शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

आनंदाची वार्ता! आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११० गावांना नळाने कायम पाणी

By विजय सरवदे | Updated: August 5, 2023 12:18 IST

शासनाच्या निर्देशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण करून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यासाठी आनंदाची वार्ता आहे. सतत पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या जिल्ह्यातील ११० गावांचा पाणीप्रश्न आता कायमचा मिटला आहे. या गावांतील कुटुंबांना नळाद्वारे प्रतिमाणसी ५५ लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला असून, प्रशासनाने ही गावे ‘हर घर जल’ घोषित केली आहेत. जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील १२९७ गावांना शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी ११६१ योजना हाती घेतल्या आहेत. 

शासनाच्या निर्देशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण करून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागात या योजनांच्या कामांवर देखरेख करण्यासाठी अभियंत्यांची टंचाई असतानाही अधिकाऱ्यांनी आतापर्यंत ४८८ गावांतील योजना पूर्ण केल्या आहेत. सद्य:स्थितीत ११० गावांत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला असून यासंबंधीची नोंद केंद्रशासनाच्या संकेतस्थळावर भरण्यात आली आहे. जलजीवन मिशनची कामे दर्जेदार व्हावीत, गावातील प्रत्येक कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा व गावे ‘हर घर जल’ घोषित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना हे सातत्याने आढावा घेत असून या कामांत येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन सुदर्शन तुपे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे हे जल जीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

पाणीपुरवठा सुरू झालेली गावेजिल्ह्यात औरंगाबाद तालुक्यातील १० गावे, गंगापूर- १७ गावे, कन्नड- १५ गावे, खुलताबाद- ०३, पैठण- ०३, फुलंब्री- ०८ गावे, सिल्लोड- १७ गावे, सोयगाव- ०९ गावे, वैजापूर- २८ गावांमध्ये प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी