शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
5
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
6
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
7
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
8
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
9
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
10
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
11
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
12
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
13
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
14
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
15
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
16
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
17
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
18
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
19
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
20
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
Daily Top 2Weekly Top 5

आपतगावचा अर्धवट पाडलेला जलकुंभ बनला जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 19:46 IST

चितेपिपळगांव : आपतगाव येथील स्वामी ब्रम्हानंद महाराज मंदिराशेजारी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी असलेला पंचवीस हजार लीटर क्षमतेचा जलकुंभ धोकादायक अवस्थेत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने वळसा घालून वाहनाधारकांना गावात जावे लागत आहे.तर दुसरीकडे जलकुंभाजवळ मैदान असल्याने येथे खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात आला आहे.

चितेपिपळगांव : आपतगाव येथील स्वामी ब्रम्हानंद महाराज मंदिराशेजारी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी असलेला पंचवीस हजार लीटर क्षमतेचा जलकुंभ धोकादायक अवस्थेत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने वळसा घालून वाहनाधारकांना गावात जावे लागत आहे.तर दुसरीकडे जलकुंभाजवळ मैदान असल्याने येथे खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात आला आहे.

एकेकाळी गावाला पाणी पुरवठा करणारा हा अर्धवट पाडण्यात आला. दोन वर्षांपासून याची स्थितीत हा जलकुंभ आहे. जलकुंभ राज्य रास्ता २११ मध्ये येतो. त्यामुळे येथुन पाणी पुरवठा बंद केला आहे. यासाठी पर्यायी जलकुंभ उभारण्यात आला. यातून दोन वर्षांपासून गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. परतु याच रस्त्याचे काम करताना भारत निर्माण योजनेंतर्गत टाकण्यात आलेली पाईप लाईन जागो जागी फुटली. या पाईपलाईनमधून जागोजागी गळती आहे.संबंधित कंत्राटदार कंपनीने ही गळती अद्याप थांबविली नाही. त्यामुळे संपूर्ण गावाला समान पाणी पुरवठा होत नसल्याचे भगवान पाटील चौधरी यांनी सांगितले.

या रस्त्याचे काम आयआरबी कंपनी करत आहे. हा जलकुंभ पाडण्यासाठी दोन दिवसांपासून मातीचा ढिगार तयार केला. बुलोडजरच्या सहाय्याने पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्धवट स्थितीत ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गावात जाण्यासाठी हा जलकुंभ अडथळा ठरत आहे. पर्याय म्हणून पुलाखालून जाण्यासाठी रस्ता आहे. परतु वळसा घालून जावे लागते. शिवाय बाजूलाच मैदान आहे. सकाळी व संध्याकाळी येथे मुले व्हॉली बॉल खेळण्यासाठी येतात.

यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या रास्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे टाकी जमीनदोस्त होऊ शकलेली नाही. उद्या एखादी दुर्घटना घडली तर कंपनीवे अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब भोसले पाटील दिला आहे. पर्याय म्हणून दुसरी पाण्याची टाकी वेळेत बांधली. तसेच भारत निर्माण योजनेंर्तगत केलेली पाईपलाईन या रस्त्याच्या कामात तुटली. याची दुरुस्ती अद्याप करुन देण्यात आलेली नाही. ती तात्त्काळ जोडून देण्याची मागणी भगवान चौधरी पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबाद