शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

हातातोंडाशी आलेला घास हिसकावला: वादळाच्या तडाख्याने केळीची बाग उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:45 AM

  गांधेलीतील घटना : काढणीसाठी आली होती केळी, क्षणात झाले होत्याचे नव्हते; शेतकरी आर्थिक संकटात  औरंगाबाद : पावसाने दगा ...

 

गांधेलीतील घटना : काढणीसाठी आली होती केळी, क्षणात झाले होत्याचे नव्हते; शेतकरी आर्थिक संकटात औरंगाबाद : पावसाने दगा दिल्याने दुष्काळाचे संकट, पाण्याची परिस्थितीही गंभीर, पैशांची अडचण तर पाचवीला पुजलेली. तरीही या सगळ्यांवर मात करून शेतात केळी पिकाची लागवड केली. लेकराप्रमाणे बाग जोपासली. काही दिवसांत काढणीला आलेली केळी भरघोस उत्पन्न देणार होती. परंतु वादळी वाºयाने केळीची बाग आडवी केली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. या अस्मानी संकटाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.गांधेली येथील शेतकरी सय्यद अख्तर सय्यद शब्बीर यांच्यावर हे संकट कोसळले आहे. गांधेलीत २ एकरपैकी काही क्षेत्रात त्यांनी केळीची जवळपास २ हजार झाडे  लावली होती. अल्प पावसामुळे पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ ओढावली. अशा परिस्थितीत ठिंबक सिंचनाचा वापर करून केळीची बाग जोपासली. रात्रीचा दिवस करून बाग वाढविली. बाग चांगली फुलली होती. गेल्या काही दिवसांत केळी काढण्यालायक झालेली होती. त्यामुळे आगामी काही दिवसांत झाडांवरून केळी काढण्याची तयारी सुरू होती. त्यातून येणाºया रकमेतून विविध कामे करण्याचे स्वप्नही रंगले होते. मात्र, निसर्गाला हे मान्य नव्हते. रणरणत्या उन्हात २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारा सुटला. या वाºयाने त्यांची केळीची बाग अवघ्या काही क्षणात आडवी झाली. झाडांवरील केळीचे घड जमिनीवर कोसळले. त्यामुळे डाग लागल्याने ही केळी कोणी घेण्यास तयार नाही. या आपत्तीची पाहणी, पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी तहसील कार्यालयाकडे केली आहे. 

१.२० लाखांच्या उसनवारीतून बागसय्यद अख्तर यांनी केळीच्या बागेसाठी नातेवाईकांकडून १.२० लाख रुपये उसने घेतले होते. स्वत: जवळचे ८० हजार, असे २ लाख रुपये बागेसाठी खर्च केले. अवघ्या काही दिवसांत किमान ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार होते. परंतु वादळी वाºयामुळे हे उत्पन्न हातातून गेले. आता नातेवाईकांचे उसने पैसे कसे द्यायचे, असा प्रश्न पडल्याचे त्यांनी सांगितले.

उन्हाचा तडाखाउन्हामुळे केळी बागेला तडाखा बसत होता. पाणीपातळी खोल गेल्याने आधीच मेटाकुटीला आलो होतो. उष्णतेचे संकट केळीला मारक ठरत होते. त्यात कशीबशी तग धरून बाग वाढविली. मात्र पैसा, मेहनत वाया गेल्याचे सय्यद अख्तर सय्यद शब्बीर म्हणाले.

 

टॅग्स :Natureनिसर्गMedicalवैद्यकीय