शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

गुरुजी, गाव, वाडी-तांड्यांपर्यंत पोरं शोधा, एक पण सुटायला नको !

By राम शिनगारे | Updated: July 18, 2024 20:22 IST

राज्यात २० जुलैपर्यंत शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम

छत्रपती संभाजीनगर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार प्रत्येक बालकास शिक्षण घेण्याचा हक्क आहे. त्यामुळे ३ ते १८ वर्षांच्या मधील बालक, युवकांना शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. त्यामुळे राज्य शासनाने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करणाऱ्या नागरिकांची मुले, आर्थिक परिस्थितीमुळे शाळेत घालू न शकणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. मागील ५ जुलैपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली असून, ही मोहीम २० जुलैपर्यंत चालणार आहे.

५ जुलैपासून सुरूप्रत्येक बालकास शिक्षण मिळणे हा त्याचा हक्क आहे. त्यामुळे शासनाकडून शाळामध्ये न येणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ही मुले कोणत्याही ठिकाणी असली तरी त्यांना शाळेत प्रवेश देऊन त्यांच्या राहण्यासह जेवणाची व्यवस्थाही केली जाते. त्यासाठी मुलांची शोधमोहीम ५ जुलैपासून सुरू झाली आहे.

२० जुलैपर्यंत चालणार मोहीमशाळाबाह्य मुलांची शोधमोहीम ५ जुलैपासून सुरू झाली आहे. ही मोहीम २० जुलैपर्यंत चालणार आहे. ही मोहीम थांबल्यानंतर शाळाबाह्य मुलांची संख्या समोर येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.

येथे करणार सर्वेक्षणमुलांचा शोध घेण्यासाठी स्थलांतरितांच्या घरी पाहणी, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, वीटभट्ट्या, हॉटेल्स, दगडखाणी, साखर कारखाने, बाजारतळ इ. ठिकाणी मुलांचा शोध घ्यायचा आहे, तसेच वंचित गटातील वस्त्यांमध्ये जाऊन पाहणी, त्याशिवाय ग्रामीण भागातील गाव, वाड्या, तांडे, पाडे, शेतमळे, जंगलात राहणाऱ्या पालकांचा शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात समावेश करायचा आहे.

असे असेल नियोजनशाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात शिक्षणाधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, महापालिका किंवा नगरपालिकेतील प्रशासन अधिकारी, हे अधिकारी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करतील. त्याशिवाय गावखेड्यापर्यंतही यंत्रणा लावण्यात आलेली आहे.

२० जुलैपर्यंत सर्वेक्षण जिल्हाभरात शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे काम जोरात सुरू आहे. २० जुलैपर्यंत सर्वेक्षण होईल. त्यानंतर सर्वेक्षणात आढळलेल्या मुलांची संख्या समोर येणार आहे. शाळाबाह्य मुले आढळल्यास संबंधितांना मुख्य प्रवाहात आणले जाईल.- जयश्री चव्हाण,शिक्षणाधिकारी. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण