शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

पर्यटनाच्या राजधानीचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:00 IST

शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, पसरलेली दुर्गंधी आणि माशांच्या वाढत्या उपद्रवामुळे अतिसारासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) गॅस्ट्रोचे रोज ५ ते ६ रुग्ण दाखल होत आहेत.

ठळक मुद्देगॅस्ट्रोचे आगमन : औरंगाबाद शहरात २५ हजार मेट्रिक टन कचरा सडतोय; वाढत्या दुर्गंधीमुळे नागरिकांचा संयम आता हळूहळू सुटू लागला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, पसरलेली दुर्गंधी आणि माशांच्या वाढत्या उपद्रवामुळे अतिसारासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) गॅस्ट्रोचे रोज ५ ते ६ रुग्ण दाखल होत आहेत.दुसरीकडे, घाटीत ‘आरएल’ यासारखी आवश्यक औषधी रुग्णालयात उपलब्ध नसल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागत असल्याचे चित्र आहे.दूषित पाण्याचा वापर व अनेक ठिकाणी कचरा तसाच पडलेला असल्याने याचाही नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. विविध ठिकाणी साचलेल्या कचºयावर डास, माशा बसतात. त्याच माशा उघड्यावर विक्री केल्या जाणाºया हातगाड्यावरील खाद्यपदार्थांवर बसतात. यातून संसर्ग होऊन हे अन्न दूषित होते. तसेच या गाड्यांवर काम करणाºया व्यक्तींचे हात स्वच्छ नसणे हेही एक कारण यामागे असून, या अन्नपदार्थांचे सेवन केल्यानेही गॅस्ट्रोची लागण होत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. तसेच काही ठिकाणी जलस्रोत दूषित होत आहेत. याचाही फटका नागरिकांना बसत आहे. दूषित पाणी प्यायल्याने गॅस्ट्रोसारखा संसर्गजन्य आजार जडतो. जुलाब, उलटी होणे यातूनच रुग्णाला अशक्तपणा येतो. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मेडिसीन बिल्डिंगच्या वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गॅस्ट्रोची लागण झालेले ५ ते ६ रुग्ण दाखल होत आहेत. त्यातच या वॉर्डामध्ये अत्यावश्यक असलेली औषधी उपलब्ध नसल्याने रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागत आहे.१६ फेबु्रवारीपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. मागील पाच महिन्यांमध्ये शहरात जिकडे तिकडे २५ हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. कचरा प्रश्नावर महापालिकेने आतापर्यंत अनेक प्रयोग करून पाहिले. कोट्यवधी रुपये खर्च करूनही मनपाला यश आले नाही. कचराकोंडीमुळे शहरात पर्यटकांची संख्याही झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिका प्रशासन कचºयावर प्रक्रिया करणाºया मशीन खरेदी करण्यात मग्न आहे.गॅस्ट्रोची लागण होण्याची कारणे....दूषित अन्न, दूषित पाणी, माशा, अस्वच्छ हातांद्वारे या संसर्गजन्य आजाराची लागण होते. त्यामुळे उघड्यावरील अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे, तसेच बाहेरचे पाणी शक्यतो पिऊ नये, असा सल्ला डॉक्टारांनी दिला आहे.सध्या घाटी रुग्णालयात विविध औषधींचा तुटवडा आहे. औषधी खरेदीसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात ती मान्य झाल्यास औषधी उपलब्ध करून दिली जाईल.- डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल