शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या अनिय आयमनला बेड्या

By राम शिनगारे | Updated: February 3, 2023 20:00 IST

बंगळुरू येथे पकडले, तिसऱ्या फेरीत मिळाले यश

औरंगाबाद : दामदुप्पट पैशाचे आमिष दाखवून गोरगरिबांकडून कोट्यावधी रुपये जमा करून फरार झालेला रिदास इंडिया कंपनीच्या संचालकाला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बंगळुरू येथे पकडले. मोहम्मद अनिस आयमन असे पकडलेल्या संचालकाचे नाव आहे. २०१७ ते २०१९ या काळात शहरातील ६० ते ७० जणांकडून २ कोटी २२ लाख रुपये उकळले होते.

मोहम्मद रफी मोहम्मद ताहेर शेख यांनी १३ डिसेंबर २०१९ रोजी सिटीचौक ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार रिदास इंडीया कंपनी, बंगळुरू ही नोंदणीकृत आहे. संचालक मोहम्मद आयुब हुसैन, मोहम्मद अनिस आयमन यांनी कंपनीचे कार्यालय जुना बाजार रोड येथे उघडले होते. शहरातील हॉटेलमध्ये सेमीनार घेवुन गुंतवणुकदारांना दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविले. या अमिषाला बळी पडून नागरिकांनी कंपनीत मोठया प्रमाणात गुंतवणुक केली. सुरूवातीस काही दिवस परतावा दिला. मात्र, २०१९ नंतर गुंतवणुकदारांना मुळ रक्कम, परतावा न देताच कंपनीने कार्यालय बंद केले.

गुन्हा नोंदविल्यांनतर आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे. आरोपीला पकडण्यासाठी तपास अधिकारी सपोनि तृप्ती तोटावार, अंमलदार विठ्ठल मानकापे, संदीप जाधव, बाबा भानुसे यांनी अनेकवेळा बंगळुरू गाठले. मात्र, आरोपी वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत होता. मोबाईल, ईमेल आयडी बंद केल्यामुळे मिळुन येत नव्हते. त्यामुळे सपोनि तोटावर यांनी आरोपीच्या संपर्कातील मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून संचालक मोहम्मद अनिस आयमन याला अटक केली. ही कामगिरी निरीक्षक दादाराव सिनगारे यांच्या मार्गदर्शनात सपोनि तृप्ती तोटावार, अंमलदार मानकापे, जाधव व भानुसे यांच्या पथकाने केली.

आरोपीस पोलिस कोठडी

आरोपीस मोहम्मद अनिस आयमान यास अटक केल्यानंतर जिल्हा न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने आरोपीला ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मंजुर केली. रिदास इंडीया कंपनीविरुद्ध ठाणे, नवी मुंबई व बुलढाणा येथे अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

६० एकर जमीन घेतली

आरोपींनी गुंतवणूकदारांच्या पैशातुन सिद्धनाथ वडगांव येथे ६० एकर जमीन खरेदी केली आहे. पोलिसांनी जमीन जप्त केल्यानंतर तिचा लिलाव करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी