शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
4
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
5
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
6
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
7
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
8
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
9
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
10
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
11
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
12
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
13
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
14
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
15
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
16
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
17
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
18
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
19
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
20
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांचे ७५ टक्के व्याज माफ; औरंगाबादमधील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 18:33 IST

व्याजाची ७५ टक्केरक्कम माफ करून १ एप्रिलपासून अभय योजना राबविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

औरंगाबाद : शहरातील सव्वालाखाहून अधिक मालमत्ताधारकांना महापालिकेने वेळेवर कर न भरल्याने शास्ती आणि विलंब शुल्क लावला आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा दरवर्षी वाढतच आहे. व्याजाची ७५ टक्केरक्कम माफ करून १ एप्रिलपासून अभय योजना राबविण्याचा निर्णय सोमवारी रात्री उशिरा सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीत २५२ कोटी रुपये येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अभय योजनेची माहिती देताना महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, २०१६-१७ या आर्थिक वर्षात मालमत्ता कराचे उद्दिष्ट २३९ कोटी ठेवण्यात आले होते. मनपाला फक्त ८९ कोटी ३५ लाख रुपये मिळाले. मनपाकडून लावण्यात येणारा दंड आणि व्याजामुळे नागरिक कर भरण्यास तयार नाहीत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ९० कोटी मूळ मागणीवर विलंब शुल्क २५ कोटी ३४ लाख आणि शास्ती ९५ कोटी ४६ लाख रुपये आकारणी केली. त्यामुळे थकबाकीचा आकडा २२२ कोटी १६ लाखांवर पोहोचला.

मालमत्ता कराची वसुली ९० टक्के झालीच पाहिजे, असे शासनाने बंधनकारक केले आहे. दरवर्षी मनपाकडून फक्त २० ते २२ टक्केच वसुली होते. शास्ती आणि विलंब शुल्क ७५ टक्के माफ केल्यास नागरिक उत्स्फूर्तपणे मालमत्ता कर भरतील, असा अंदाज महापालिकेला आहे. एखाद्या नागरिकाचा मूळ मालमत्ता कर २५ हजार असेल, तर त्यावर दंड, व्याज मिळून रक्कम ६० ते ७० हजारांपर्यंत करण्यात आलेली आहे. यात ७५ टक्केरक्कम माफ झाल्यास नागरिक आनंदाने कर भरतील. पुणे महापालिकेने मालमत्ता करासंदर्भात अभय योजना राबविली आहे. नागरिकांना प्रोत्साहन मिळाल्यास निश्चितच मालमत्ता कराचा आलेख उंचावेल, असा आशावाद महापौर नंदकुमार घोडेले  यांनी  व्यक्त केला. 

शासन मंजुरीच्या अधीन ठरावमालमत्ता करासंदर्भात अभय योजना राबविण्याची परवानगी द्यावी असा प्रस्ताव महापालिकेने १६ जून २०१७ रोजी शासनाकडे पाठविला आहे. अद्यापपर्यंत शासनाने याला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे शासनाच्या निर्णयाची वाट न पाहता शासन निर्णयाच्या अधीन राहत सोमवारी रात्री महापालिकेने अभय योजना राबविण्याचा ठराव मंजूर केला.  या ठरावाची अंमलबजावणी १ एप्रिल २०१८ ते ३१ मे २०१८ पर्यंत करण्यात येणार आहे. कर सवलत दिल्याने दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात कराचा भरणा नागरिक करतील,   अशी अपेक्षा महापालिकेला  आहे.

जनजागृती करणारमालमत्ता कर थकबाकीदारांची यादीच महापालिका वेबसाईटवर टाकणार आहे. त्याचप्रमाणे वर्तनपत्रांमध्ये जाहिराती देऊनही करभरणा करण्यासाठी जनजागृती करण्यात येईल. योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणी आल्यास आयुक्तांनी प्रशासकीय स्तरावर निर्णय घेण्याचे       अधिकारही सर्वसाधारण सभेने दिले.

योजनेचे स्वरूप असे - २२२ कोटी- ३१ मार्च २०१७ पर्यंत थकबाकी- १२० कोटी- विलंब शुल्क व शास्ती- ३४२ कोटी- एकूण थकबाकी- ९० कोटी- ७५ टक्क्यांप्रमाणे होणारे नुकसान - २५२ कोटी- महापालिकेच्या तिजोरीत येतील

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरMONEYपैसाcommissionerआयुक्त