शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

नागरिकांसाठी मोफत उपचाराची हमी; तुम्ही आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढले का?

By विजय सरवदे | Updated: October 22, 2023 11:50 IST

योजनेंतर्गत आता ५ लाखांपर्यंत विमा संरक्षण दिले जाणार असून, सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार हवा असेल तर नागरिकांना आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावे लागणार आहे. जिल्ह्यात ५० टक्के नागरिकांनी अद्यापही हे कार्ड काढलेले नाही. दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाने राबविलेल्या मोहिमेत या दहा दिवसांत तब्बल १ लाख ५९५ जणांचे हे कार्ड काढले आहे.

राज्यातील गरीब नागरिकांना गंभीर आजारावरील उपचार तसेच शस्त्रक्रियेसाठी नि:शुल्क व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेंतर्गत आता ५ लाखांपर्यंत विमा संरक्षण दिले जाणार असून, सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी जिल्ह्यात गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम राबविली. दहा दिवसांत १८३३ आशा स्वयंसेविकांनी गावपातळीवर सूक्ष्म नियोजन केले व १ लाख ५९५ नागरिकांना गोल्डन कार्ड काढून दिले.

काय आहे आयुष्मान भारत कार्ड ?महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत नागरिकांना सरकारी व खासगी दवाखान्यात ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील १५ दिवस शासनाकडून खर्च करण्यात येणार आहे. योजनेत कुटुंबातील सर्व सदस्यांना वयानुसार योजनेचा लाभ मिळणार आहे. यात लाभार्थ्याला एक रुपयादेखील भरावा लागणार नाही. ही योजना पूर्णपणे कॅशलेस आहे. मात्र, त्यासाठी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड आवश्यक आहे.

जिल्ह्यात १० लाख लाभार्थीआयुष्मान भारत गोल्डन कार्ड योजनेत जिल्ह्यात १० लाख नागरिक निश्चित करण्यात आले आहेत. यात शहरातील ५ लाख तर ग्रामीण भागात ५ लाख नागरिकांचा समावेश आहे. जि.प. कार्यक्षेत्रातील ५ लाखांपैकी आतापर्यंत २ लाख ३५ हजार नागरिकांनीच कार्ड काढलेले आहे. अजून ५० टक्के नागरिकांनी कार्ड काढलेले नाही.

दहा दिवसांत काढलेल्या कार्डची स्थितीतालुका गोल्डन कार्डछत्रपती संभाजीनगर १२,०५८फुलंब्री ७६३८सिल्लोड १७,१४५सोयगाव ५,७०६कन्नड १४,२००खुलताबाद ४,४१२गंगापूर १२,२५७वैजापूर १६,८०३पैठण १०,३७६

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य