शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

परमपावन दलाई लामांना अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 03:04 IST

अवघ्या विश्वाचे छप्पर असलेल्या शांती व अहिंसाप्रिय देशावर शेजारच्या बलाढ्य चीन देशाने आक्रमण करून साठ लाख लोकसंख्येवर परवशतेचे पाश आवळले.

- प्रा. डॉ. भाऊ लोखंडेअवघ्या विश्वाचे छप्पर असलेल्या शांती व अहिंसाप्रिय देशावर शेजारच्या बलाढ्य चीन देशाने आक्रमण करून साठ लाख लोकसंख्येवर परवशतेचे पाश आवळले. या बौद्ध धर्मीय देशाचे धर्मप्रमुख व राष्ट्रप्रमुख म्हणून परमपावन दलाई लामांचा पराकोटीचा सन्मान व पूजा केली जाते. ते स्वत:ला एक साधा बौद्ध भिक्षू म्हणतात. परंतु जनता मात्र त्यांना तिबेटी भाषेत ‘येशी नोरबू’ म्हणजे मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणी’ म्हणतात. ‘दलाई लामा’ या मंगोल संज्ञेचा अर्थ ‘ज्ञान प्रज्ञेचा सागर’ असा होतो. त्यांना अवलौकितेश्वरा (चेन-रेजी) चा साक्षात अवतार किंवा कारुण्य सिंधू मानतात.रदार, देश, राज्य हिरावून निर्वासितांचे जगणे वाट्याला आले तरी त्यांच्या चर्येवरील तेज, शांती व संयम ढळला नाही. त्यांनी तिबेटी बांधवांना भारतात कृतज्ञपणे सन्मानाने जगायला शिकवले. कमी उत्पन्नात, कमी खर्चाचा व गरजांचा मेळ बसवून समाधानाने धर्माचरण करीत जगायला शिकवले. त्यांच्या ऐतिहासिक ‘न भूतो न भविष्यती’ अशा विश्वशांतीच्या कार्याचा गौरव मानाचा मुजरा करण्यासाठी जेव्हा दलाई लामांना ‘नोबेल पुरस्कार’ देण्यात आला तेव्हा ते निरपेक्ष शांतपणे म्हणाले, ‘या पुरस्कारामुळे माझा अहिंसक आंदोलनावर अधिक विश्वास बळावला. या पुरस्काराची राशी मी जगात अन्नाविना जगणाऱ्या असहाय उपाशी लोकांसाठी खर्च करायला देईन. माझ्या तिबेटी लोकांना पैशाची गरज नाही, असे नाही; परंतु जगाच्या पाठीवर कुणीही तिबेटी उपाशी झोपत नाही. म्हणून मी ही राशी जगातील अभावग्रस्त गरीब दु:खितांसाठी उपयोगात आणीन. यावरून ‘न त्वमहं राज्यं न स्वर्ग न पुनर्भवम्। काम ये दु:खतप्चांना प्राणिनां अर्तविनाशनम्।या राज्य, स्वर्ग, पुनर्जन्म नाकारून दु:खपीडित प्राण्यांच्या दु:खाचा विनाश अपेक्षिणाºया करुणेच्या सागराच्या बोधिसत्त्वाच्या मंगलमैत्रीचा अनुभव येतो. भारताने दलाई लामांना देऊन तिबेटी व जगातील मानवताप्रेमी जनतेची सहानुभूती व शाबासकी मिळविली. ब्रिटिशांच्या राज्यात तिबेट हे बफरस्टेट होते. चीन व भारताच्या सैन्यतुकड्या तिबेटमध्ये ठेवल्या जात. त्यामुळे भारताच्या सीमा सुरक्षित होत्या; परंतु हिंदी चिनी भाई-भाई म्हणत माओ व चाऊ एन लाईनने भारताला धोका देण्यासाठी ‘पंचशीला’चा वापर केला आणि तिबेटवर चीनचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संसदेत धोक्याचा इशारा देत म्हणाले होते ‘भारत सरकारने तिबेटवर चीनचे सार्वभौमत्व मान्य करून घोडचूक केली. तिबेटला बफरस्टेटच राहू द्यायला पाहिजे होते; परंतु आता भारताच्या सीमेबरोबर चीनची सीमा जोडली गेली. चीनचा इतिहास हा आक्रमणाचा इतिहास  आहे.भारताने खºया अर्थाने शांती, अहिंसा, धर्मसहिष्णुता, बंधुभावाची उदात्त मूल्ये बुद्धगयेतून जगाला दिली आहेत. त्यांचा परमपावन दलाई लामा आपल्या अमृतवाणीने पुनरुच्चार व प्रबोधन करून भारतात समता, स्वातंत्र्य व बंधुतेचा संदेश देऊन उपकृत करतील, अशी अपेक्षा व आकांक्षा आहे. या ग्लोबल परिषदेतून ‘सर्वधर्म सहिष्णुता व मानवतेचा जयजयकार हाईल आणि सब्बे सत्ता सुखी होन्तू। मा कंचि दु:खमागमा’ या पसायदानाबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा मंगलमैत्रीचा संदेश गगनात निनादेल अशी मंगलकामना आहे.(लेखक हे प्रसिद्ध बौद्ध विद्वान वआंबेडकरी विचारवंत आहेत.)

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाMaharashtraमहाराष्ट्र