शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

गुंठेवारीबाबत पालकमंत्र्यांची धमकी, तर महापालिका आयुक्त राबवीत आहेत राज्यकर्त्यांचा अजेंडा - भाजप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 11:53 IST

Subhash Desai : नियमितीकरणाच्या नावाखाली गुंठेवारी वसाहतींमधून मनपा महावसुली करत असल्याचा भाजपाचा आरोप

ठळक मुद्दे१५ नोव्हेंबरनंतर पालिकेवर नागरिकांचा मोर्चाखैरेंनी विषयपत्रिका मंजूर केली तरच निर्णय व्हायचे

औरंगाबाद : गुंठेवारी वसाहतींमध्ये नियमितीकरणाच्या नावाखाली महापालिकेने महावसुली अभियान सुरू केले असून, याविरोधात १५ नोव्हेंबरनंतर पालिकेवर नागरिकांचा मोर्चा काढण्याचा इशारा भाजपा शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. गुंठेवारी वसाहतींना स्लम घोषित करावे, गुंठेवारीतील करांचा ५० टक्के वाटा शासनाने उचलावा, या प्रमुख मागण्या मोर्चामध्ये असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी व्हिडीओमधून नागरिकांना धमकीवजा इशारा दिला आहे, तर महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय हे राज्यकर्त्यांचा अजेंडा राबवीत असल्याचा आरोप करीत केणेकर म्हणाले, दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथीमुळे गुंठेवारी वसाहतींमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांची दैनंदिनी विस्कळीत झाली. सुमारे १२० वसाहतींमधून मजूर, कामगार, नागरिक या भागात राहतात.

महापालिकेच्या सभेमध्ये जेव्हा गुंठेवारी नियमितीकरणाचे ठराव आणले गेले, त्यावेळी भाजपाने वारंवार नागरिकांची बाजू घेतली आहे. शिवसेनेने किमान गुंठेवारीतील कायद्याचे पुन:मूल्यांकन करण्याची मागणी शासनाकडे केली पाहिजे. परंतु त्यांच्याच पक्षातील काही लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांनी गुंठेवारी मालमत्ता नियमितीकरण करून दुकाने थाटली आहेत. या वसाहतींचा उदय होत असताना पालिकेने आणि शासनाने वारंवार डोळेझाक केली. त्यामुळेच या वसाहतींमध्ये असुविधा निर्माण झाल्या. आता गुंठेवारीतील व्यापारी मालमत्तांवर कारवाईस तूर्तास स्थगिती दिल्याचे पालकमंत्री सांगत असले तरी व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिक दहशतीखाली आहेत. या पत्रकार परिषदेला राजगौरव वानखेडे, शिवाजी दांडगे, नितीन चित्ते, सागर पाले, मनीषा मुंडे, राजेश मेहता, शैलेश हेकाडे आदींची उपस्थिती होती.

खैरेंनी विषयपत्रिका मंजूर केली तरच निर्णय व्हायचेमाजी महापौर भगवान घडमोडे यांनी आरोप केला की, मनपा सर्वसाधारण सभेची विषयपत्रिका आधी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडे जायची. त्यांनी निर्णय घेतला तरच विषयपत्रिका मंजूर होत असे. त्यामुळे आम्ही जरी शिवसेनेसोबत सत्तेत राहिलो असलो तरी गुंठेवारीतील असुविधांचे पाप आमच्यामुळे नसून ते शिवसेनेमुळेच आहे. कारण प्रत्येक विकासाच्या ठरावाला त्यांनीच विरोध केला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSubhash Desaiसुभाष देसाई