शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

गुंठेवारी वॉर्डाला आता उच्चभ्रू वसाहतीचा ‘लूक’; एक दिवस, एक वसाहत

By साहेबराव हिवराळे | Updated: August 18, 2023 21:52 IST

अंबिकानगर ते एअरपोर्ट परिसर : रस्ते चिखलमुक्त; पण नाला पावसाळ्यात धोकादायक

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडलगत असलेल्या अंबिकानगर, लोकशाही कॉलनी, संतोषीमातानगर, न्यू एसटी कॉलनीत रस्ते चिखलमुक्त झाले आहेत. एकेकाळी पत्र्याचे शेड दिसणाऱ्या घरांच्या जागी टोलेजंग इमारतींमुळे परिसरास उच्चभ्रू वसाहतीचा ‘लूक’ आला आहे; पण सांडपाण्याच्या नाल्याला रिटर्निंग व्हॉल्व्हची उणीव भासत असल्याने पावसाळ्यातील धोकादायक स्थिती मात्र आजही कायम आहे.

सेवासुविधा व पक्क्या बांधकामांमुळे परिसर उजळून दिसत आहे. तत्कालीन नगरसेवक मंदा काळुसे, मोतीलाल जगताप, नारायण कुचे, कमल नरोटे, भाऊसाहेब जगताप यांनी विकासकामांसाठी प्रयत्न केलेले आहेत. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी बाकडे, पेव्हर ब्लॉक, वीज, पाण्याची व्यवस्था आहे. मनपा आयुक्तही भेट देऊन गेले आहेत.

धोकादायक नाल्याची उंची वाढविण्याची गरज मुकुंदवाडीतून संतोषीमातानगरकडे जाताना आरोग्य केंद्रालगत नाल्यावर बनविलेल्या पुलाजवळ दूरवरून येणाऱ्या पाण्याचा लोंढा गुडघाभर वाहतो. रिटर्निंग व्हॉल्व्हची गरज आहे. - भाऊसाहेब नवगिरे

आरोग्य केंद्राला हवी मोठी जागा

अनेक समस्या प्रयत्नाने व लोकप्रतिनिधींच्या निधीचा उपयोग करीत सोडविण्यात आलेल्या आहेत. गरजूंना मदतीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात; पण आरोग्य केंद्राला अपूर्ण जागेत सेवा द्यावी लागते. मोठ्या जागेसाठी प्रयत्न सुरू आहेत. - माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप

पुलामुळे रहदारीचा प्रश्न निकाली

घराला खेटून आलेल्या नाल्यामुळे आम्हाला नाला ओलांडणे शक्य नव्हते. पुलामुळे रहदारीचा प्रश्न निकाली निघाला आहे. पुढे एका ठिकाणी नाल्यावर टाकण्यात आलेल्या स्लॅबमुळे परिसरातील रहिवाशांची सोय झाली आहे.- इसाक पठाण (प्रतिक्रिया)

रस्ते गुळगुळीत

मुकुंदवाडीकरांना सिडकोने जमिनीच्या बदल्यात दिलेल्या जमिनीत सिमेंट रस्ते, दिवे लावले. जमिनींचे भाव झपाट्याने वाढले असून, बंगले उभे राहत आहेत. पायलटबाबानगरी उच्चभ्रू वसाहत दिसू लागली आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. विकासकामांची गती कायम असावी. - रेखा पवार

संतोषीमाता नगर, अंबिकानगर, राजीव गांधीनगर, पायलटबाबा नगरीत मोकाट जनावरे घराच्या आवारात घुसून नुकसान करीत आहेत. जनावरांना बंदिस्त करण्याच्या मनपाच्या सूचना असतानाही दुर्लक्ष केले जाते. स्वच्छ वॉर्डात अस्वच्छता पसरविण्याचा प्रकार होत आहे. वराह व कुत्र्यांकडून हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे वाहनांचे अपघातही होत आहेत.- संतोष शेंगुळे पाटील.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद