शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

पालकमंत्री सावंत; त्यांना नाही उसंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 11:39 IST

पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून २३ फेब्रुवारी रोजी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर त्यांनी औरंगाबादच्या कचरा डेपो आणि प्रक्रिया प्रकरणाकडे पाठ फिरविली आहे.

ठळक मुद्देसरकारी आणि राजकीय लवाजमा कचरा प्रकरणाशी जोडला गेला असतानाही ३३ दिवसांपासून शहरातील कचर्‍याची समस्या सुटू शकली नाही. उलट पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत.

- विकास राऊत  

औरंगाबाद : नारेगावातील डेपोत कचरा टाकण्यासाठी आसपासच्या १४ गावांतील नागरिकांनी सुरू केलेल्या आंदोलनासमोर पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून २३ फेब्रुवारी रोजी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर त्यांनी औरंगाबादच्या कचरा डेपो आणि प्रक्रिया प्रकरणाकडे पाठ फिरविली आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री डॉ. सावंत हे राज्याचे आरोग्यमंत्री असून, शहरातील कचर्‍याच्या ढिगार्‍यांमुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्येचाही त्यांनी आढावा घेतलेला नाही. 

सरकारी आणि राजकीय लवाजमा कचरा प्रकरणाशी जोडला गेला असतानाही ३३ दिवसांपासून शहरातील कचर्‍याची समस्या सुटू शकली नाही. उलट पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. कचर्‍याची समस्या तशीच जनजागृती आणि प्रक्रियेसाठी जागा नसल्याने कचरा शहराच्या गल्लीबोळात राजकीय मुद्दा बनू लागला आहे. 

कदम असते तर चित्र वेगळे असते पालकमंत्री डॉ.सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आॅफर ठोकपणे आंदोलकांसमोर मांडता आल्या नाहीत. त्यामुळेच कचरा डेपोचे प्रकरण लांबले. तासाभराच्या बैठकीने हा प्रश्न सुटण्यासारखा नव्हता. दरम्यान तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांच्या कार्यशैलीची कचरा डेपो प्रकरणात गरज होती, असे सेनेच्या एका गटाला वाटते आहे. निर्णयक्षमता आणि यंत्रणेकडून काम करून घेण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे कचर्‍याचा प्रश्न सुटला असता. शिवाय यंत्रणेला हतबल होऊन जागेसाठी भटकंतीची वेळ आली नसती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

पालकमंत्री म्हणाले होते...शहरात दोन ते तीन जागा कचरा टाकण्यासाठी वापरता येतील. त्या जागांचा आढावा घेऊन तीन ते चार दिवसांत व्यवस्था केली जाईल. प्रक्रिया प्रकल्पाला पाच महिन्यांचा कालावधी लागेल. त्याचा प्रशासकीय कालावधी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल.४कचरा टाकण्यास २४ फेबु्रवारीपासून सुरुवात होईल. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने काळजीपूर्वक विचार केला जाईल, असे पालकमंत्री २३ फेबु्रवारी रोजी म्हणाले होते. ३३ दिवसांत त्यांनी कचरा प्रकरण मुंबईतूनच हाताळले असून, ग्राऊंडवर येऊन काहीही आढावा घेतलेला नाही. शिवाय स्थानिक  प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना मार्गदर्शनही केले नाही. याप्रकरणी पालकमंत्री डॉ.सावंत यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपोAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाguardian ministerपालक मंत्री