शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आरोग्यमंत्र्यांनी फोडले बांधकाम खात्यावर खापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 02:29 IST

औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी आयोजित केलेल्या बैठकीवेळी ते पत्रकारांशी बोलत होते. टोपे म्हणाले, भंडारा येथील दुर्घटनेच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीत बदल करण्यात आला आहे.

औरंगाबाद : राज्यभरात प्रत्येक रुग्णालयाचे १०० टक्के इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल आणि  फायर ऑडिट केले जाणार आहे. परंतु, साधी भिंत पडली किंवा विद्युतीकरणाचे काम असेल तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र द्यावे लागते. आम्ही आरोग्य सेवेचे काम करतो. स्ट्रक्चरल ऑडिट आमचा विषय नाही, पण  आम्ही ते करवून घेणार आहोत. उपचारात कमी पडलो नाही, तर विद्युतीकरणाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना घडली असावी, असे म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भंडारा येथील दुर्घटनेचे खापर एकप्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागावर फोडले.  

औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी आयोजित केलेल्या बैठकीवेळी ते पत्रकारांशी बोलत होते. टोपे म्हणाले, भंडारा येथील दुर्घटनेच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीत बदल करण्यात आला आहे. नागपूर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. यात राज्याचे अग्निशमन संचालक, आरोग्य संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचा समावेश आहे. या चौकशीचा  अहवाल तीन दिवसात येईल. नवजात शिशू विभागातील कर्मचाऱ्यांना अशा प्रसंगांना कसे सामोरे गेले पाहिजे, यासंदर्भात प्रशिक्षणाची गरज असल्याचेही ते म्हणाले. 

राज्यात १५ टक्के इमारती आरोग्याच्या

राज्यातील एकूण इमारतींपैकी  १५ टक्के इमारती आरोग्याच्या आहेत. त्यामुळे इमारतींप्रमाणे पैसे मिळाले पाहिजेत. निधी वेळेत मिळाला नाही तर देखभाल-दुरुस्ती वेळेत होत नाही, असे राजेश टोपे म्हणाले.ऑडिट करण्यासंदर्भात डिसेंबर महिन्यातच पत्र राज्यभरातील रुग्णालयांचे इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट केले जाणार आहे. हे ऑडिट करण्यासंदर्भात डिसेंबर महिन्यातच पत्र काढण्यात आले आहे. आता त्यावर सुपरव्हिजन करण्याचे काम आरोग्य आयुक्त करतील. रुग्णालयात देखभाल-दुरुस्तीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना पत्र देतात. त्यावेळी निधीच्या उपलब्धतेप्रमाणे काम करून दिले जाते, असे टोपे म्हणाले.

टॅग्स :fireआगRajesh Topeराजेश टोपेBhandara Fireभंडारा आग