शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सिल्लोड, जालना, माहुरात मुसळधार; हिंगोलीत सर्वदूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 15:07 IST

शेतीतील पेरण्यांना वेग येणार 

ठळक मुद्देकुंडलिका नदीवरील दोन्ही बंधारे भरलेनांदेड जिल्ह्यात दमदार प्रतीक्षा

औरंगाबाद : जालना शहरासह माहूरमध्ये मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली, तर हिंगोली शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. औरंगाबाद शहरातही सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत रिपरिप सुरू होती. 

जालना शहर व परिसरात मंगळवारी दुपारी अडीचनंतर पावसाला प्रारंभ झाला. मेघगर्जनेसह दमदार पाऊस झाल्याने सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. कुंडलिका नदीवर बांधलेले दोन्ही बंधारे भरून वाहिल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पेरण्यांना आता वेग येणार आहे. 

जालना जिल्ह्यात २२ जून नंतर पावसाला प्रारंभ झाला होता. विशेष करून जिल्ह्याच्या उत्तरेस असलेल्या भोकरदन तालुक्यातील पारध, दानापूर, जळगाव सपकाळ, हिसोडा परिसरात दमदार पाऊस झाला. यामुळे दानापूर येथील जुई धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झाला आहे. त्यामुळे भोकरदन शहरातील जवळपास ४० टॅकर बंद झाले आहेत. जालना जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत १०४. ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अपेक्षित पावसाच्या ८५ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे.

माहूर शहरात मुसळधार पाऊसनांदेड : जिल्ह्यात माहूर येथे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला़ तर किनवट तालुक्यातील मांडवीतही पावसाने दमदार हजेरी लावली़ नांदेड जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नसून, मंगळवारी माहूरात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली़ जवळपास तासभर पाऊस बरसत होता़ तर किनवट तालुक्यातील मांडवीतही यावर्षीचा मोठा पाऊस आज झाला़ निवघाबाजार आणि नांदेड शहरात मात्र रिमझिम पाऊस सुरु होता़ 

पावसाने बळीराजा सुखावलाहिंगोली : हिंगोली शहरात दुपारी १२ वाजता हलक्या सरी बरसल्या. जवळपास अर्धातास पाऊस झाला. तर कनेरगाव नाका, आखाडा बाळापूर, वारंगा फाटा येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ, पोत्रा परिसरातही दमदार पाऊस झाला. वसमत तालुक्यातील अडगाव रंजे, हट्टा, कौठा परिसरात रिमझिम पाऊस झाला. सेनगाव तालुक्यातही रिमझिम पाऊस झाला. औंढा नागनाथ तालुक्यात सरी बरसल्या. तसेच सवना, बासंबा व कळमनुरी, नांदापूर या ठिकाणी पाऊस झाला. काही भागात शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. मंगळवारी झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. 

सिल्लोड तालुक्यात पावसाने मोठे नुकसान : सिल्लोड तालुक्यात मंगळवारी रात्री मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सिल्लोड शहर, शिवना, मादनी, वाघेरा, आमसरी, अजिंठा परिसरात अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन वाहून गेली. कन्नड तालुक्यातील हतनूर परिसरातही मुसळधार पाऊस झाला.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीAurangabadऔरंगाबादJalanaजालना