शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजी, गाव, वाडी-तांड्यांपर्यंत पोरं शोधा, एक पण सुटायला नको !

By राम शिनगारे | Updated: July 18, 2024 20:22 IST

राज्यात २० जुलैपर्यंत शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम

छत्रपती संभाजीनगर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार प्रत्येक बालकास शिक्षण घेण्याचा हक्क आहे. त्यामुळे ३ ते १८ वर्षांच्या मधील बालक, युवकांना शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. त्यामुळे राज्य शासनाने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करणाऱ्या नागरिकांची मुले, आर्थिक परिस्थितीमुळे शाळेत घालू न शकणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. मागील ५ जुलैपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली असून, ही मोहीम २० जुलैपर्यंत चालणार आहे.

५ जुलैपासून सुरूप्रत्येक बालकास शिक्षण मिळणे हा त्याचा हक्क आहे. त्यामुळे शासनाकडून शाळामध्ये न येणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ही मुले कोणत्याही ठिकाणी असली तरी त्यांना शाळेत प्रवेश देऊन त्यांच्या राहण्यासह जेवणाची व्यवस्थाही केली जाते. त्यासाठी मुलांची शोधमोहीम ५ जुलैपासून सुरू झाली आहे.

२० जुलैपर्यंत चालणार मोहीमशाळाबाह्य मुलांची शोधमोहीम ५ जुलैपासून सुरू झाली आहे. ही मोहीम २० जुलैपर्यंत चालणार आहे. ही मोहीम थांबल्यानंतर शाळाबाह्य मुलांची संख्या समोर येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.

येथे करणार सर्वेक्षणमुलांचा शोध घेण्यासाठी स्थलांतरितांच्या घरी पाहणी, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, वीटभट्ट्या, हॉटेल्स, दगडखाणी, साखर कारखाने, बाजारतळ इ. ठिकाणी मुलांचा शोध घ्यायचा आहे, तसेच वंचित गटातील वस्त्यांमध्ये जाऊन पाहणी, त्याशिवाय ग्रामीण भागातील गाव, वाड्या, तांडे, पाडे, शेतमळे, जंगलात राहणाऱ्या पालकांचा शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात समावेश करायचा आहे.

असे असेल नियोजनशाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात शिक्षणाधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, महापालिका किंवा नगरपालिकेतील प्रशासन अधिकारी, हे अधिकारी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करतील. त्याशिवाय गावखेड्यापर्यंतही यंत्रणा लावण्यात आलेली आहे.

२० जुलैपर्यंत सर्वेक्षण जिल्हाभरात शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे काम जोरात सुरू आहे. २० जुलैपर्यंत सर्वेक्षण होईल. त्यानंतर सर्वेक्षणात आढळलेल्या मुलांची संख्या समोर येणार आहे. शाळाबाह्य मुले आढळल्यास संबंधितांना मुख्य प्रवाहात आणले जाईल.- जयश्री चव्हाण,शिक्षणाधिकारी. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण