शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

आपतगावचा अर्धवट पाडलेला जलकुंभ बनला जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 19:46 IST

चितेपिपळगांव : आपतगाव येथील स्वामी ब्रम्हानंद महाराज मंदिराशेजारी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी असलेला पंचवीस हजार लीटर क्षमतेचा जलकुंभ धोकादायक अवस्थेत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने वळसा घालून वाहनाधारकांना गावात जावे लागत आहे.तर दुसरीकडे जलकुंभाजवळ मैदान असल्याने येथे खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात आला आहे.

चितेपिपळगांव : आपतगाव येथील स्वामी ब्रम्हानंद महाराज मंदिराशेजारी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी असलेला पंचवीस हजार लीटर क्षमतेचा जलकुंभ धोकादायक अवस्थेत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने वळसा घालून वाहनाधारकांना गावात जावे लागत आहे.तर दुसरीकडे जलकुंभाजवळ मैदान असल्याने येथे खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात आला आहे.

एकेकाळी गावाला पाणी पुरवठा करणारा हा अर्धवट पाडण्यात आला. दोन वर्षांपासून याची स्थितीत हा जलकुंभ आहे. जलकुंभ राज्य रास्ता २११ मध्ये येतो. त्यामुळे येथुन पाणी पुरवठा बंद केला आहे. यासाठी पर्यायी जलकुंभ उभारण्यात आला. यातून दोन वर्षांपासून गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. परतु याच रस्त्याचे काम करताना भारत निर्माण योजनेंतर्गत टाकण्यात आलेली पाईप लाईन जागो जागी फुटली. या पाईपलाईनमधून जागोजागी गळती आहे.संबंधित कंत्राटदार कंपनीने ही गळती अद्याप थांबविली नाही. त्यामुळे संपूर्ण गावाला समान पाणी पुरवठा होत नसल्याचे भगवान पाटील चौधरी यांनी सांगितले.

या रस्त्याचे काम आयआरबी कंपनी करत आहे. हा जलकुंभ पाडण्यासाठी दोन दिवसांपासून मातीचा ढिगार तयार केला. बुलोडजरच्या सहाय्याने पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्धवट स्थितीत ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गावात जाण्यासाठी हा जलकुंभ अडथळा ठरत आहे. पर्याय म्हणून पुलाखालून जाण्यासाठी रस्ता आहे. परतु वळसा घालून जावे लागते. शिवाय बाजूलाच मैदान आहे. सकाळी व संध्याकाळी येथे मुले व्हॉली बॉल खेळण्यासाठी येतात.

यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या रास्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे टाकी जमीनदोस्त होऊ शकलेली नाही. उद्या एखादी दुर्घटना घडली तर कंपनीवे अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब भोसले पाटील दिला आहे. पर्याय म्हणून दुसरी पाण्याची टाकी वेळेत बांधली. तसेच भारत निर्माण योजनेंर्तगत केलेली पाईपलाईन या रस्त्याच्या कामात तुटली. याची दुरुस्ती अद्याप करुन देण्यात आलेली नाही. ती तात्त्काळ जोडून देण्याची मागणी भगवान चौधरी पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबाद