शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हर्सूल प्रक्रिया केंद्राला आता कचऱ्याची प्रतीक्षा; दररोज १५० मेट्रिक टन क्षमता 

By मुजीब देवणीकर | Updated: July 15, 2023 19:43 IST

आता फक्त प्रशासनाच्या हिरव्या झेंड्याची या केंद्राला प्रतीक्षा आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहरात दररोज ४८० मे. टन कचरा जमा होतो. पडेगाव, चिकलठाणा कचरा प्रक्रिया केंद्राची क्षमता प्रत्येकी दीडशे मे. टन आहे. त्यामुळे दररोज १५० ते १८० मे. टन कचरा प्रक्रियेविना पडून असतो. अथक परिश्रमांनंतर हर्सूल येथील तिसरे प्रक्रिया केंद्र अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह पूर्णपणे उभे झाले आहे. १५० मेट्रिक टन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करण्याची क्षमता या केंद्रातही आहे. आता फक्त प्रशासनाच्या हिरव्या झेंड्याची या केंद्राला प्रतीक्षा आहे.

राज्य शासनाने २०१८ मध्ये महापालिकेला घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी १४८ कोटींचा निधी मंजूर केला. त्यातील जवळपास सव्वाशे कोटींचा निधीही प्राप्त झाला. या निधीतून सर्वप्रथम चिकलठाणा व त्यापाठोपाठ पडेगाव येथे दुसरा प्रकल्प उभारण्यात आला. या दोन्ही केंद्रात दररोज ३०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया न होणारा कचरा या दोन्ही केंद्रांवर पडून आहे. हर्सूल येथील तिसरा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी मनपाचे जोरदार प्रयत्न सुरू होते. प्रारंभी नागरिकांचा विरोध मावळल्यानंतर प्रकल्प उभारणीसाठी जागा कमी असल्याचे लक्षात आले. दोन शेतकऱ्यांची जागा भूसंपादन करावी लागली. शेडची उभारणी, अत्याधुनिक मशनरी बसवणे या प्रक्रियेत जवळपास एक वर्षाहून अधिक कालावधी गेला. विद्युत पुरवठ्याचीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. प्रकल्प सुरू करण्यास आता कोणतीही अडचण नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

घनकचरा विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी सांगितले की, प्रकल्प पूर्णपणे उभा आहे. कचऱ्याचे वाहन मोजणाऱ्या वे ब्रिज उभारणीला आणखी पंधरा दिवस लागतील. किरकोळ कामे बाकी आहेत. लवकरच चाचणी घेण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका