शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

अहो आश्चर्यम! शुष्क मराठवाड्यात यंदा फुलली कारवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 17:50 IST

मराठवाडा तब्बल ६० वर्षांनंतर कारवी फुलल्याचा आनंद घेत आहे. वनस्पतीप्रेमी आणि अभ्यासकांसाठी हा एक आश्चर्याचा सुखद धक्का.

औरंगाबाद : दरवर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात फुलून पश्चिम घाटाचे सौंदर्य वाढविणारी कारवी यंदा चक्क औट्रम घाटाच्या रूपात शुष्क मराठवाड्यात आढळून आली आहे. वनस्पतीप्रेमी आणि अभ्यासकांसाठी हा एक आश्चर्याचा सुखद धक्का असून, मराठवाडा तब्बल ६० वर्षांनंतर कारवी फुलल्याचा आनंद घेत आहे. लॉकडाऊनमुळे मार्चपासूनच पर्यटकांचा थांबलेला वावर आणि वरुणराजाने मराठवाड्यावर केलेली कृपादृष्टी यामुळे गवताळा येथे ही किमया बघायला मिळत आहे. वनस्पती अभ्यासकांमध्ये विशेष कुतुहलाचा विषय असणाऱ्या कारवीचा शोध नीस या ब्रिटिश अभ्यासकाने लावला हाेता. १९५३ साली अजिंठा परिसरात कारवी फुलल्याचा पुसटसा उल्लेख काही साहित्यांतून आढळतो. त्यानंतर मात्र तसा कोणताही उल्लेख सापडला नसल्याने यंदा फुललेली कारवी विशेष महत्त्वाची असल्याचे वनस्पती अभ्यासक मिलिंद गिरधारी आणि डॉ. किशोर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

नीळ्या-जांभळ्या रंगाची आकर्षक फुले येणाऱ्या कारवीचे वैशिष्ट्य म्हणजे बी रुजल्यानंतर तब्बल आठव्या वर्षी झाडाला फुले येतात आणि फुले आली की झाडाचे आयुष्य संपून जाते. या फुलांच्या बिया जमिनीत रुजल्या जातात आणि पुन्हा पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात त्याला अंकुर फुटतो. एकाच ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येत कारवी पाहायला मिळते. कारवीचे अनेक औषधी उपयोग असून, पोटाचे आजार आणि वेदनाशामक औषधी म्हणून कारवी उपयुक्त असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

चौकट :

१. वनविभागाने जतन करण्याची गरज

कारवीप्रमाणेच इतरही अनेक दुर्मिळ झाडे गवताळा येथे आढळून आली आहेत. मात्र, हे वनविभागाच्या गावीही नाही. या झाडांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे. मोखा, कौशी, पाडळ, हुंब, काकड ही अतिदुर्मिळ झाडे खऱ्या अर्थाने वनसंपत्ती आहे; परंतु याची रोपे वनविभागात तयार होत नाहीत, हे दुर्दैवी आहे. दिव्याखाली अंधार अशी वनविभागाची परिस्थिती असून, दुर्मिळ झाडांच्या संवर्धनासाठी खाजगी नर्सरीप्रमाणेच वनविभागाच्या नर्सरीनेही पुढाकार घ्यावा.

- मिलिंद गिरधारी

वनस्पती अभ्यासक

२. निसर्ग साखळीतील महत्त्व

गवताळा येथे १०-१२ फूट कारवी वाढलेली आहे. कारवीचा सगळा खेळ पावसावर अवलंबून असून, ते झुडपी प्रकारचे झाड आहे. कारवीची जगभरात एकूण ३५० जातींची झाडे आहेत. भारतात ४६ जातींच्या कारवी आढळतात. याची पाने मोठी आणि लांबूनही ओळखू येतात. कारवी अत्यंत आकर्षक असल्याने त्यावर नानाप्रकारचे कीटक आढळून येतात. त्यामुळे कारवी हे निसर्ग साखळीतील अत्यंत महत्त्वाचे झाड असून, त्याचे संवर्धन होण्याची गरज आहे.

- डॉ. किशोर पाठक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरणMarathwadaमराठवाडा