा, माळाकोळी, कलंबर, सोनखेड, शिवडी, कापशी, किनवट, जलधारा, शिवणी, हदगाव, तामसा, पिंपरखेड, तळणी, आष्टी, हिमायतनगर, सरसम, जवळगाव, खानपूर, शहापूर, बिलोली, आदमपूर, लोहगाव, कुंडलवाडी, धर्माबाद, जरिकोट, करखेली, नायगाव, नरसी, मांजरम, बरवडा, कुंटूर, मुखेड मंडळांत अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात पिंपळगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. 

६ दिवसांत १८ टक्के पाऊससहा दिवसांत मराठवाड्यात १८ टक्के पाऊस वाढला आहे. १६ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ४० टक्क्यांवर पाऊस येऊन थांबला होता. त्यामुळे विभागातील खरीप हंगाम धोक्यात असल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाने शासनाला दिला होता. १६ रोजी पावसाने पुनरागमन करीत मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली. या सहा दिवसांत विभागात १८ टक्के इतका पाऊस झाला आहे. आजवर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. १८ टक्क्यांनी पाऊस वाढला असला तरी खरीप हंगामाला त्याला किती लाभ होईल हे सांगता येणार नाही.

तीन जिल्ह्यांत नुकसाननांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसामुळे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झालेल्या मंडळांतील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरून तेथील संसार उघड्यावर आले आहेत.  

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाweatherहवामान