शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

'मे' अखेरीला वाढला उन्हाचा चटका; ढगाळ वातावरणात शहरवासीय उकाड्याने हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 19:23 IST

गत महिन्यात २४ तारखेला कमाल तापमानाने ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला होता.

औरंगाबाद : शहरात मे महिन्याच्या अखेरीला उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. तापमानाचा पारा रविवारी (दि. १९) ४१ अंशांजवळ गेला. जून महिन्याच्या तोंडावर उकाडा वाढत असल्याने शहरवासीय चांगलेच घामाघूम होत आहेत.

चिकलठाणा वेधशाळेत रविवारी कमाल तापमान ४०.८ आणि किमान तापमान २६.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. गत महिन्यात २४ तारखेला कमाल तापमानाने ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला होता. २६ एप्रिल १९५८ रोजी इतकेच तापमान नोंदविले गेले होते. तब्बल ६१ वर्षांनंतर याच उच्चांकी तापमानाचा रेकॉर्ड झाला. त्यानंतर मात्र तापमानाचा पारा उतरला.

शहरात १ मे नंतर तापमान ३८ अंशांपर्यंत घसरले होते; परंतु आता गेल्या आठवडाभरापासून तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली. सलग आठवडाभर तापमान ४० अंशांवरच राहिले. मे महिन्याच्या अखेरीला वाढत्या तापमानाबरोबर शहरात अधूनमधून ढगाळ वातावरण राहत आहे. मात्र, अशा वातावरणातही शहरात चांगलाच उकाडा जाणवत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही अवघड होत आहे. वाढत्या उकाड्याने अंगाची लाहीलाही होत आहे. घामाच्या धारांनी प्रत्येक जण त्रस्त होत आहे.

४० अंशांवरच पाराआगामी आठवडाभर तापमानाचा पारा हा ४० अंशांवरच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. 

टॅग्स :Heat Strokeउष्माघातAurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण