शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

गुरुजींची शाळा आजपासूनच

By admin | Updated: June 13, 2016 00:49 IST

औरंगाबाद : नवीन शैक्षणिक सत्राला १५ जूनपासून आरंभ होत असला तरी गुरुजींची शाळा मात्र, उद्यापासूनच (१३ जून) भरणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशीच

 

औरंगाबाद : नवीन शैक्षणिक सत्राला १५ जूनपासून आरंभ होत असला तरी गुरुजींची शाळा मात्र, उद्यापासूनच (१३ जून) भरणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशीच सर्व विद्यार्थी गणवेशात हजर झाले पाहिजेत. यासाठी विद्यार्थ्यांना उद्यापासून दोन दिवस गणवेश वाटप केले जाणार आहेत. याशिवाय शाळा परिसर तसेच वर्गखोल्यांची साफसफाई, सजावट तसेच विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी गुरुजींना करावी लागणार आहे. यापूर्वी दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकांचे वितरण केले जायचे. मात्र, यंदापासून त्यामध्ये बदल केला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी गणवेशात शाळेत आले पाहिजे. यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी एक तर पालकांना शाळेत बोलावून घ्यावे किंवा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन गणवेश वाटप करायचे आहेत. त्यानुसार दहा दिवसांपूर्वीच केंद्रनिहाय गणवेशाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. यासंदर्भात शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व शाळांना शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना १२ जूनपासून गावातील तसेच शहरातील ६ ते १४ वर्ष वयोगटातील दाखलपात्र व शाळाबाह्य विद्यार्थ्यांची यादी करावी लागणार आहे. पहिलीतील दाखलपात्र विद्यार्थ्यांची यादी गावाच्या व शाळेच्या दर्शनी फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्यामुळे दाखलपात्र विद्यार्थ्यांबद्दल पालकांमध्ये जनजागृती होईल, अशी अपेक्षा आहे. (पान २ वर) शाळा सुरू झाल्यानंतर सलग पाच दिवस शिक्षणाच्या पालखीचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत बालकांच्या मोफत व सक्तीच्या अधिकार कायद्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ४या उपक्रमाच्या माध्यमातून पालकांना त्यांच्या मुलांना शाळेत दाखल करण्याबाबत आवाहन करावे. भेटी दिलेल्या पालकांच्या स्वतंत्र नोंदी ठेवाव्यात. दोन दिवस अगोदरच १३ ते १५ जून या कालावधीमध्ये शाळा सुरू होत असल्याबाबत तसेच दाखलपात्र मुलांना आणि नियमित मुलांना शाळेत पाठविण्यासाठी दवंडी देण्याचे शिक्षण विभागाचे आदेश आहेत. यासंबंधीची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. गावात फलक लेखन करून शाळा शुभारंभाबाबत सविस्तर सूचना लिहिणेही बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये पटनोंदणी व उपस्थितीचे १०० टक्के उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळेच शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ नावीन्यपूर्ण पद्धतीने करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक व समाजाच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळा शुभारंभाबाबत विविध स्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.