शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

शुभ वर्तमान ! औरंगाबादची भूजल पातळी ५ मीटरने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:02 IST

यंदाही मराठवाड्यातील ७६ तालुक्यांतील ८७५ विहिरींच्या पाणी पातळीची तपासणी करण्यात आली. 

ठळक मुद्देमराठवाड्यात सर्वाधिक भूजल पातळीवाढ राजधानीतच

औरंगाबाद : यंदा सरासरीपेक्षा तिप्पट पाऊस बरसल्याने मराठवाड्याची टँकरवाडा म्हणून झालेली ओळख यंदा मिटली आहे. या पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. मराठवाड्यात सर्वाधिक भूजल पातळी औरंगाबाद जिल्ह्यात ५.१३ मीटरने वाढली आहे. 

प्रादेशिक उपसंचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने दरवर्षी सप्टेंबर महिन्यात भूजल सर्वेक्षण केले जाते. यंदाही मराठवाड्यातील ७६ तालुक्यांतील ८७५ विहिरींच्या पाणी पातळीची तपासणी करण्यात आली. सर्व तालुक्यांत भूजल पातळी वाढली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात मागील ५ वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ५.१३ मीटरने भूजल पातळी वाढली. त्यातही यंदाच्या पावसाळ्यात २.११ मीटरने पाणी पातळी वाढल्याचे निदर्शनात आले आहे. 

यात यंदा खुलताबाद तालुक्यात जास्त पाऊस पडून भूजल पातळी २.५३ मीटरने वाढली. तर ५ वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत वैजापूर तालुक्यात ७.५३ मीटरने पाणी पातळी वाढली आहे, तर लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात यंदा ४.०३ मीटरने पाणी पातळी वाढली असली तरी प्रत्यक्षात मागील ५ वर्षांतील सरासरीच्या तुलनेत फक्त ०. ११ मीटरनेच पाणी पातळी वाढली आहे. ही सर्वात कमी पाणी पातळी वाढल्याची नोंद झाली आहे. पर्जन्यमानानुसार ७६ तालुक्यांपैकी ६६ तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. २० टक्के तूट असलेली परभणी, गंगाखेड, लातूर, चाकूर, तुळजापूर, भूम, वाशी व आष्टी या तालुक्यांचा समावेश आहे, अशी माहिती उपसंचालक डॉ. एम. डी. देशमुख यांनी दिली. 

भूजल पातळी नोंदजिल्हा         सप्टेंबरपर्यंत     ५ वर्षांतील सरासरीच्या             तुलनेत वाढऔरंगाबाद     २.११     ५.१३ जालना     २.८६     २.०६ परभणी     ४.१२     १.८९ हिंगोली     २.३९     १.४० नांदेड    ३.५८     १.७८ लातूर    ३.६७     ०.९२ उस्मानाबाद     १.८९     २.८८ बीड    २.६१     २.१६ एकूण     २.९०    २.२८

(पाणी पातळी मीटरमध्ये )

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादRainपाऊस