शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन औरंगाबाद! प्रवासी-मालवाहतुकीसाठी शहरातील रस्त्यांवर उतरले शंभराच्यावर इलेक्ट्रिक रिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 13:43 IST

इंधनाच्या वाढत्या दरामुळे गेल्या काही वर्षांत ई-वाहनांची संकल्पना आता सर्वसामान्यांमध्ये हळूहळू रुजत आहे.

औरंगाबाद : इंधन दरवाढीची झळ रिक्षाचालकांनाही सहन करावी लागत आहे. परिणामी, औरंगाबादेत इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकीपाठोपाठ आता इलेक्ट्रिक रिक्षाही धावताना दिसणार आहे. आजघडीला प्रवासी वाहतुकीच्या १० इलेक्ट्रिक रिक्षा शहरातील रस्त्यांवर धावत आहेत, तर मालवाहतूक करणाऱ्या ११६ ई-रिक्षा धावत आहेत.

इंधनाच्या वाढत्या दरामुळे गेल्या काही वर्षांत ई-वाहनांची संकल्पना आता सर्वसामान्यांमध्ये हळूहळू रुजत आहे. औरंगाबादकरही ई-वाहनांकडे वळत असल्याचे गेल्या काही महिन्यांत भर पडलेल्या ई-वाहनांच्या आकडेवारीवरून पाहायला मिळत आहे; परंतु आता केवळ ई-दुचाकी, चारचाकीच नव्हे, तर ई-रिक्षाही रस्त्यावर उतरत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्येही ई-रिक्षा दाखल होत आहे.

ई-रिक्षा किती प्रवासी नेऊ शकते?इंधनावरील अनेक रिक्षांमधून प्रवाशांना अक्षरश: कोंबून वाहतूक होताना दिसते. अशा परिस्थितीत ई-रिक्षा किती प्रवाशांना घेऊन जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जितके जास्त प्रवासी, तितके अधिक पैसे, असा रिक्षाचालकांचा हिशेब असतो. परंतु, ई-रिक्षामधूनही नियमाप्रमाणे तीनच प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आलेली आहे. ई-रिक्षाच्या क्षमतेप्रमाणे अधिक प्रवाशांची वाहतूक होऊ शकेल; परंतु नियमाला धरून नाही.

उत्पन्नासाठी ठरू शकते लाभदायकपेट्रोलचे दर १११ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. दुचाकी, चारचाकींबरोबर रिक्षाचालकांनाही इंधनाच्या वाढत्या दरामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. प्रवासी वाहतूक करताना इंधनाचेही पैसे निघत नाही, अशी ओरड होते. अशा परिस्थिती ई-रिक्षाचालकांसाठी उत्पन्न देणारी ठरू शकते, अशी आशा व्यक्त होत आहे.

इंधन दरवाढीत मिळू शकतो दिलासाइंधन दरवाढीमुळे रिक्षा चालविणे अवघड होत आहे. अशा परिस्थितीत ई-रिक्षा फायद्याची ठरू शकते. एकदा चार्जिंग केल्यानंतर ८० कि.मी.पर्यंत ही रिक्षा धावत असल्याचे सांगितले जाते. कंपन्यांनुसार त्यात कमी-अधिक प्रमाण असू शकते.- शेख अकील, उपाध्यक्ष, रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघ

तीन प्रवासी वाहतुकीची परवानगीआरटीओ कार्यालयात ई-दुचाकी, चारचाकीबरोबर ई-रिक्षांचीही नोंदणी होत आहे. या ई-रिक्षांमधून तीन प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी आहे.- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

औरंगाबादेतील ई-वाहनांची संख्या- दुचाकी-१३३४- चारचाकी-९९- बस-२- प्रवासी रिक्षा-१०- मालवाहू रिक्षा-११६

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर