शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
15
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
16
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
17
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
18
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
19
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
20
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली

बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या सत्यप्रती घेण्यासाठीची गर्दी हटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:44 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यावर्षी बारावीचा निकाल तब्बल सहा वर्षांतील सर्वांत कमी लागला. याच वेळी विद्यार्थ्यांचे गुणही कमी झाले आहेत. त्यामुळे मंडळात पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांची सत्यप्रत घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी निकालानंतर नवव्या दिवशीही दिसून आली.

ठळक मुद्देनिकाल कमी लागल्याचा परिणाम : दोन हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यावर्षी बारावीचा निकाल तब्बल सहा वर्षांतील सर्वांत कमी लागला. याच वेळी विद्यार्थ्यांचे गुणही कमी झाले आहेत. त्यामुळे मंडळात पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांची सत्यप्रत घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी निकालानंतर नवव्या दिवशीही दिसून आली.औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील बारावीच्या निकालाची टक्केवारी ८७.२९ एवढी होती. २०१४ पासून सर्वांत नीचांकी निकालाची नोंद यावर्षी झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांची झेरॉक्स घेऊन पाहणी करण्याकडे कल अधिक वाढला आहे. ४ जूनपर्यंत २ हजार ३९ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका झेरॉक्ससाठी अर्ज दाखल केले आहेत. यात एका विद्यार्थ्याने तीन विषयाच्या उत्तरपत्रिकांची मागणी केली आहे. यासाठी प्रतिउत्तरपत्रिका ४०० रुपये याप्रमाणे १२०० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. या उत्तरपत्रिका देण्यासाठी मंडळाकडून तयारी करण्यात येत आहे. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना दहा दिवसांनी उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मिळणार असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय थेट उत्तरपत्रिका न पाहता पुनर्मूल्यांकन करण्यासाठी २०४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून प्रतिविषयासाठी ३०० रुपयांचे शुल्क आकारण्यात येत आहेत. यासाठी मंडळामध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केल्याचे चित्र गुरुवारी (दि.६) पाहायला मिळाले.पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होणारबारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी परीक्षा मंडळ जुलैमध्येच पुरवणी परीक्षा घेणार आहे. पुरवणी परीक्षा सप्टेंबर- आॅक्टोबर महिन्यात घेण्यात येत होती. ती यावर्षी जुलै महिन्यातच घेण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी, गुणसुधार योजनेंतर्गत पुन्हा परीक्षेस प्रविष्ट होण्याची संधी देण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणexamपरीक्षा