शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

औरंगाबादेत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:33 IST

रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसाने औरंगपुरा व टाऊन सेंटर भागात पाणी साचले होते.

ठळक मुद्देआला रे आला : खडकेश्वर, बेगमपुºयात झाडे उन्मळून पडली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसाने औरंगपुरा व टाऊन सेंटर भागात पाणी साचले होते. खडकेश्वर येथे वृक्ष उन्मळून पडले. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही, तर गारखेडा, उल्कानगरीत वीजपुरवठा खंडित झाला होता. शहराचे तापमान कमाल ३९.६ व किमान २५ मिमी इतके नोंदवले गेले.शहरात दुपारपर्यंत कडक ऊन पडले होते. घराबाहेर पडलेल्यांना उकाड्यामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या. दुपारनंतर हळूहळू आकाशात ढगांची गर्दी झाली आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अनेक भागांत जोरदार पावसास सुरुवात झाली. असह्य झालेल्या उकाड्यापासून सुटका झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या पावसामुळे औरंगपुरा, टाऊन सेंटर व शहरातील काही सखल भागांत पावसाचे पाणी साचले होते. या पावसाचा बच्चेकंपनीने मनसोक्त आनंद लुटला. खडकेश्वर मंदिर परिसरात वृक्ष उन्मळून पडले. यात जीवित हानी झाली नसल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाºयांनी सांगितले. या पावसाने उल्कानगरी, गारखेडा व परिसरात जवळपास ३ तास वीजपुरवठा खंडित होता.सखल भागात पाणीशुक्रवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने अनेक भागांत व रस्त्याच्या कडेला पाणी साचले होते, तर काही नागरिकांनी पावसाचे पाणी साठविण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद जिल्ह्याची ६७५ मि.मी इतकी पर्जन्यमान सरासरी आहे. १ जून रोजी ४.३४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद होणे अपेक्षित होते; परंतु तेवढा पाऊस झाला नाही. आजवरच्या सरासरीनुसार १२.८९ मि.मी. पावसाची नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.पैठणमध्ये ४ जण गंभीर; कन्नडमध्ये ४ गायींचा मृत्यूपैठण तालुक्यात होनोबाची वाडी येथे जवळपास सर्वच घरांवरील पत्रे उडाल्याची घटना घडली. यामुळे ४ जण गंभीर जखमी झाले, तर कन्नड येथील बसस्थानक परिसरात ४ गायींचा ंिभंतीखाली दबून मृत्यू झाला, तर फुलंब्री शहरात १५ मिनिटे गारांचा पाऊस झाला. पावसासह जोरदार वाºयामुळे वृक्ष उन्मळून पडले, तर काही विद्युत खांबही कोसळले.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादelectricityवीज