शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

शुभ वर्तमान ! औरंगाबादची भूजल पातळी ५ मीटरने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:02 IST

यंदाही मराठवाड्यातील ७६ तालुक्यांतील ८७५ विहिरींच्या पाणी पातळीची तपासणी करण्यात आली. 

ठळक मुद्देमराठवाड्यात सर्वाधिक भूजल पातळीवाढ राजधानीतच

औरंगाबाद : यंदा सरासरीपेक्षा तिप्पट पाऊस बरसल्याने मराठवाड्याची टँकरवाडा म्हणून झालेली ओळख यंदा मिटली आहे. या पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. मराठवाड्यात सर्वाधिक भूजल पातळी औरंगाबाद जिल्ह्यात ५.१३ मीटरने वाढली आहे. 

प्रादेशिक उपसंचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने दरवर्षी सप्टेंबर महिन्यात भूजल सर्वेक्षण केले जाते. यंदाही मराठवाड्यातील ७६ तालुक्यांतील ८७५ विहिरींच्या पाणी पातळीची तपासणी करण्यात आली. सर्व तालुक्यांत भूजल पातळी वाढली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात मागील ५ वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ५.१३ मीटरने भूजल पातळी वाढली. त्यातही यंदाच्या पावसाळ्यात २.११ मीटरने पाणी पातळी वाढल्याचे निदर्शनात आले आहे. 

यात यंदा खुलताबाद तालुक्यात जास्त पाऊस पडून भूजल पातळी २.५३ मीटरने वाढली. तर ५ वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत वैजापूर तालुक्यात ७.५३ मीटरने पाणी पातळी वाढली आहे, तर लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात यंदा ४.०३ मीटरने पाणी पातळी वाढली असली तरी प्रत्यक्षात मागील ५ वर्षांतील सरासरीच्या तुलनेत फक्त ०. ११ मीटरनेच पाणी पातळी वाढली आहे. ही सर्वात कमी पाणी पातळी वाढल्याची नोंद झाली आहे. पर्जन्यमानानुसार ७६ तालुक्यांपैकी ६६ तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. २० टक्के तूट असलेली परभणी, गंगाखेड, लातूर, चाकूर, तुळजापूर, भूम, वाशी व आष्टी या तालुक्यांचा समावेश आहे, अशी माहिती उपसंचालक डॉ. एम. डी. देशमुख यांनी दिली. 

भूजल पातळी नोंदजिल्हा         सप्टेंबरपर्यंत     ५ वर्षांतील सरासरीच्या             तुलनेत वाढऔरंगाबाद     २.११     ५.१३ जालना     २.८६     २.०६ परभणी     ४.१२     १.८९ हिंगोली     २.३९     १.४० नांदेड    ३.५८     १.७८ लातूर    ३.६७     ०.९२ उस्मानाबाद     १.८९     २.८८ बीड    २.६१     २.१६ एकूण     २.९०    २.२८

(पाणी पातळी मीटरमध्ये )

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादRainपाऊस