शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका; नुकसान भरपाईसाठी १६०० कोटींची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 12:22 IST

मराठवाड्यात चार वर्षांपासून खरीप हंगाम अतिपावसामुळे वाया जातो आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाला यंदा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. जुलैमध्ये ५ लाख ८७ हजार ४६६.४१ तर ऑगस्टमध्ये १ लाख ४० हजार ३३१.४४ असे ७ लाख २७ हजार ७९७.८५ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्याला नुकसान भरपाईसाठी १ हजार ५९६ कोटी ९१ लाख ५७ हजार रुपयांचा निधी लागण्याचा प्रस्ताव ६ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्तालय राज्य शासनाला सादर करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ३ हेक्टरपर्यंत भरपाई देण्याचे १० ऑगस्ट रोजी जाहीर केले. तसेच अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानाचाही मोबदला मिळण्याची घोषणा केल्यामुळे विभागाला जास्तीचा निधी लागणार आहे.

मराठवाड्यात चार वर्षांपासून खरीप हंगाम अतिपावसामुळे वाया जातो आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. २३ जूननंतर दमदार पाऊस विभागात सुरू झाला. जुलैमध्ये नांदेड, हिंगोली, लातूर पाठोपाठ जालना आणि काही प्रमाणात बीड या पाच जिल्ह्यांत खरीप पिकाचे नुकसान होत शेतजमीन वाहून गेली. शासन किती रुपयांची मदत जाहीर करणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. अद्याप शासनाने काहीही मदत जाहीर केलेली नाही.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरी