शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

मराठवाड्याला अतिवृष्टीचा तडाखा; ८३ मंडळांत पावसाचा जोर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 14:04 IST

मराठवाड्याला १६ तारखेपासून पावसाचा तडाखा बसतो आहे.

ठळक मुद्दे मराठवाड्याला १६ तारखेपासून पावसाचा तडाखा बसतो आहे. नांदेड व परभणी या दोन जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्याला १६ तारखेपासून पावसाचा तडाखा बसतो आहे. १६ रोजी १८३ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाल्यानंतर २० आॅगस्टच्या पावसाने ८३ मंडळांत अतिवृष्टीच्या पुढे जाऊन पावसाने हजेरी लावली.  नांदेड व परभणी या दोन जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील वडोदबाजार, बनोटी, चिंचोली लिंबाजी मंडळांत ६५ मि.मी.च्या पुढे पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यातील तळणी मंडळात, परभणीतील पिंगळी, पालम, पूर्णा, ताडकळस, देऊळगाव, पाथरी, हदगाव, तर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, माळहिवरा, सिरसम, वासंबा, कळमनुरी, नांदापूर, आ. बाळापूर, हयातनगर, औंढा नागनाथ, जवळाबाजार, येहळेगाव, साळना मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, तुप्पा, विष्णुपुरी, वसरणी, वजिराबाद, नांदेड ग्रामीण, लिंबगाव, तरोड, मुदखेड, मगळ, बारड, अर्धापूर, दाभाड, मालेगाव, भोकर, किणी, मोगाळी, मातूळ, उमरी, सिंधी, गोळेगाव, कंधार, कुरुला, उस्मानपूर, पेठवडज, फुलवळ, बरूळ, लोहा, माळाकोळी, कलंबर, सोनखेड, शिवडी, कापशी, किनवट, जलधारा, शिवणी, हदगाव, तामसा, पिंपरखेड, तळणी, आष्टी, हिमायतनगर, सरसम, जवळगाव, खानपूर, शहापूर, बिलोली, आदमपूर, लोहगाव, कुंडलवाडी, धर्माबाद, जरिकोट, करखेली, नायगाव, नरसी, मांजरम, बरवडा, कुंटूर, मुखेड मंडळांत अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात पिंपळगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. 

६ दिवसांत १८ टक्के पाऊससहा दिवसांत मराठवाड्यात १८ टक्के पाऊस वाढला आहे. १६ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ४० टक्क्यांवर पाऊस येऊन थांबला होता. त्यामुळे विभागातील खरीप हंगाम धोक्यात असल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाने शासनाला दिला होता. १६ रोजी पावसाने पुनरागमन करीत मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली. या सहा दिवसांत विभागात १८ टक्के इतका पाऊस झाला आहे. आजवर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. १८ टक्क्यांनी पाऊस वाढला असला तरी खरीप हंगामाला त्याला किती लाभ होईल हे सांगता येणार नाही.

तीन जिल्ह्यांत नुकसाननांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसामुळे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झालेल्या मंडळांतील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरून तेथील संसार उघड्यावर आले आहेत.  

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाweatherहवामान