शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शामवाडी येथील शेतात सापडला 'हातबॉम्ब'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 20:34 IST

शहरापासून सुमारे १५ किलोमीटरवरील या छोट्या गावातील शिवारात हातबॉम्ब कसा आला, किती वर्षापूर्वीचा हा बॉम्ब आहे, एवढी वर्ष तो कोणाच्याही नजरेत कसा पडला नाही,असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

बापू सोळुंके 

औरंगाबाद येथून सुमारे १५ किलोमीटर अंतरावरील शामवाडी शिवारातील एका शेतात एक हात बॉम्ब आढळून आल्याने खळबळ उडाली. अनेक वर्षापासून शेतात पडून असल्याने हा बॉम्ब गंजलेला होता,शिवाय तो स्फोटक नसल्याचे बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने केलल्या तपासणीत आढळून आल्याने सर्वाचा जीव भांड्यात पडला. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

या घटनेविषयी पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, औरंगाबाद तालुक्यातील शामवाडी गावातील रहिवासी गोपालसिंग घुनावत यांच्या शेतात त्यांची मुले खेळत होती. यावेळी शेतातील माती, दगड उकरत असताना त्यांना सिनेमात दिसतो, तसा बॉम्बसदृश्य वस्तू दिसली. त्यांनी ही वस्तू तशीच तेथे ठेवली आणि या घटनेची माहिती गोपाल घुनावत यांना दिली. यानंतर त्यांनी गावाचे पोलीस पाटील मानसिंग राजपूत आणि फुलंब्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र निकाळजे यांना कळविली. पोलसांनी तेथे धाव घेतली तेव्हा तो जुना हॅण्ड ग्रेनेड (हात बॉम्ब) असल्याचे त्यांना दिसले. यानंतर त्यांनी लगेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला तेथे पाचारण केले. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने या बॉम्बची तपासणी केली. या तपासणीत हा हातबॉम्ब स्फोटकजन्य नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सर्वांनी सुटकेचा सुसकारा सोडला. हा बॉम्ब पूर्णपणे गंजलेला असल्याने बॉम्बची निर्मिती कधी आणि कोणत्या ऑर्डिनन्स कारखान्यात झाली, याविषयी समजू शकले नाही. हा बॉम्ब जप्त करण्यात आला असून याघटनेची नोंद फुलंब्री पोलीस ठाण्यात करण्यात आली.

हा हातबॉम्ब तेथे कसा आला?

शहरापासून सुमारे १५ किलोमीटरवरील या छोट्या गावातील शिवारात हातबॉम्ब कसा आला, किती वर्षापूर्वीचा हा बॉम्ब आहे, एवढी वर्ष तो कोणाच्याही नजरेत कसा पडला नाही,असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते निजामकालीन हा बॉम्ब असू शकतो. मात्र काळाच्या ओघात तो जमीनीखाली दबला गेला असावा, शेतात नागरणी करताना तो वर आला असाता आणि आज दगड, माती उकरताना हा बॉम्ब मुलांना दिसला. स्फोटक नसल्याने हा बॉम्ब तेथे टाकला असावा. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद