शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

पर्यटनाच्या राजधानीचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:00 IST

शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, पसरलेली दुर्गंधी आणि माशांच्या वाढत्या उपद्रवामुळे अतिसारासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) गॅस्ट्रोचे रोज ५ ते ६ रुग्ण दाखल होत आहेत.

ठळक मुद्देगॅस्ट्रोचे आगमन : औरंगाबाद शहरात २५ हजार मेट्रिक टन कचरा सडतोय; वाढत्या दुर्गंधीमुळे नागरिकांचा संयम आता हळूहळू सुटू लागला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, पसरलेली दुर्गंधी आणि माशांच्या वाढत्या उपद्रवामुळे अतिसारासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) गॅस्ट्रोचे रोज ५ ते ६ रुग्ण दाखल होत आहेत.दुसरीकडे, घाटीत ‘आरएल’ यासारखी आवश्यक औषधी रुग्णालयात उपलब्ध नसल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागत असल्याचे चित्र आहे.दूषित पाण्याचा वापर व अनेक ठिकाणी कचरा तसाच पडलेला असल्याने याचाही नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. विविध ठिकाणी साचलेल्या कचºयावर डास, माशा बसतात. त्याच माशा उघड्यावर विक्री केल्या जाणाºया हातगाड्यावरील खाद्यपदार्थांवर बसतात. यातून संसर्ग होऊन हे अन्न दूषित होते. तसेच या गाड्यांवर काम करणाºया व्यक्तींचे हात स्वच्छ नसणे हेही एक कारण यामागे असून, या अन्नपदार्थांचे सेवन केल्यानेही गॅस्ट्रोची लागण होत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. तसेच काही ठिकाणी जलस्रोत दूषित होत आहेत. याचाही फटका नागरिकांना बसत आहे. दूषित पाणी प्यायल्याने गॅस्ट्रोसारखा संसर्गजन्य आजार जडतो. जुलाब, उलटी होणे यातूनच रुग्णाला अशक्तपणा येतो. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मेडिसीन बिल्डिंगच्या वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गॅस्ट्रोची लागण झालेले ५ ते ६ रुग्ण दाखल होत आहेत. त्यातच या वॉर्डामध्ये अत्यावश्यक असलेली औषधी उपलब्ध नसल्याने रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागत आहे.१६ फेबु्रवारीपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. मागील पाच महिन्यांमध्ये शहरात जिकडे तिकडे २५ हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. कचरा प्रश्नावर महापालिकेने आतापर्यंत अनेक प्रयोग करून पाहिले. कोट्यवधी रुपये खर्च करूनही मनपाला यश आले नाही. कचराकोंडीमुळे शहरात पर्यटकांची संख्याही झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिका प्रशासन कचºयावर प्रक्रिया करणाºया मशीन खरेदी करण्यात मग्न आहे.गॅस्ट्रोची लागण होण्याची कारणे....दूषित अन्न, दूषित पाणी, माशा, अस्वच्छ हातांद्वारे या संसर्गजन्य आजाराची लागण होते. त्यामुळे उघड्यावरील अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे, तसेच बाहेरचे पाणी शक्यतो पिऊ नये, असा सल्ला डॉक्टारांनी दिला आहे.सध्या घाटी रुग्णालयात विविध औषधींचा तुटवडा आहे. औषधी खरेदीसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात ती मान्य झाल्यास औषधी उपलब्ध करून दिली जाईल.- डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल