शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

ऊन वाढले; टायरकडे दुर्लक्ष पडू शकते महाग ! नायट्रोजन की साधी हवा, कोणती उपयुक्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 11:48 IST

तुम्ही टायरची वेळोवेळी देखभाल करीत असाल तरी ते कालांतराने हळूहळू खराब होतात.

छत्रपती संभाजीनगर : तुमच्याकडे दुचाकी असो, चारचाकी असो वा व्यावसायिक वाहन; तुम्ही स्वत:ची गाडी स्वच्छ दिसावी यासाठी वॉशिंग करीत असतात. मात्र, वाहनाचे चाकही तेवढेच महत्त्वाचे असते. टायरमध्ये हवा जास्त किंवा कमी असेल, टायरच्या देखभालीकडे दुर्लक्ष करीत असाल तर एखाद्या वेळेस हा निष्काळजीपणा जिवावर बेतू शकतो.

तापमान वाढतेयशहराचे तापमान हळूहळू वाढू लागले आहे. मागील १० वर्षांचा विचार केल्यास आतापर्यंत शहराचे तापमान सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले आहे.

उन्हाळ्यात टायर का फुटतात ?उन्हाळ्यात रस्ते गरम झालेले असतात. आता सर्वत्र सिमेंटचे रस्ते आहेत. सिमेंट जास्त तापत असते. अशा वेळी जर टायरमधील हवा जास्त किंवा कमी झाली तर टायर फुटण्याची शक्यता जास्त असते. टायरमधील हवा हळूहळू दाबामुळे कमी कमी होऊ लागते. यामुळे ‘माइलेज’ही कमी होऊ लागते. हवा कमी असली तर चाक घासून त्याची झीज होते, तसेच पिकअप घेताना जास्त ताकद लावते, यामुळे इंधन जास्त लागते.

किती किलोमीटरला टायर बदलावे ?तुम्ही टायरची वेळोवेळी देखभाल करीत असाल तरी ते कालांतराने हळूहळू खराब होतात. खराब टायर वाहनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करीत असते. कारचे टायर सरासरी पाच वर्षे किंवा ५० हजार किमी चालते. नव्या टायरवरील ट्रेड डेप्थ आठ ते नऊ मिलिमीटर इतकी असते. रबराची जाडी नंतर कमीकमी होत जाते. ट्रेड डेप्थ १,६ मिलिमीटर किंवा त्यापेक्षा कमी झाली तर तो टायर बदलण्याची वेळ आली आहे, हे लक्षात घ्यावे.

टायरमध्ये नायट्रोजन अधिक सुरक्षितवाहन कोणतेही असो उन्हाळ्यात गरम होतातच. यामुळे टायरचे आयुष्यही कमी होते. यासाठी ट्यूबमध्ये नायट्रोजन भरल्यास टायर थंड राहते व टायरचे आयुष्यदेखील वाढते.- मुन्नाभाई गॅरेजवाले

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघात