शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

ग्रीन औरंगाबाद! प्रवासी-मालवाहतुकीसाठी शहरातील रस्त्यांवर उतरले शंभराच्यावर इलेक्ट्रिक रिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 13:43 IST

इंधनाच्या वाढत्या दरामुळे गेल्या काही वर्षांत ई-वाहनांची संकल्पना आता सर्वसामान्यांमध्ये हळूहळू रुजत आहे.

औरंगाबाद : इंधन दरवाढीची झळ रिक्षाचालकांनाही सहन करावी लागत आहे. परिणामी, औरंगाबादेत इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकीपाठोपाठ आता इलेक्ट्रिक रिक्षाही धावताना दिसणार आहे. आजघडीला प्रवासी वाहतुकीच्या १० इलेक्ट्रिक रिक्षा शहरातील रस्त्यांवर धावत आहेत, तर मालवाहतूक करणाऱ्या ११६ ई-रिक्षा धावत आहेत.

इंधनाच्या वाढत्या दरामुळे गेल्या काही वर्षांत ई-वाहनांची संकल्पना आता सर्वसामान्यांमध्ये हळूहळू रुजत आहे. औरंगाबादकरही ई-वाहनांकडे वळत असल्याचे गेल्या काही महिन्यांत भर पडलेल्या ई-वाहनांच्या आकडेवारीवरून पाहायला मिळत आहे; परंतु आता केवळ ई-दुचाकी, चारचाकीच नव्हे, तर ई-रिक्षाही रस्त्यावर उतरत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्येही ई-रिक्षा दाखल होत आहे.

ई-रिक्षा किती प्रवासी नेऊ शकते?इंधनावरील अनेक रिक्षांमधून प्रवाशांना अक्षरश: कोंबून वाहतूक होताना दिसते. अशा परिस्थितीत ई-रिक्षा किती प्रवाशांना घेऊन जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जितके जास्त प्रवासी, तितके अधिक पैसे, असा रिक्षाचालकांचा हिशेब असतो. परंतु, ई-रिक्षामधूनही नियमाप्रमाणे तीनच प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आलेली आहे. ई-रिक्षाच्या क्षमतेप्रमाणे अधिक प्रवाशांची वाहतूक होऊ शकेल; परंतु नियमाला धरून नाही.

उत्पन्नासाठी ठरू शकते लाभदायकपेट्रोलचे दर १११ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. दुचाकी, चारचाकींबरोबर रिक्षाचालकांनाही इंधनाच्या वाढत्या दरामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. प्रवासी वाहतूक करताना इंधनाचेही पैसे निघत नाही, अशी ओरड होते. अशा परिस्थिती ई-रिक्षाचालकांसाठी उत्पन्न देणारी ठरू शकते, अशी आशा व्यक्त होत आहे.

इंधन दरवाढीत मिळू शकतो दिलासाइंधन दरवाढीमुळे रिक्षा चालविणे अवघड होत आहे. अशा परिस्थितीत ई-रिक्षा फायद्याची ठरू शकते. एकदा चार्जिंग केल्यानंतर ८० कि.मी.पर्यंत ही रिक्षा धावत असल्याचे सांगितले जाते. कंपन्यांनुसार त्यात कमी-अधिक प्रमाण असू शकते.- शेख अकील, उपाध्यक्ष, रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघ

तीन प्रवासी वाहतुकीची परवानगीआरटीओ कार्यालयात ई-दुचाकी, चारचाकीबरोबर ई-रिक्षांचीही नोंदणी होत आहे. या ई-रिक्षांमधून तीन प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी आहे.- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

औरंगाबादेतील ई-वाहनांची संख्या- दुचाकी-१३३४- चारचाकी-९९- बस-२- प्रवासी रिक्षा-१०- मालवाहू रिक्षा-११६

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर