शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आनंदाची वार्ता! आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११० गावांना नळाने कायम पाणी

By विजय सरवदे | Updated: August 5, 2023 12:18 IST

शासनाच्या निर्देशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण करून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यासाठी आनंदाची वार्ता आहे. सतत पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या जिल्ह्यातील ११० गावांचा पाणीप्रश्न आता कायमचा मिटला आहे. या गावांतील कुटुंबांना नळाद्वारे प्रतिमाणसी ५५ लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला असून, प्रशासनाने ही गावे ‘हर घर जल’ घोषित केली आहेत. जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील १२९७ गावांना शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी ११६१ योजना हाती घेतल्या आहेत. 

शासनाच्या निर्देशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण करून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागात या योजनांच्या कामांवर देखरेख करण्यासाठी अभियंत्यांची टंचाई असतानाही अधिकाऱ्यांनी आतापर्यंत ४८८ गावांतील योजना पूर्ण केल्या आहेत. सद्य:स्थितीत ११० गावांत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला असून यासंबंधीची नोंद केंद्रशासनाच्या संकेतस्थळावर भरण्यात आली आहे. जलजीवन मिशनची कामे दर्जेदार व्हावीत, गावातील प्रत्येक कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा व गावे ‘हर घर जल’ घोषित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना हे सातत्याने आढावा घेत असून या कामांत येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन सुदर्शन तुपे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे हे जल जीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

पाणीपुरवठा सुरू झालेली गावेजिल्ह्यात औरंगाबाद तालुक्यातील १० गावे, गंगापूर- १७ गावे, कन्नड- १५ गावे, खुलताबाद- ०३, पैठण- ०३, फुलंब्री- ०८ गावे, सिल्लोड- १७ गावे, सोयगाव- ०९ गावे, वैजापूर- २८ गावांमध्ये प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी