शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

गुरुजी, गाव, वाडी-तांड्यांपर्यंत पोरं शोधा, एक पण सुटायला नको !

By राम शिनगारे | Updated: July 18, 2024 20:22 IST

राज्यात २० जुलैपर्यंत शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम

छत्रपती संभाजीनगर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार प्रत्येक बालकास शिक्षण घेण्याचा हक्क आहे. त्यामुळे ३ ते १८ वर्षांच्या मधील बालक, युवकांना शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. त्यामुळे राज्य शासनाने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करणाऱ्या नागरिकांची मुले, आर्थिक परिस्थितीमुळे शाळेत घालू न शकणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. मागील ५ जुलैपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली असून, ही मोहीम २० जुलैपर्यंत चालणार आहे.

५ जुलैपासून सुरूप्रत्येक बालकास शिक्षण मिळणे हा त्याचा हक्क आहे. त्यामुळे शासनाकडून शाळामध्ये न येणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ही मुले कोणत्याही ठिकाणी असली तरी त्यांना शाळेत प्रवेश देऊन त्यांच्या राहण्यासह जेवणाची व्यवस्थाही केली जाते. त्यासाठी मुलांची शोधमोहीम ५ जुलैपासून सुरू झाली आहे.

२० जुलैपर्यंत चालणार मोहीमशाळाबाह्य मुलांची शोधमोहीम ५ जुलैपासून सुरू झाली आहे. ही मोहीम २० जुलैपर्यंत चालणार आहे. ही मोहीम थांबल्यानंतर शाळाबाह्य मुलांची संख्या समोर येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.

येथे करणार सर्वेक्षणमुलांचा शोध घेण्यासाठी स्थलांतरितांच्या घरी पाहणी, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, वीटभट्ट्या, हॉटेल्स, दगडखाणी, साखर कारखाने, बाजारतळ इ. ठिकाणी मुलांचा शोध घ्यायचा आहे, तसेच वंचित गटातील वस्त्यांमध्ये जाऊन पाहणी, त्याशिवाय ग्रामीण भागातील गाव, वाड्या, तांडे, पाडे, शेतमळे, जंगलात राहणाऱ्या पालकांचा शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात समावेश करायचा आहे.

असे असेल नियोजनशाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात शिक्षणाधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, महापालिका किंवा नगरपालिकेतील प्रशासन अधिकारी, हे अधिकारी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करतील. त्याशिवाय गावखेड्यापर्यंतही यंत्रणा लावण्यात आलेली आहे.

२० जुलैपर्यंत सर्वेक्षण जिल्हाभरात शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे काम जोरात सुरू आहे. २० जुलैपर्यंत सर्वेक्षण होईल. त्यानंतर सर्वेक्षणात आढळलेल्या मुलांची संख्या समोर येणार आहे. शाळाबाह्य मुले आढळल्यास संबंधितांना मुख्य प्रवाहात आणले जाईल.- जयश्री चव्हाण,शिक्षणाधिकारी. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण