शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

सातारा परिसरातील हातपंप जमिनीत रुतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 17:13 IST

सातारा-देवळाई ग्रामपंचायत काळात पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून विविध कॉलनी, सोसायटीत हातपंप घेण्यात आले होते. कालांतराने ते सार्वजनिक हातपंप जमिनीत रुतले असून, पर्यायी व्यवस्था म्हणून मनपाने एकही हातपंप दुरुस्त केलेला नाही.

औरंगाबाद : सातारा-देवळाई ग्रामपंचायत काळात पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून विविध कॉलनी, सोसायटीत हातपंप घेण्यात आले होते. कालांतराने ते सार्वजनिक हातपंप जमिनीत रुतले असून, पर्यायी व्यवस्था म्हणून मनपाने एकही हातपंप दुरुस्त केलेला नाही. परिणामी, या भागातील रहिवाशांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

देवळाई तसेच सातारा गावाशिवाय इतरही वसाहती निर्माण झाल्या असून, त्यांना पाणीपुरवठा देणे आवाक्याबाहेर असल्याने शासनाचा निधी व जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामविकास निधीतून शेकडो हातपंप घेतले आहेत. येथे पाणी मिळण्याची कुठलीही अन्य व्यवस्था नसल्याने सार्वजनिक हातपंपावर नागरिकांची तहान भागत होती. बांधकाम व्यावसायिकांनी घरासमोर बोअर, असे हजारो हातपंप खोदून दिलेले आहेत. कॉलनी व सोसायटीच्या समोरील सार्वजनिक हातपंपावरून पाणी भरण्यास रांगा लागत होत्या. हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच हातपंप सुरू असून, उर्वरित दुरुस्तीअभावी बंद पडले आहेत.

मनपात दोन्ही गावांचा परिसर समाविष्ट झाल्यापासून एकाही हातपंपाची दुरुस्ती मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केलेली नाही. पाणीपुरवठ्यासाठी मनपाने टँकरच्या बुकिंग व रक्कम भरण्याच्या कामाला सातारा देवळाई वॉर्ड कार्यालयात मंजुरी दिलेली आहे; परंतु जुन्या हातपंपांच्या दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांनी तीन वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे.

किरकोळ दुरुस्त्यासातारा-देवळाईत शेकडो हातपंप असले तरी त्याची नोंददेखील मनपाने घेतलेली नाही. हातपंपाच्या साखळ्या, दांडे तुटल्याने ते बंद असून, काही पंपांची दुरुस्ती करून पाणीपुरवठ्यासाठी ते खुले केल्यास नागरिकांची भटकंती थांबेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. दुरुस्तीअभावी मोडकळीस आलेल्या जुन्या हातपंपांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मनपाच्या अधिकाºयांकडे करण्यात आल्याचे नगरसेविका सायली जमादार यांनी सांगितले.

संघर्ष किती दिवससातारा-देवळाईतील नागरिकांना अजून किती दिवस पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. ग्रामपंचायतीच्या काळातील पर्यायी पाणीपुरवठ्याचे हातपंप दुर्लक्षित असून, त्याकडे मनपाने अद्याप ढुंकूनही पाहिलेले नाही, तसेच जुन्या विहिरींचे पाणी आटल्याने टँकरच्या पाणीपुरवठ्याशिवाय नागरिकांना पर्याय राहिलेला नाही, असे माजी सरपंच करीम पटेल म्हणाले.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई