शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

सातारा परिसरातील हातपंप जमिनीत रुतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 17:13 IST

सातारा-देवळाई ग्रामपंचायत काळात पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून विविध कॉलनी, सोसायटीत हातपंप घेण्यात आले होते. कालांतराने ते सार्वजनिक हातपंप जमिनीत रुतले असून, पर्यायी व्यवस्था म्हणून मनपाने एकही हातपंप दुरुस्त केलेला नाही.

औरंगाबाद : सातारा-देवळाई ग्रामपंचायत काळात पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून विविध कॉलनी, सोसायटीत हातपंप घेण्यात आले होते. कालांतराने ते सार्वजनिक हातपंप जमिनीत रुतले असून, पर्यायी व्यवस्था म्हणून मनपाने एकही हातपंप दुरुस्त केलेला नाही. परिणामी, या भागातील रहिवाशांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

देवळाई तसेच सातारा गावाशिवाय इतरही वसाहती निर्माण झाल्या असून, त्यांना पाणीपुरवठा देणे आवाक्याबाहेर असल्याने शासनाचा निधी व जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामविकास निधीतून शेकडो हातपंप घेतले आहेत. येथे पाणी मिळण्याची कुठलीही अन्य व्यवस्था नसल्याने सार्वजनिक हातपंपावर नागरिकांची तहान भागत होती. बांधकाम व्यावसायिकांनी घरासमोर बोअर, असे हजारो हातपंप खोदून दिलेले आहेत. कॉलनी व सोसायटीच्या समोरील सार्वजनिक हातपंपावरून पाणी भरण्यास रांगा लागत होत्या. हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच हातपंप सुरू असून, उर्वरित दुरुस्तीअभावी बंद पडले आहेत.

मनपात दोन्ही गावांचा परिसर समाविष्ट झाल्यापासून एकाही हातपंपाची दुरुस्ती मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केलेली नाही. पाणीपुरवठ्यासाठी मनपाने टँकरच्या बुकिंग व रक्कम भरण्याच्या कामाला सातारा देवळाई वॉर्ड कार्यालयात मंजुरी दिलेली आहे; परंतु जुन्या हातपंपांच्या दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांनी तीन वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे.

किरकोळ दुरुस्त्यासातारा-देवळाईत शेकडो हातपंप असले तरी त्याची नोंददेखील मनपाने घेतलेली नाही. हातपंपाच्या साखळ्या, दांडे तुटल्याने ते बंद असून, काही पंपांची दुरुस्ती करून पाणीपुरवठ्यासाठी ते खुले केल्यास नागरिकांची भटकंती थांबेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. दुरुस्तीअभावी मोडकळीस आलेल्या जुन्या हातपंपांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मनपाच्या अधिकाºयांकडे करण्यात आल्याचे नगरसेविका सायली जमादार यांनी सांगितले.

संघर्ष किती दिवससातारा-देवळाईतील नागरिकांना अजून किती दिवस पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. ग्रामपंचायतीच्या काळातील पर्यायी पाणीपुरवठ्याचे हातपंप दुर्लक्षित असून, त्याकडे मनपाने अद्याप ढुंकूनही पाहिलेले नाही, तसेच जुन्या विहिरींचे पाणी आटल्याने टँकरच्या पाणीपुरवठ्याशिवाय नागरिकांना पर्याय राहिलेला नाही, असे माजी सरपंच करीम पटेल म्हणाले.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई