शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आपतगावचा अर्धवट पाडलेला जलकुंभ बनला जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 19:46 IST

चितेपिपळगांव : आपतगाव येथील स्वामी ब्रम्हानंद महाराज मंदिराशेजारी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी असलेला पंचवीस हजार लीटर क्षमतेचा जलकुंभ धोकादायक अवस्थेत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने वळसा घालून वाहनाधारकांना गावात जावे लागत आहे.तर दुसरीकडे जलकुंभाजवळ मैदान असल्याने येथे खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात आला आहे.

चितेपिपळगांव : आपतगाव येथील स्वामी ब्रम्हानंद महाराज मंदिराशेजारी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी असलेला पंचवीस हजार लीटर क्षमतेचा जलकुंभ धोकादायक अवस्थेत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने वळसा घालून वाहनाधारकांना गावात जावे लागत आहे.तर दुसरीकडे जलकुंभाजवळ मैदान असल्याने येथे खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात आला आहे.

एकेकाळी गावाला पाणी पुरवठा करणारा हा अर्धवट पाडण्यात आला. दोन वर्षांपासून याची स्थितीत हा जलकुंभ आहे. जलकुंभ राज्य रास्ता २११ मध्ये येतो. त्यामुळे येथुन पाणी पुरवठा बंद केला आहे. यासाठी पर्यायी जलकुंभ उभारण्यात आला. यातून दोन वर्षांपासून गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. परतु याच रस्त्याचे काम करताना भारत निर्माण योजनेंतर्गत टाकण्यात आलेली पाईप लाईन जागो जागी फुटली. या पाईपलाईनमधून जागोजागी गळती आहे.संबंधित कंत्राटदार कंपनीने ही गळती अद्याप थांबविली नाही. त्यामुळे संपूर्ण गावाला समान पाणी पुरवठा होत नसल्याचे भगवान पाटील चौधरी यांनी सांगितले.

या रस्त्याचे काम आयआरबी कंपनी करत आहे. हा जलकुंभ पाडण्यासाठी दोन दिवसांपासून मातीचा ढिगार तयार केला. बुलोडजरच्या सहाय्याने पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्धवट स्थितीत ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गावात जाण्यासाठी हा जलकुंभ अडथळा ठरत आहे. पर्याय म्हणून पुलाखालून जाण्यासाठी रस्ता आहे. परतु वळसा घालून जावे लागते. शिवाय बाजूलाच मैदान आहे. सकाळी व संध्याकाळी येथे मुले व्हॉली बॉल खेळण्यासाठी येतात.

यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या रास्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे टाकी जमीनदोस्त होऊ शकलेली नाही. उद्या एखादी दुर्घटना घडली तर कंपनीवे अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब भोसले पाटील दिला आहे. पर्याय म्हणून दुसरी पाण्याची टाकी वेळेत बांधली. तसेच भारत निर्माण योजनेंर्तगत केलेली पाईपलाईन या रस्त्याच्या कामात तुटली. याची दुरुस्ती अद्याप करुन देण्यात आलेली नाही. ती तात्त्काळ जोडून देण्याची मागणी भगवान चौधरी पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबाद