शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

गुंठेवारी वॉर्डाला आता उच्चभ्रू वसाहतीचा ‘लूक’; एक दिवस, एक वसाहत

By साहेबराव हिवराळे | Updated: August 18, 2023 21:52 IST

अंबिकानगर ते एअरपोर्ट परिसर : रस्ते चिखलमुक्त; पण नाला पावसाळ्यात धोकादायक

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडलगत असलेल्या अंबिकानगर, लोकशाही कॉलनी, संतोषीमातानगर, न्यू एसटी कॉलनीत रस्ते चिखलमुक्त झाले आहेत. एकेकाळी पत्र्याचे शेड दिसणाऱ्या घरांच्या जागी टोलेजंग इमारतींमुळे परिसरास उच्चभ्रू वसाहतीचा ‘लूक’ आला आहे; पण सांडपाण्याच्या नाल्याला रिटर्निंग व्हॉल्व्हची उणीव भासत असल्याने पावसाळ्यातील धोकादायक स्थिती मात्र आजही कायम आहे.

सेवासुविधा व पक्क्या बांधकामांमुळे परिसर उजळून दिसत आहे. तत्कालीन नगरसेवक मंदा काळुसे, मोतीलाल जगताप, नारायण कुचे, कमल नरोटे, भाऊसाहेब जगताप यांनी विकासकामांसाठी प्रयत्न केलेले आहेत. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी बाकडे, पेव्हर ब्लॉक, वीज, पाण्याची व्यवस्था आहे. मनपा आयुक्तही भेट देऊन गेले आहेत.

धोकादायक नाल्याची उंची वाढविण्याची गरज मुकुंदवाडीतून संतोषीमातानगरकडे जाताना आरोग्य केंद्रालगत नाल्यावर बनविलेल्या पुलाजवळ दूरवरून येणाऱ्या पाण्याचा लोंढा गुडघाभर वाहतो. रिटर्निंग व्हॉल्व्हची गरज आहे. - भाऊसाहेब नवगिरे

आरोग्य केंद्राला हवी मोठी जागा

अनेक समस्या प्रयत्नाने व लोकप्रतिनिधींच्या निधीचा उपयोग करीत सोडविण्यात आलेल्या आहेत. गरजूंना मदतीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात; पण आरोग्य केंद्राला अपूर्ण जागेत सेवा द्यावी लागते. मोठ्या जागेसाठी प्रयत्न सुरू आहेत. - माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप

पुलामुळे रहदारीचा प्रश्न निकाली

घराला खेटून आलेल्या नाल्यामुळे आम्हाला नाला ओलांडणे शक्य नव्हते. पुलामुळे रहदारीचा प्रश्न निकाली निघाला आहे. पुढे एका ठिकाणी नाल्यावर टाकण्यात आलेल्या स्लॅबमुळे परिसरातील रहिवाशांची सोय झाली आहे.- इसाक पठाण (प्रतिक्रिया)

रस्ते गुळगुळीत

मुकुंदवाडीकरांना सिडकोने जमिनीच्या बदल्यात दिलेल्या जमिनीत सिमेंट रस्ते, दिवे लावले. जमिनींचे भाव झपाट्याने वाढले असून, बंगले उभे राहत आहेत. पायलटबाबानगरी उच्चभ्रू वसाहत दिसू लागली आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. विकासकामांची गती कायम असावी. - रेखा पवार

संतोषीमाता नगर, अंबिकानगर, राजीव गांधीनगर, पायलटबाबा नगरीत मोकाट जनावरे घराच्या आवारात घुसून नुकसान करीत आहेत. जनावरांना बंदिस्त करण्याच्या मनपाच्या सूचना असतानाही दुर्लक्ष केले जाते. स्वच्छ वॉर्डात अस्वच्छता पसरविण्याचा प्रकार होत आहे. वराह व कुत्र्यांकडून हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे वाहनांचे अपघातही होत आहेत.- संतोष शेंगुळे पाटील.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद