शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

सातारा परिसरातील हातपंप जमिनीत रुतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 17:13 IST

सातारा-देवळाई ग्रामपंचायत काळात पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून विविध कॉलनी, सोसायटीत हातपंप घेण्यात आले होते. कालांतराने ते सार्वजनिक हातपंप जमिनीत रुतले असून, पर्यायी व्यवस्था म्हणून मनपाने एकही हातपंप दुरुस्त केलेला नाही.

औरंगाबाद : सातारा-देवळाई ग्रामपंचायत काळात पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून विविध कॉलनी, सोसायटीत हातपंप घेण्यात आले होते. कालांतराने ते सार्वजनिक हातपंप जमिनीत रुतले असून, पर्यायी व्यवस्था म्हणून मनपाने एकही हातपंप दुरुस्त केलेला नाही. परिणामी, या भागातील रहिवाशांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

देवळाई तसेच सातारा गावाशिवाय इतरही वसाहती निर्माण झाल्या असून, त्यांना पाणीपुरवठा देणे आवाक्याबाहेर असल्याने शासनाचा निधी व जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामविकास निधीतून शेकडो हातपंप घेतले आहेत. येथे पाणी मिळण्याची कुठलीही अन्य व्यवस्था नसल्याने सार्वजनिक हातपंपावर नागरिकांची तहान भागत होती. बांधकाम व्यावसायिकांनी घरासमोर बोअर, असे हजारो हातपंप खोदून दिलेले आहेत. कॉलनी व सोसायटीच्या समोरील सार्वजनिक हातपंपावरून पाणी भरण्यास रांगा लागत होत्या. हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच हातपंप सुरू असून, उर्वरित दुरुस्तीअभावी बंद पडले आहेत.

मनपात दोन्ही गावांचा परिसर समाविष्ट झाल्यापासून एकाही हातपंपाची दुरुस्ती मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केलेली नाही. पाणीपुरवठ्यासाठी मनपाने टँकरच्या बुकिंग व रक्कम भरण्याच्या कामाला सातारा देवळाई वॉर्ड कार्यालयात मंजुरी दिलेली आहे; परंतु जुन्या हातपंपांच्या दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांनी तीन वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे.

किरकोळ दुरुस्त्यासातारा-देवळाईत शेकडो हातपंप असले तरी त्याची नोंददेखील मनपाने घेतलेली नाही. हातपंपाच्या साखळ्या, दांडे तुटल्याने ते बंद असून, काही पंपांची दुरुस्ती करून पाणीपुरवठ्यासाठी ते खुले केल्यास नागरिकांची भटकंती थांबेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. दुरुस्तीअभावी मोडकळीस आलेल्या जुन्या हातपंपांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मनपाच्या अधिकाºयांकडे करण्यात आल्याचे नगरसेविका सायली जमादार यांनी सांगितले.

संघर्ष किती दिवससातारा-देवळाईतील नागरिकांना अजून किती दिवस पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. ग्रामपंचायतीच्या काळातील पर्यायी पाणीपुरवठ्याचे हातपंप दुर्लक्षित असून, त्याकडे मनपाने अद्याप ढुंकूनही पाहिलेले नाही, तसेच जुन्या विहिरींचे पाणी आटल्याने टँकरच्या पाणीपुरवठ्याशिवाय नागरिकांना पर्याय राहिलेला नाही, असे माजी सरपंच करीम पटेल म्हणाले.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई