शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

गुंठेवारीबाबत पालकमंत्र्यांची धमकी, तर महापालिका आयुक्त राबवीत आहेत राज्यकर्त्यांचा अजेंडा - भाजप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 11:53 IST

Subhash Desai : नियमितीकरणाच्या नावाखाली गुंठेवारी वसाहतींमधून मनपा महावसुली करत असल्याचा भाजपाचा आरोप

ठळक मुद्दे१५ नोव्हेंबरनंतर पालिकेवर नागरिकांचा मोर्चाखैरेंनी विषयपत्रिका मंजूर केली तरच निर्णय व्हायचे

औरंगाबाद : गुंठेवारी वसाहतींमध्ये नियमितीकरणाच्या नावाखाली महापालिकेने महावसुली अभियान सुरू केले असून, याविरोधात १५ नोव्हेंबरनंतर पालिकेवर नागरिकांचा मोर्चा काढण्याचा इशारा भाजपा शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. गुंठेवारी वसाहतींना स्लम घोषित करावे, गुंठेवारीतील करांचा ५० टक्के वाटा शासनाने उचलावा, या प्रमुख मागण्या मोर्चामध्ये असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी व्हिडीओमधून नागरिकांना धमकीवजा इशारा दिला आहे, तर महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय हे राज्यकर्त्यांचा अजेंडा राबवीत असल्याचा आरोप करीत केणेकर म्हणाले, दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथीमुळे गुंठेवारी वसाहतींमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांची दैनंदिनी विस्कळीत झाली. सुमारे १२० वसाहतींमधून मजूर, कामगार, नागरिक या भागात राहतात.

महापालिकेच्या सभेमध्ये जेव्हा गुंठेवारी नियमितीकरणाचे ठराव आणले गेले, त्यावेळी भाजपाने वारंवार नागरिकांची बाजू घेतली आहे. शिवसेनेने किमान गुंठेवारीतील कायद्याचे पुन:मूल्यांकन करण्याची मागणी शासनाकडे केली पाहिजे. परंतु त्यांच्याच पक्षातील काही लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांनी गुंठेवारी मालमत्ता नियमितीकरण करून दुकाने थाटली आहेत. या वसाहतींचा उदय होत असताना पालिकेने आणि शासनाने वारंवार डोळेझाक केली. त्यामुळेच या वसाहतींमध्ये असुविधा निर्माण झाल्या. आता गुंठेवारीतील व्यापारी मालमत्तांवर कारवाईस तूर्तास स्थगिती दिल्याचे पालकमंत्री सांगत असले तरी व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिक दहशतीखाली आहेत. या पत्रकार परिषदेला राजगौरव वानखेडे, शिवाजी दांडगे, नितीन चित्ते, सागर पाले, मनीषा मुंडे, राजेश मेहता, शैलेश हेकाडे आदींची उपस्थिती होती.

खैरेंनी विषयपत्रिका मंजूर केली तरच निर्णय व्हायचेमाजी महापौर भगवान घडमोडे यांनी आरोप केला की, मनपा सर्वसाधारण सभेची विषयपत्रिका आधी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडे जायची. त्यांनी निर्णय घेतला तरच विषयपत्रिका मंजूर होत असे. त्यामुळे आम्ही जरी शिवसेनेसोबत सत्तेत राहिलो असलो तरी गुंठेवारीतील असुविधांचे पाप आमच्यामुळे नसून ते शिवसेनेमुळेच आहे. कारण प्रत्येक विकासाच्या ठरावाला त्यांनीच विरोध केला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSubhash Desaiसुभाष देसाई