शहरं
Join us  
Trending Stories
1
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
3
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
4
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
5
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
6
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
7
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
8
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
9
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
10
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
11
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
12
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
13
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
14
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
15
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
16
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
17
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
18
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
19
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
20
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...

गुरुजींची शाळा आजपासूनच

By admin | Updated: June 13, 2016 00:49 IST

औरंगाबाद : नवीन शैक्षणिक सत्राला १५ जूनपासून आरंभ होत असला तरी गुरुजींची शाळा मात्र, उद्यापासूनच (१३ जून) भरणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशीच

 

औरंगाबाद : नवीन शैक्षणिक सत्राला १५ जूनपासून आरंभ होत असला तरी गुरुजींची शाळा मात्र, उद्यापासूनच (१३ जून) भरणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशीच सर्व विद्यार्थी गणवेशात हजर झाले पाहिजेत. यासाठी विद्यार्थ्यांना उद्यापासून दोन दिवस गणवेश वाटप केले जाणार आहेत. याशिवाय शाळा परिसर तसेच वर्गखोल्यांची साफसफाई, सजावट तसेच विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी गुरुजींना करावी लागणार आहे. यापूर्वी दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकांचे वितरण केले जायचे. मात्र, यंदापासून त्यामध्ये बदल केला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी गणवेशात शाळेत आले पाहिजे. यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी एक तर पालकांना शाळेत बोलावून घ्यावे किंवा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन गणवेश वाटप करायचे आहेत. त्यानुसार दहा दिवसांपूर्वीच केंद्रनिहाय गणवेशाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. यासंदर्भात शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व शाळांना शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना १२ जूनपासून गावातील तसेच शहरातील ६ ते १४ वर्ष वयोगटातील दाखलपात्र व शाळाबाह्य विद्यार्थ्यांची यादी करावी लागणार आहे. पहिलीतील दाखलपात्र विद्यार्थ्यांची यादी गावाच्या व शाळेच्या दर्शनी फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्यामुळे दाखलपात्र विद्यार्थ्यांबद्दल पालकांमध्ये जनजागृती होईल, अशी अपेक्षा आहे. (पान २ वर) शाळा सुरू झाल्यानंतर सलग पाच दिवस शिक्षणाच्या पालखीचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत बालकांच्या मोफत व सक्तीच्या अधिकार कायद्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ४या उपक्रमाच्या माध्यमातून पालकांना त्यांच्या मुलांना शाळेत दाखल करण्याबाबत आवाहन करावे. भेटी दिलेल्या पालकांच्या स्वतंत्र नोंदी ठेवाव्यात. दोन दिवस अगोदरच १३ ते १५ जून या कालावधीमध्ये शाळा सुरू होत असल्याबाबत तसेच दाखलपात्र मुलांना आणि नियमित मुलांना शाळेत पाठविण्यासाठी दवंडी देण्याचे शिक्षण विभागाचे आदेश आहेत. यासंबंधीची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. गावात फलक लेखन करून शाळा शुभारंभाबाबत सविस्तर सूचना लिहिणेही बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये पटनोंदणी व उपस्थितीचे १०० टक्के उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळेच शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ नावीन्यपूर्ण पद्धतीने करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक व समाजाच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळा शुभारंभाबाबत विविध स्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.