शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या सत्यप्रती घेण्यासाठीची गर्दी हटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:44 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यावर्षी बारावीचा निकाल तब्बल सहा वर्षांतील सर्वांत कमी लागला. याच वेळी विद्यार्थ्यांचे गुणही कमी झाले आहेत. त्यामुळे मंडळात पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांची सत्यप्रत घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी निकालानंतर नवव्या दिवशीही दिसून आली.

ठळक मुद्देनिकाल कमी लागल्याचा परिणाम : दोन हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यावर्षी बारावीचा निकाल तब्बल सहा वर्षांतील सर्वांत कमी लागला. याच वेळी विद्यार्थ्यांचे गुणही कमी झाले आहेत. त्यामुळे मंडळात पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांची सत्यप्रत घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी निकालानंतर नवव्या दिवशीही दिसून आली.औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील बारावीच्या निकालाची टक्केवारी ८७.२९ एवढी होती. २०१४ पासून सर्वांत नीचांकी निकालाची नोंद यावर्षी झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांची झेरॉक्स घेऊन पाहणी करण्याकडे कल अधिक वाढला आहे. ४ जूनपर्यंत २ हजार ३९ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका झेरॉक्ससाठी अर्ज दाखल केले आहेत. यात एका विद्यार्थ्याने तीन विषयाच्या उत्तरपत्रिकांची मागणी केली आहे. यासाठी प्रतिउत्तरपत्रिका ४०० रुपये याप्रमाणे १२०० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. या उत्तरपत्रिका देण्यासाठी मंडळाकडून तयारी करण्यात येत आहे. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना दहा दिवसांनी उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मिळणार असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय थेट उत्तरपत्रिका न पाहता पुनर्मूल्यांकन करण्यासाठी २०४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून प्रतिविषयासाठी ३०० रुपयांचे शुल्क आकारण्यात येत आहेत. यासाठी मंडळामध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केल्याचे चित्र गुरुवारी (दि.६) पाहायला मिळाले.पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होणारबारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी परीक्षा मंडळ जुलैमध्येच पुरवणी परीक्षा घेणार आहे. पुरवणी परीक्षा सप्टेंबर- आॅक्टोबर महिन्यात घेण्यात येत होती. ती यावर्षी जुलै महिन्यातच घेण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी, गुणसुधार योजनेंतर्गत पुन्हा परीक्षेस प्रविष्ट होण्याची संधी देण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणexamपरीक्षा